शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
5
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
6
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
7
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
8
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
10
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
11
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
12
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
14
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
15
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
16
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
17
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
18
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
19
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
20
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

परभणी : पालम तालुक्यात रोजगार हमीच्या कामांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:39 IST

रोजगार हमी योजनेअंतर्गत छाननी समितीकडे दाखल केलेल्या प्रस्तावांना तीन महिन्यानंतरही मान्यता मिळाली नाही. त्यामुळे तालुक्यातील रोहयोची कामे ठप्प पडली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम : रोजगार हमी योजनेअंतर्गत छाननी समितीकडे दाखल केलेल्या प्रस्तावांना तीन महिन्यानंतरही मान्यता मिळाली नाही. त्यामुळे तालुक्यातील रोहयोची कामे ठप्प पडली आहेत.पालम तालुक्यामध्ये मागील ३ ते ४ महिन्यापासून रोजगार हमी योजनेची कामे ठप्प पडली आहेत. तालुक्यातून सिंचन विहिरीचे ३३६ प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत. तसेच शौचालय बांधकामाचे २७, विहीर पूनर्भरणचे ७४, अंतर्गत रस्त्याचे १८, शेततळ्याची ११ असे ४६६ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल करुनही या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली नाही. रोहयो अंतर्गतच्या कामांना मान्यता मिळावी, यासाठी पंचायत समितीचे कर्मचारी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील छाननी समितीकडे प्रत्येक बैठकीच्या वेळेस प्रस्ताव घेऊन जात आहेत; परंतु, समितीचे अनेक सदस्य बैठकीला हजर राहत नसल्याने बैठक होत नाही. त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. ९ मार्च रोजी पंचायत समितीचे कर्मचारी प्रस्ताव घेऊन छाननी समितीकडे गेले झाले होते. परंतु, समितीचे सदस्य बैठकीला हजर नसल्याने सर्व सदस्यांच्या सह्याचे कारण देत उपविभागीय अधिकारी यांनी हे प्रस्ताव परत पाठविले. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन रोहयोची कामे मार्गी लावावीत, असा आदेशही दिला होता. परंतु, छाननी समितीकडून या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात येत आहे. तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरु असून कामे खोळंबली आहेत. छाननी समिती प्रस्तावांना मंजुरी का देत नाही, या मागचे गौडबंगाल मात्र अजूनही समोर आलेले नाही.मजुरांचे स्थलांतर४ पालम तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेची कामे तीन महिन्यांपासून ठप्प पडली आहेत. तालुक्यातील मजुरांच्या हाताला कामे नसल्याने मजूर कामानिमित्त बाहेरगावी जात आहेत. तालुक्यामध्ये रोहयोची कामे उपलब्ध करुन दिल्यास या मजुरांच्या हाताला कामे उपलब्ध होतील.पंचायत समितीमध्ये दाखल झालेले प्रस्ताव छाननी समितीपुढे दरमहा ठेवण्यात येत आहेत. परंतु, उपविभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कामाच्या मजुंरीसाठी अडवणूक करीत आहेत. याचा त्रास आम्हाला होत असून जनतेला तोंड देताना नाकी नऊ येत आहे. वरिष्ठ अधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.-सावित्री आत्माराम सोडनर, सभापती