शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

परिवर्तनाच्या पारड्यात परभणीकरांचा कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:18 IST

परभणी : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात अनेक ग्रामपंचायतींत मतदारांनी परिवर्तन घडवून आणले. प्रस्थापितांना बाजूला ठेवत नव्या दमाच्या युवकांना मतदारांनी ...

परभणी : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात अनेक ग्रामपंचायतींत मतदारांनी परिवर्तन घडवून आणले. प्रस्थापितांना बाजूला ठेवत नव्या दमाच्या युवकांना मतदारांनी संधी दिली. परिवर्तनाच्या दिशेने मतदारांनी दिलेला हा कौल प्रस्थापितांना मात्र आत्मपरिक्षण करायला लावणारा ठरला आहे.

तालुक्यात झरी, जांब, सिंगणापूर, आर्वी, पोखर्णी, कुंभारी या गावांतील लढतीकडे लक्ष लागले होते. बहुतांश गावांत सरळ लढती झाल्या. त्यात अनेक ठिकाणी मतदारांनी परिवर्तन घडवून आणले. प्रस्थापितांच्या मागील कार्यकाळातील कार्यपद्धतीलाच मतदारांनी नाकारले आहे. झरी ही या तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत. १७ सदस्यांच्या या ग्रामपंचायतीवर यापूर्वी कांतराव झरीकर यांचे वर्चस्व होते. मात्र या वेळच्या निवडणुकीत कांतराव झरीकर हे या निवडणुकीपासून अलिप्त राहिले. त्यामुळे शिवसेनेचे गजानन देशमुख, डॉ.प्रमोद देशमुख यांच्या पॅनलने १० जागांवर विजय मिळवित ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे. या निवडणुकीत अनेक ग्रामपंचायतींमध्ये सत्ता परिवर्तन झाल्याचे पहावयास मिळाले. त्यात सिंगणापूर येथे रोकडोबा परिवर्तन पॅनलने १३ पैकी ९ जागा जिंकून वर्चस्व मिळविले. तालुक्यातील आर्वी ग्रामपंचायत यापूर्वी भाजपाचे डी.एस. कदम यांच्या ताब्यात होती. मात्र यावेळच्या निवडणुकीत मतदारांनी लोकशाही शक्ती पॅनलला झुकते माप दिले. या पॅनलचे ११ पैकी ९ उमेदवार विजयी झाले. त्यामुळे ग्रा.पं.वर पॅनलने वर्चस्व मिळविले. कुंभारी बाजार येथेही जयनृसिंह ग्रामविकास पॅनलने ९ पैकी ६ जागा जिंकून ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. या ग्रामपंचायतीवर बळीराजा ग्रामविकास पॅनल या सत्ताधारी पॅनलचा पराभव केला आहे.

जांब ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व

तालुक्यातील जांब ग्रामपंचायत निवडणुकीत संग्राम बाळासाहेब जामकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसंग्राम ग्रामविकास पॅनलने १३ पैकी ११ जागांवर विजय मिळवून सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे. आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली संग्राम जामकर यांनी काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायतीवर आता शिवसेनेेने वर्चस्व मिळविले आहे.