शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

परभणी : ‘अभद्र’ युतीवर आघाडीची चुप्पी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:33 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता चार ते पाच दिवसांमध्ये लागण्याची शक्यता असली तरी जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने समविचारी पक्षांना डावलून केलेली ‘अभद्र’ युती कायम असल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता चार ते पाच दिवसांमध्ये लागण्याची शक्यता असली तरी जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने समविचारी पक्षांना डावलून केलेली ‘अभद्र’ युती कायम असल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ९ मार्चच्या आत लागण्याची दाट शक्यता आहे. तशी चर्चा राज्यपातळीवर सुरु आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना - भाजपाची युती झाली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेना किंवा भाजपा पक्षासोबत केलेली युती तोडावी, असे आदेश आघाडीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी दिले होते. कॉंग्रेसच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार ही ‘अभद्र’ युती असल्याने ती तोडली जाईल, असेही सांगण्यात आले होते; परंतु, जिल्हा पातळीवर तशा प्रकारच्या हालचाली होताना दिसून येत नाहीत. परभणी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने कॉंग्रेसला बाजूला ठेवून भाजपाला सत्तेत भागिदार बनविले. तर परभणी पंचायत समितीमध्ये कॉंग्रेसने चक्क देशपातळीवर एक नंबरचा राजकीय शत्रू असलेल्या भाजपासोबत युती करुन शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही ठिकाणी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी अभद्र युती केली आहे. ही अभद्र युती तोडण्यासंदर्भात जिल्ह्यातील दोन्ही पक्षाच्या नेत्यांना राज्य पातळीवरुन कोणताही निरोप मिळाला नसल्याचे समजते. त्यामुळे जवळपास दोन वर्षापासून या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये अभद्र युतीचा संसार गुण्या-गोविंदाने सुरु आहे. आता लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार असली तरी युती तोडलेली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या व्यासपीठावर कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपावर टीका करताना स्थानिक पातळीवर केलेली तडजोड जिल्ह्यातील कार्यकर्ते कसे विसरतील, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी गेल्या काही सभांमधून भाजपाचा भाषणामधून खरपूस समाचार घेतला आहे; परंतु, स्थानिक पातळीवरील अभद्र युतीसंदर्भात त्यांनीही चकार शब्द काढलेला नाही. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेसचे कार्यकर्ते गोंधळले आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी परभणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थामधील अभद्र युती संपुष्टात येते की देश व राज्य पातळीवर वैचारिक मतभेद कायम ठेवून, स्थानिक पातळीवर तडजोड कायम ठेवली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliticsराजकारणElectionनिवडणूक