शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
2
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
3
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
4
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
5
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
6
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
7
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
8
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
9
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
10
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
11
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
12
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
13
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
14
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
15
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
16
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
17
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
18
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
19
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
20
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पालम तालुक्यात रोजगार हमीच्या कामांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:39 IST

रोजगार हमी योजनेअंतर्गत छाननी समितीकडे दाखल केलेल्या प्रस्तावांना तीन महिन्यानंतरही मान्यता मिळाली नाही. त्यामुळे तालुक्यातील रोहयोची कामे ठप्प पडली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम : रोजगार हमी योजनेअंतर्गत छाननी समितीकडे दाखल केलेल्या प्रस्तावांना तीन महिन्यानंतरही मान्यता मिळाली नाही. त्यामुळे तालुक्यातील रोहयोची कामे ठप्प पडली आहेत.पालम तालुक्यामध्ये मागील ३ ते ४ महिन्यापासून रोजगार हमी योजनेची कामे ठप्प पडली आहेत. तालुक्यातून सिंचन विहिरीचे ३३६ प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत. तसेच शौचालय बांधकामाचे २७, विहीर पूनर्भरणचे ७४, अंतर्गत रस्त्याचे १८, शेततळ्याची ११ असे ४६६ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल करुनही या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली नाही. रोहयो अंतर्गतच्या कामांना मान्यता मिळावी, यासाठी पंचायत समितीचे कर्मचारी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील छाननी समितीकडे प्रत्येक बैठकीच्या वेळेस प्रस्ताव घेऊन जात आहेत; परंतु, समितीचे अनेक सदस्य बैठकीला हजर राहत नसल्याने बैठक होत नाही. त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. ९ मार्च रोजी पंचायत समितीचे कर्मचारी प्रस्ताव घेऊन छाननी समितीकडे गेले झाले होते. परंतु, समितीचे सदस्य बैठकीला हजर नसल्याने सर्व सदस्यांच्या सह्याचे कारण देत उपविभागीय अधिकारी यांनी हे प्रस्ताव परत पाठविले. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन रोहयोची कामे मार्गी लावावीत, असा आदेशही दिला होता. परंतु, छाननी समितीकडून या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात येत आहे. तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरु असून कामे खोळंबली आहेत. छाननी समिती प्रस्तावांना मंजुरी का देत नाही, या मागचे गौडबंगाल मात्र अजूनही समोर आलेले नाही.मजुरांचे स्थलांतर४ पालम तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेची कामे तीन महिन्यांपासून ठप्प पडली आहेत. तालुक्यातील मजुरांच्या हाताला कामे नसल्याने मजूर कामानिमित्त बाहेरगावी जात आहेत. तालुक्यामध्ये रोहयोची कामे उपलब्ध करुन दिल्यास या मजुरांच्या हाताला कामे उपलब्ध होतील.पंचायत समितीमध्ये दाखल झालेले प्रस्ताव छाननी समितीपुढे दरमहा ठेवण्यात येत आहेत. परंतु, उपविभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कामाच्या मजुंरीसाठी अडवणूक करीत आहेत. याचा त्रास आम्हाला होत असून जनतेला तोंड देताना नाकी नऊ येत आहे. वरिष्ठ अधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.-सावित्री आत्माराम सोडनर, सभापती