शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पावणेचार कोटींच्या निधीतून परभणीकरांना कामांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:26 IST

शहरातील नेहरू पार्क, शिवाजी पार्क या दोन प्रमुख उद्यानांबरोबरच वसाहतींमधील उद्यान विकसित करण्यासाठी सुमारे ३ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी वेगवेगळ्या योजनांमधून उपलब्ध झाला आहे़ काही कामांचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले असले तरी प्रत्यक्ष काम मात्र सुरू झाले नसल्याने उद्यान विकासासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील नेहरू पार्क, शिवाजी पार्क या दोन प्रमुख उद्यानांबरोबरच वसाहतींमधील उद्यान विकसित करण्यासाठी सुमारे ३ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी वेगवेगळ्या योजनांमधून उपलब्ध झाला आहे़ काही कामांचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले असले तरी प्रत्यक्ष काम मात्र सुरू झाले नसल्याने उद्यान विकासासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे़परभणी शहरात राजगोपालचारी उद्यानाबरोबरच नेहरू पार्क, शिवाजी पार्क आणि गांधी पार्क हे तीन उद्याने आहेत़ त्यापैकी गांधी पार्क वगळता नेहरू पार्क आणि शिवाजी पार्क या दोन्ही उद्यानांची दुरवस्था झाली आहे़ लॉन, झाडी नसल्याने ही उद्याने बकाल अवस्थेत आहेत़ या उद्यानांचा विकास करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे़ महापालिकेने उद्याने निर्माण केली़ परंतु, या उद्यानांची नियमित देखभाल दुरुस्ती होत नसल्याने उद्यानांची दुरवस्था झाली आहे़ विशेष म्हणजे, ही दोन्ही उद्याने शहराच्या मध्यभागी असून, सुशोभीकरण व इतर कामे झाली नसल्याने या उद्यानांचा दुरुपयोग वाढला आहे़या दोन्ही उद्यानांबरोबरच परिसरातील वसाहतींमधील उद्याने विकसित करण्यासाठी मनपाला निधी उपलब्ध झाला आहे़ नेहरू पार्कच्या विकास कामांसाठी १ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, या ठिकाणी सुशोभीकरणासह इतर कामे करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे़ मात्र प्रत्यक्षात या कामांना सुरुवात झालेली नाही़ अमृत योजनेंतर्गत २०१५-१६ मध्ये नेहरू पार्कच्या विकासासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे़ महापालिकेने या ठिकाणी कामांचे नियोजनही केले असले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही़ अमृत योजनेबरोबरच जिल्हा नियोजन समितीचा निधीही महानगरपालिकेला मिळाला आहे़ या निधीमधून शिवाजी उद्यानात संरक्षक भिंत बांधली जाणार आहे़ त्यासाठी देखील महापालिकेने प्रयत्न सुरू केले असून, संरक्षक भिंत उभारणीचे काम सुरू झाले आहे़ शिवाजी उद्यान हे मध्यवस्तीत असून, या ठिकाणी सुशोभीकरणाचेही कामे होणे बाकी आहेत़ झाडे व लॉन टाकून उद्यानाचा विकास करणे अपेक्षित असून, त्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे़ एकंदर मनपाला उद्यान विकासासाठी निधी उपलब्ध झाला असून, कार्यारंभ आदेशही दिले आहेत़ तेव्हा प्रत्यक्षात कामांना गती द्यावी, अशी मागणी होत आहे़अमृत योजनेतून : दोन कोटींची कामेअमृत योजनेंतर्गत शहरातील हरितक्षेत्र विकासासाठी २०१७-१८ या वर्षात महानगरपालिकेला १ कोटी ९९ लाख ९९ हजार ४६१ रुपये मंजूर झाले आहेत़ या रकमेतून सर्वे नंबर ५८७, ५८६ या ठिकाणी बगीचा विकसित करणे आणि ग्रीन बेल्ट विकसित करण्याची कामे केली जाणार आहेत़ मनपाने या कामांचे कार्यारंभ आदेशही काढले असून, एका वर्षात ही कामे पूर्ण करण्याची मुदत कंत्राटदाराला दिली आहे़ दोन महिन्यांपूर्वी या विकास कामांसाठी कार्यारंभ आदेश देण्यात आला असून, ही कामे गतीने पूर्ण झाल्यास बगीचा विकसित होणार आहे़त्याचप्रमाणे अमृत योजनेतूनच २०१६-१७ या वर्षात हरितक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मुमताज नगर येथील बगीचा आणि दत्तनगर येथील बगीचा विकसित करणे, ग्रीन बेल्ट विकसित करण्यासाठी १ कोटी ७९ लाख ९८ हजार ९३ रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या कामांचे कार्यारंभ आदेशही महापालिकने दिले आहेत़ या कामासाठी देखील एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे़ त्यामुळे शहरातील ही दोन्ही कामे पूर्ण होण्यासाठी शहरवासियांना किमान एक वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे़अनेक वर्षांपासून उद्यानांची दुरवस्थाशहरातील सर्वच उद्यानांची दुरवस्था झाली आहे़ राजगोपालचारी उद्यान हे शहरातील मुख्य उद्यान असून, या उद्यानातही अनेक विकास कामे होणे बाकी आहे़ सद्यस्थितीला उद्यानातील खेळणी खराब झाली असून, लॉन विकसित करणे तसेच नवीन खेळणी वाढविल्यास उद्यानाच्या सौंदर्यात भर पडू शकते़ त्यामुळे शहरातील उद्याने विकसित करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेऊन कामे पूर्ण करावित, अशी मागणी होत आहे़