शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पावणेचार कोटींच्या निधीतून परभणीकरांना कामांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:26 IST

शहरातील नेहरू पार्क, शिवाजी पार्क या दोन प्रमुख उद्यानांबरोबरच वसाहतींमधील उद्यान विकसित करण्यासाठी सुमारे ३ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी वेगवेगळ्या योजनांमधून उपलब्ध झाला आहे़ काही कामांचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले असले तरी प्रत्यक्ष काम मात्र सुरू झाले नसल्याने उद्यान विकासासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील नेहरू पार्क, शिवाजी पार्क या दोन प्रमुख उद्यानांबरोबरच वसाहतींमधील उद्यान विकसित करण्यासाठी सुमारे ३ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी वेगवेगळ्या योजनांमधून उपलब्ध झाला आहे़ काही कामांचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले असले तरी प्रत्यक्ष काम मात्र सुरू झाले नसल्याने उद्यान विकासासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे़परभणी शहरात राजगोपालचारी उद्यानाबरोबरच नेहरू पार्क, शिवाजी पार्क आणि गांधी पार्क हे तीन उद्याने आहेत़ त्यापैकी गांधी पार्क वगळता नेहरू पार्क आणि शिवाजी पार्क या दोन्ही उद्यानांची दुरवस्था झाली आहे़ लॉन, झाडी नसल्याने ही उद्याने बकाल अवस्थेत आहेत़ या उद्यानांचा विकास करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे़ महापालिकेने उद्याने निर्माण केली़ परंतु, या उद्यानांची नियमित देखभाल दुरुस्ती होत नसल्याने उद्यानांची दुरवस्था झाली आहे़ विशेष म्हणजे, ही दोन्ही उद्याने शहराच्या मध्यभागी असून, सुशोभीकरण व इतर कामे झाली नसल्याने या उद्यानांचा दुरुपयोग वाढला आहे़या दोन्ही उद्यानांबरोबरच परिसरातील वसाहतींमधील उद्याने विकसित करण्यासाठी मनपाला निधी उपलब्ध झाला आहे़ नेहरू पार्कच्या विकास कामांसाठी १ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, या ठिकाणी सुशोभीकरणासह इतर कामे करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे़ मात्र प्रत्यक्षात या कामांना सुरुवात झालेली नाही़ अमृत योजनेंतर्गत २०१५-१६ मध्ये नेहरू पार्कच्या विकासासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे़ महापालिकेने या ठिकाणी कामांचे नियोजनही केले असले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही़ अमृत योजनेबरोबरच जिल्हा नियोजन समितीचा निधीही महानगरपालिकेला मिळाला आहे़ या निधीमधून शिवाजी उद्यानात संरक्षक भिंत बांधली जाणार आहे़ त्यासाठी देखील महापालिकेने प्रयत्न सुरू केले असून, संरक्षक भिंत उभारणीचे काम सुरू झाले आहे़ शिवाजी उद्यान हे मध्यवस्तीत असून, या ठिकाणी सुशोभीकरणाचेही कामे होणे बाकी आहेत़ झाडे व लॉन टाकून उद्यानाचा विकास करणे अपेक्षित असून, त्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे़ एकंदर मनपाला उद्यान विकासासाठी निधी उपलब्ध झाला असून, कार्यारंभ आदेशही दिले आहेत़ तेव्हा प्रत्यक्षात कामांना गती द्यावी, अशी मागणी होत आहे़अमृत योजनेतून : दोन कोटींची कामेअमृत योजनेंतर्गत शहरातील हरितक्षेत्र विकासासाठी २०१७-१८ या वर्षात महानगरपालिकेला १ कोटी ९९ लाख ९९ हजार ४६१ रुपये मंजूर झाले आहेत़ या रकमेतून सर्वे नंबर ५८७, ५८६ या ठिकाणी बगीचा विकसित करणे आणि ग्रीन बेल्ट विकसित करण्याची कामे केली जाणार आहेत़ मनपाने या कामांचे कार्यारंभ आदेशही काढले असून, एका वर्षात ही कामे पूर्ण करण्याची मुदत कंत्राटदाराला दिली आहे़ दोन महिन्यांपूर्वी या विकास कामांसाठी कार्यारंभ आदेश देण्यात आला असून, ही कामे गतीने पूर्ण झाल्यास बगीचा विकसित होणार आहे़त्याचप्रमाणे अमृत योजनेतूनच २०१६-१७ या वर्षात हरितक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मुमताज नगर येथील बगीचा आणि दत्तनगर येथील बगीचा विकसित करणे, ग्रीन बेल्ट विकसित करण्यासाठी १ कोटी ७९ लाख ९८ हजार ९३ रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या कामांचे कार्यारंभ आदेशही महापालिकने दिले आहेत़ या कामासाठी देखील एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे़ त्यामुळे शहरातील ही दोन्ही कामे पूर्ण होण्यासाठी शहरवासियांना किमान एक वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे़अनेक वर्षांपासून उद्यानांची दुरवस्थाशहरातील सर्वच उद्यानांची दुरवस्था झाली आहे़ राजगोपालचारी उद्यान हे शहरातील मुख्य उद्यान असून, या उद्यानातही अनेक विकास कामे होणे बाकी आहे़ सद्यस्थितीला उद्यानातील खेळणी खराब झाली असून, लॉन विकसित करणे तसेच नवीन खेळणी वाढविल्यास उद्यानाच्या सौंदर्यात भर पडू शकते़ त्यामुळे शहरातील उद्याने विकसित करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेऊन कामे पूर्ण करावित, अशी मागणी होत आहे़