शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

परभणी : राष्ट्रीय प्रयोगशाळेच्या मंजुरीविना पाणी तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 23:39 IST

भारत सरकारने ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्य व जिल्हास्तरीय सर्व पाणी गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळांनी राष्ट्रीय प्रयोगशाळा प्रत्यायन मंडळाकडून अधिस्विकृती न घेताच दूषित पाण्यांच्या नमुन्यांची तपासणी केली असल्याची बाब महालेखापालांच्या २०१८-१९ च्या अहवालात समोर आली आहे़ राज्यातील २८ जिल्ह्यांमधील प्रयोगशाळांमध्ये हा प्रकार घडला असून, त्यामध्ये परभणीचाही समावेश आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भारत सरकारने ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्य व जिल्हास्तरीय सर्व पाणी गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळांनी राष्ट्रीय प्रयोगशाळा प्रत्यायन मंडळाकडून अधिस्विकृती न घेताच दूषित पाण्यांच्या नमुन्यांची तपासणी केली असल्याची बाब महालेखापालांच्या २०१८-१९ च्या अहवालात समोर आली आहे़ राज्यातील २८ जिल्ह्यांमधील प्रयोगशाळांमध्ये हा प्रकार घडला असून, त्यामध्ये परभणीचाही समावेश आहे़ग्रामीण पेयजल क्षेत्रासाठी २०११ ते २०२२ या कालावधी करीता भारत सरकारने केलेल्या धोरणात्मक नियोजनानुसार राज्य आणि जिल्हास्तरीय सर्व पाणी गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळांनी राष्ट्रीय प्रयोगशाळा प्रत्यायन मंडळाकडून अधिस्विकृती प्राप्त करणे आवश्यक आहे़ तसेच जिल्हा आणि उपविभागीय प्रयोगशाळांनी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतातील भौतिक, रासायनिक आणि सुक्ष्मजीवशास्त्रीय मानकांचे विश्लेषण भारतीय मानांकनांतर्गत विनिर्दिष्ट केल्या प्रमाणे करणे आवश्यक होते; परंतु, या संदर्भात करण्यात आलेल्या लेखापरीक्षणात असे आढळून आले की, जरी सर्व प्रयोगशाळा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली होत्या तरी राज्यस्तरीय प्रयोगशाळेची स्थापना केली गेली नव्हती़ त्याच प्रमाणे सहा क्षेत्रीय प्रयोगशाळा आणि २८ जिल्हा प्रयोगशाळा या पैकी २८ जिल्हा प्रयोगशाळांची अधिस्विकृती राष्ट्रीय प्रयोगशाळा प्रत्यायन मंडळाकडून घेण्यात आली नव्हती़ अर्सेनिकयुक्त पाणी चाचणीसाठीची सोय जिल्हा आणि १३८ उपविभागीय प्रयोगशाळेत उपलब्ध नव्हती़ बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत राज्यातील दूषित पाण्याने बाधित वस्त्यांना हताळण्यासारखे गंभीर मुद्दे साध्य झाले नाहीत़ कारण ६़५६ लाख लोकसंख्या असलेल्या ३०४ वस्त्या दूषित पाण्याने बाधित राहिल्या़ विशेष म्हणजे दूषित पाण्याने बाधित वस्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी निती आयोगाने दिलेला १़७२ कोटी रुपयांचा विशेष निधी विना वापर पडून होता, असा गंभीर शेराही या अहवालात मारण्यात आला आहे़उपाययोजनांचे ४० कोटी : राहिले अखर्चित४भारत सरकारने पाणी गुणवत्तेसाठी अतिरिक्त निधी वितरण अंतर्गत राज्यातील दूषित पाण्याने बाधित वस्त्यांच्या समस्या हाताळण्यासाठी २०१२ ते २०१७ दरम्यान, ३८ कोटी ४२ लाख आणि २०१५-१६ दरम्यान, निती आयोगांतर्गत २४ कोटी ८ लाख रुपये असा एकूण ६२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी राज्याला दिला होता़४त्यापैकी ३८ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिला़ त्यानंतर पुन्हा विशेष बाब म्हणून निती आयोगाने दिलेला १ कोटी ७२ लाख रुपयांचा निधीही विना वापर पडून राहिला़४त्यामुळे राज्यात यासाठीचा तब्बल ४० कोटी १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध असतानाही तो या कारणासाठी खर्च करता आला नाही, असे ताशेरे महालेखापालांच्या २०१८-१९ च्या अहवालात पाणीपुरवठा विभागावर ओढण्यात आले आहेत़१० जिल्ह्यांची निवड४दूषित पाण्याची पडताळणी करण्यासाठी राज्यातील १० जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती़ त्यामध्ये १ हजार ३८७ दूषित पाण्याने बाधित वस्त्यांपैकी ४६५ वस्त्यांची हताळणी करण्यात आली़ ९२२ दूषित पाण्याने बाधित वस्त्यांच्या समस्याच शासनाकडून विचारात घेतल्या गेल्या नाहीत, असेही या अहवालात नमूद केले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीGovernmentसरकार