शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

परभणी : ३ लाख शेतकºयांना निर्णयाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:30 IST

बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना अनुदान देण्याच्या अनुषंगाने शासनाने निर्णयात बदल केल्याने जिल्ह्यातील ३ लाख ५१ हजार ११८ शेतकºयांचा नुकसानीचा आकडा थेट ४६ हजार ६५१ शेतकºयांवरच आला आहे. त्यामुळे शासनाच्या या नव्या निर्णयाचा जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ४ हजार ४६७ शेतकºयांना फटका बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना अनुदान देण्याच्या अनुषंगाने शासनाने निर्णयात बदल केल्याने जिल्ह्यातील ३ लाख ५१ हजार ११८ शेतकºयांचा नुकसानीचा आकडा थेट ४६ हजार ६५१ शेतकºयांवरच आला आहे. त्यामुळे शासनाच्या या नव्या निर्णयाचा जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ४ हजार ४६७ शेतकºयांना फटका बसला आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात २ लाख ९ हजार ४८ हेक्टर क्षेत्र कापसासाठी प्रस्तावित केले होते. प्रत्यक्षात १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टरवर कापसाची लागवड झाली. या कापसावर पहिल्याच वेचणीनंतर जिल्ह्यात बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला. त्यानंतर कृषी विभागाच्या वतीने बोंडअळीग्रस्त शेतकºयांकडून नुकसानग्रस्त भागाचे प्रस्ताव मागविण्यात आले. त्यानंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार कृषी विभाग, महसूल व जिल्हा प्रशासन या तीन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील कापूस पिकावर बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्षात पंचनामे करण्यास सुरुवात केली. त्यानुसार काही दिवसांत पंचनामेही पूर्ण झाले. या पंचनाम्यामध्ये जिल्ह्यातील ३ लाख ५१ हजार ३२६ शेतकºयांनी २ लाख ३३ हजार ४०३ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केल्याचे आढळून आले. त्यामध्ये ३३ टक्क्यापेक्षा अधिक २ लाख ३३ हजार २४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला. या अहवालात ३ लाख ५१ हजार ११८ शेतकºयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले. तो अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला.मात्र महसूल व वन विभागाच्या वतीने २३ फेब्रुवारी रोजी दी.रा.बागणे यांच्या स्वाक्षरीनिशी नवा आदेश काढण्यात आला. त्यात खरीप २०१७ मध्ये बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे कापूस पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी व तुडतुडे किडीच्या प्रादूर्भावामुळे बाधित शेतकºयांना मदत देण्याबाबत नमुद करण्यात आले. या आदेशात बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकºयांना मदत देण्यास मान्यता दिली. मात्र या आदेशात प्रधानमंत्री पीक विमा योजनेखाली झालेल्या कापूस पिकाच्या पीक कापणी प्रयोगानुसार ज्या अधिसूचित विमा क्षेत्र घटकासाठी कापूस पिकाचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे, अशाच मंडळातील कापूस उत्पादक शेतकºयांना मदत देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. या नवीन शासन निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष पंचनामा करुन तयार केलेल्या अहवालाला फाटा देत नवीन अहवाल तयार केला आहे. या अहवालात ३ लाख ५१ हजार ११८ शेतकºयांपैकी ४६ हजार ६५१ नुकसानग्रस्त शेतकºयांचीच नोंद आहे. त्यामुळे ३ लाख ४ हजार ४६७ शेतकरी केंद्र शासनाच्या एनडीआरएफ या विभागाच्या मदतीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकºयांमध्ये शासनाच्या नव्या निर्णयाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.राज्य शासनाने यापूर्वी कर्जमाफीच्या अनुषंगाने घेतलेल्या निर्णयांमध्येही अनेकवेळा बदल केल्याने त्याचा फटका शेतकºयांना बसला होता. आता बोंडअळीच्या अनुदान वितरणाबाबतही निर्णय बदल्याने शेतकºयांच्या भावना तीव्र झाल्या आहेत.सहा तालुक्यात एकही लाभार्थी नाही४राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने २३ फेब्रुवारी काढलेल्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने कापूस पिकाच्या पीक कापणी प्रयोगानुसार कापूस पिकावर बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीच्या एकूण क्षेत्राचा अहवाल प्रपत्र क मध्ये तयार केला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी परभणी, पाथरी व गंगाखेड या तीन तालुक्यातील ५ मंडळाचाच समावेश आहे. यामध्ये परभणी तालुक्यातील सिंगणापूर, पाथरी तालुक्यातील बाभळगाव, गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव, महातपुरी व गंगाखेड या मंडळांचा समावेश आहे. त्यामुळे सेलू, जिंतूर, पूर्णा, सोनपेठ, मानवत, पालम या सहा तालुक्यातील एकाही मंडळाचा व एकाही लाभार्थ्याचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेले नाही, अशी माहिती अहवालात तयार केली आहे. त्यामुळे ९ तालुक्यातील ३८ मंडळांपैकी केवळ ५ मंडळातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांनाच केंद्र शासनाच्या एनडीआरएफमधून मदत मिळणार आहे.