शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

परभणी : २५ कोटी रुपयांची उलाढाल ठप्पं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:45 IST

यावर्षी पावसाअभावी रब्बी हंगामावर पाणी फेरल्याने येथील मोंढा बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला असून या बाजारपेठेतील तब्बल २५ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षी पावसाअभावी रब्बी हंगामावर पाणी फेरल्याने येथील मोंढा बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला असून या बाजारपेठेतील तब्बल २५ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.परभणी जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा असून या जिल्ह्याचा आर्थिक डोलारा शेती उत्पन्नावर अवलंबून आहे. खरीप, रब्बी हंगाम चांगले झाल्यानंतर जिल्ह्यातील बाजारपेठेतही उलाढाल वाढते. मोंढा बाजारपेठे बरोबरच सर्वसाधारण बाजारपेठेतही खरेदी- विक्री व्यवहार वाढत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामामध्ये कसे-बसे शेतकऱ्यांनी उत्पन्न घेतले असले तरी परतीचा पाऊस झाला नसल्याने रब्बी हंगामावर पाणी सोडावे लागले आहे. रब्बी हंगामात पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे, खते, औषधी आदींची खरेदी- विक्री होत असते.परभणी शहरातील मोंढा बाजारपेठेत दरवर्षी आॅक्टोबर महिन्यापासून खरेदी- विक्रीला सुरुवात होते. मात्र यावर्षी पाऊस नसल्याने रब्बीच्या पेरण्या झाल्या नाहीत. परिणामी मोंढ्यातील बाजारपेठ ठप्प आहे. दरवर्षी आॅक्टोबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात बियाणे आणि खतांची खरेदी- विक्री होते. यातून बाजारपेठेमध्ये उलाढाल वाढते. मात्र यावर्षी बाजारपेठेमध्ये आतापर्यंत केवळ १० ते २० टक्के उलाढाल झाल्याची माहिती मिळाली.परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये खतांची विक्री करणारे ५० आणि बियाणे व औषधींची विक्री करणारे सुमारे १२५ विक्रेते आहेत. या विक्रेत्यांच्या माध्यमातून शेतकºयांपर्यंत कृषी निविष्ठा पुरविल्या जातात.जिल्ह्यात १३ टक्के रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे खरेदी-विक्रीवर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात आले. परभणी शहरातील संपूर्ण बाजारपेठेचा आढावा घेतला तर २५ ते ३० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प असल्याची माहिती येथील व्यापाºयांनी दिली.खताला ३० टक्क्यांचा फटका४परतीचा पाऊस झाला नसल्याने खताच्या विक्रीलाही चांगलाच फटका बसला आहे. गतवर्षीच्या हंगामामध्ये ३० हजार टन खताची विक्री या बाजारपेठेमध्ये झाली होती. त्यातून तब्बल ४२ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यावर्षी रब्बीची पेरणी झाली नसली तरी ज्या शेतकºयांकडे पाणी उपलब्ध आहे, अशा शेतकºयांनी पिके घेतली आहेत. तसेच भाजीपाल्याची लागवडही अनेक भागात होत आहे. असे असले तरी खताची विक्री मागील वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी घटली आहे.बियाणे विक्री घटली४रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, करडई, भूईमुग आदी पिके घेतली जातात. या पिकांच्या बियाणांची खरेदी मोंढा बाजारपेठेतून केली जाते. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार मागील वर्षीच्या रब्बी हंगामामध्ये सुमारे ४२५ टन बियाणांची विक्री झाली होती. यावर्षी मात्र ही विक्री १७ ते २० टनापर्यंत झाली आहे. गहू आणि ज्वारी ही या हंगामातील महत्वाची पिके आहेत; परंतु, या पिकांचे बियाणेही विक्री झाले नाहीत. याच काळात भूईमुग बियाणाची विक्री होते. मागील वर्षीच्या रब्बी हंगामात सर्वसाधारणपणे १७० टन भूईमुग बियाणे विक्री झाले होते. यावर्षी ही विक्री मोठ्या प्रमाणावर घटली आहे. अशीच परिस्थिती कीटकनाशकांच्या बाबतीतही आहे. रब्बी हंगामात पेरणी झाल्यानंतर पिकांवर रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून कीटकनाशकांची फवारणी केली जाते. गतवर्षीच्या हंगामात परभणी बाजारपेठेतून १० ते १५ कोटी रुपयांचे कीटकनाशके विक्री झाली होती. यावर्षी ही विक्री ४ ते ५ कोटी रुपयांवर येऊन ठेपली आहे.यावर्षीच्या रब्बी हंगामात पेरणी झाली नसल्याने बाजारपेठेमध्ये दोन महिन्यांपासून शुकशुकाट आहे. ग्राहक नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करुनही नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी व्यवसायात मोठी घट झाली आहे.- रमेशराव देशमुख, विक्रेते

टॅग्स :parabhaniपरभणीMarketबाजार