शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ३ लाख शेतकºयांना निर्णयाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:30 IST

बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना अनुदान देण्याच्या अनुषंगाने शासनाने निर्णयात बदल केल्याने जिल्ह्यातील ३ लाख ५१ हजार ११८ शेतकºयांचा नुकसानीचा आकडा थेट ४६ हजार ६५१ शेतकºयांवरच आला आहे. त्यामुळे शासनाच्या या नव्या निर्णयाचा जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ४ हजार ४६७ शेतकºयांना फटका बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना अनुदान देण्याच्या अनुषंगाने शासनाने निर्णयात बदल केल्याने जिल्ह्यातील ३ लाख ५१ हजार ११८ शेतकºयांचा नुकसानीचा आकडा थेट ४६ हजार ६५१ शेतकºयांवरच आला आहे. त्यामुळे शासनाच्या या नव्या निर्णयाचा जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ४ हजार ४६७ शेतकºयांना फटका बसला आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात २ लाख ९ हजार ४८ हेक्टर क्षेत्र कापसासाठी प्रस्तावित केले होते. प्रत्यक्षात १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टरवर कापसाची लागवड झाली. या कापसावर पहिल्याच वेचणीनंतर जिल्ह्यात बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला. त्यानंतर कृषी विभागाच्या वतीने बोंडअळीग्रस्त शेतकºयांकडून नुकसानग्रस्त भागाचे प्रस्ताव मागविण्यात आले. त्यानंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार कृषी विभाग, महसूल व जिल्हा प्रशासन या तीन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील कापूस पिकावर बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्षात पंचनामे करण्यास सुरुवात केली. त्यानुसार काही दिवसांत पंचनामेही पूर्ण झाले. या पंचनाम्यामध्ये जिल्ह्यातील ३ लाख ५१ हजार ३२६ शेतकºयांनी २ लाख ३३ हजार ४०३ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केल्याचे आढळून आले. त्यामध्ये ३३ टक्क्यापेक्षा अधिक २ लाख ३३ हजार २४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला. या अहवालात ३ लाख ५१ हजार ११८ शेतकºयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले. तो अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला.मात्र महसूल व वन विभागाच्या वतीने २३ फेब्रुवारी रोजी दी.रा.बागणे यांच्या स्वाक्षरीनिशी नवा आदेश काढण्यात आला. त्यात खरीप २०१७ मध्ये बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे कापूस पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी व तुडतुडे किडीच्या प्रादूर्भावामुळे बाधित शेतकºयांना मदत देण्याबाबत नमुद करण्यात आले. या आदेशात बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकºयांना मदत देण्यास मान्यता दिली. मात्र या आदेशात प्रधानमंत्री पीक विमा योजनेखाली झालेल्या कापूस पिकाच्या पीक कापणी प्रयोगानुसार ज्या अधिसूचित विमा क्षेत्र घटकासाठी कापूस पिकाचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे, अशाच मंडळातील कापूस उत्पादक शेतकºयांना मदत देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. या नवीन शासन निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष पंचनामा करुन तयार केलेल्या अहवालाला फाटा देत नवीन अहवाल तयार केला आहे. या अहवालात ३ लाख ५१ हजार ११८ शेतकºयांपैकी ४६ हजार ६५१ नुकसानग्रस्त शेतकºयांचीच नोंद आहे. त्यामुळे ३ लाख ४ हजार ४६७ शेतकरी केंद्र शासनाच्या एनडीआरएफ या विभागाच्या मदतीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकºयांमध्ये शासनाच्या नव्या निर्णयाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.राज्य शासनाने यापूर्वी कर्जमाफीच्या अनुषंगाने घेतलेल्या निर्णयांमध्येही अनेकवेळा बदल केल्याने त्याचा फटका शेतकºयांना बसला होता. आता बोंडअळीच्या अनुदान वितरणाबाबतही निर्णय बदल्याने शेतकºयांच्या भावना तीव्र झाल्या आहेत.सहा तालुक्यात एकही लाभार्थी नाही४राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने २३ फेब्रुवारी काढलेल्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने कापूस पिकाच्या पीक कापणी प्रयोगानुसार कापूस पिकावर बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीच्या एकूण क्षेत्राचा अहवाल प्रपत्र क मध्ये तयार केला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी परभणी, पाथरी व गंगाखेड या तीन तालुक्यातील ५ मंडळाचाच समावेश आहे. यामध्ये परभणी तालुक्यातील सिंगणापूर, पाथरी तालुक्यातील बाभळगाव, गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव, महातपुरी व गंगाखेड या मंडळांचा समावेश आहे. त्यामुळे सेलू, जिंतूर, पूर्णा, सोनपेठ, मानवत, पालम या सहा तालुक्यातील एकाही मंडळाचा व एकाही लाभार्थ्याचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेले नाही, अशी माहिती अहवालात तयार केली आहे. त्यामुळे ९ तालुक्यातील ३८ मंडळांपैकी केवळ ५ मंडळातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांनाच केंद्र शासनाच्या एनडीआरएफमधून मदत मिळणार आहे.