शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

परभणी:जलस्त्रोत आटल्याने ग्रामीण भागात टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 23:59 IST

यंदाच्या पावसाळी हंगामात तालुक्यात एकही मोठा पाऊस झाला नसल्याने ग्रामीण भागातील जलस्त्रोत आटलेलेच असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): यंदाच्या पावसाळी हंगामात तालुक्यात एकही मोठा पाऊस झाला नसल्याने ग्रामीण भागातील जलस्त्रोत आटलेलेच असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.पूर्णा तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे़ संपूर्ण पावसाळी हंगामात मोठा पाऊस झाला नाही़ त्यामुळे भूजल पातळीतही वाढ झाली नसून ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे़पूर्णा शहराला पूर्णा येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो़ उन्हाळ्यात या बंधाºयातील पाणी आटल्याने शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते़ पावसाळ्यात पूर्णा नदीचे पाणी बंधाºयात साचेल, अशी अपेक्षा होती़ मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही पूर्णा नदीला पुरेशे पाणी आले नाही़ परिणामी बंधाºयातही पाणीसाठा झाला नाही़ उन्हाळ्यामध्ये पुर्णेकरांसाठी सिद्धेश्वर प्रकल्प आणि निम्न दूधना प्रकल्पातून पाणी घेतले होते़ हा पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंत पुरविण्यात आला़ परंतु, आता मात्र बंधाºयातील पाणीसाठाही कमी झाला असून, आगामी काळात मोठा पाऊस झाला नाही तर शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे़दरम्यान, पूर्णा नगरपालिकेने उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याच्या हेतुने शहराला आठ दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा सुरू केला आहे़ ज्या भागात नळ योजना आहेत त्या ठिकाणी किमान आठ दिवसांना पाणी मिळते़ परंतु, नवीन वसाहतींमध्ये नळ योजना नसल्याने भर पावसाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ या भागातील हातपंपांना अजूनही पाणी आले नाही़ परिणामी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ शहराबरोबरच ग्रामीण भागातही उन्हाळ्यात निर्माण झालेली पाणी टंचाई कायम असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई