शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

परभणी : पालम तालुक्यात रोजगार हमीच्या कामांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:39 IST

रोजगार हमी योजनेअंतर्गत छाननी समितीकडे दाखल केलेल्या प्रस्तावांना तीन महिन्यानंतरही मान्यता मिळाली नाही. त्यामुळे तालुक्यातील रोहयोची कामे ठप्प पडली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम : रोजगार हमी योजनेअंतर्गत छाननी समितीकडे दाखल केलेल्या प्रस्तावांना तीन महिन्यानंतरही मान्यता मिळाली नाही. त्यामुळे तालुक्यातील रोहयोची कामे ठप्प पडली आहेत.पालम तालुक्यामध्ये मागील ३ ते ४ महिन्यापासून रोजगार हमी योजनेची कामे ठप्प पडली आहेत. तालुक्यातून सिंचन विहिरीचे ३३६ प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत. तसेच शौचालय बांधकामाचे २७, विहीर पूनर्भरणचे ७४, अंतर्गत रस्त्याचे १८, शेततळ्याची ११ असे ४६६ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल करुनही या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली नाही. रोहयो अंतर्गतच्या कामांना मान्यता मिळावी, यासाठी पंचायत समितीचे कर्मचारी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील छाननी समितीकडे प्रत्येक बैठकीच्या वेळेस प्रस्ताव घेऊन जात आहेत; परंतु, समितीचे अनेक सदस्य बैठकीला हजर राहत नसल्याने बैठक होत नाही. त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. ९ मार्च रोजी पंचायत समितीचे कर्मचारी प्रस्ताव घेऊन छाननी समितीकडे गेले झाले होते. परंतु, समितीचे सदस्य बैठकीला हजर नसल्याने सर्व सदस्यांच्या सह्याचे कारण देत उपविभागीय अधिकारी यांनी हे प्रस्ताव परत पाठविले. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन रोहयोची कामे मार्गी लावावीत, असा आदेशही दिला होता. परंतु, छाननी समितीकडून या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात येत आहे. तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरु असून कामे खोळंबली आहेत. छाननी समिती प्रस्तावांना मंजुरी का देत नाही, या मागचे गौडबंगाल मात्र अजूनही समोर आलेले नाही.मजुरांचे स्थलांतर४ पालम तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेची कामे तीन महिन्यांपासून ठप्प पडली आहेत. तालुक्यातील मजुरांच्या हाताला कामे नसल्याने मजूर कामानिमित्त बाहेरगावी जात आहेत. तालुक्यामध्ये रोहयोची कामे उपलब्ध करुन दिल्यास या मजुरांच्या हाताला कामे उपलब्ध होतील.पंचायत समितीमध्ये दाखल झालेले प्रस्ताव छाननी समितीपुढे दरमहा ठेवण्यात येत आहेत. परंतु, उपविभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कामाच्या मजुंरीसाठी अडवणूक करीत आहेत. याचा त्रास आम्हाला होत असून जनतेला तोंड देताना नाकी नऊ येत आहे. वरिष्ठ अधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.-सावित्री आत्माराम सोडनर, सभापती