शहरं
Join us  
Trending Stories
1
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
2
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
3
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
4
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
5
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
6
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
7
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
8
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
9
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
10
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
11
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
12
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
13
Amravati: अमरावतीत उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह गर्भवतीचा दुदैवी अंत!
14
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
15
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
16
UPI Transaction Failed: UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
18
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
19
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
20
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
Daily Top 2Weekly Top 5

परभणी:जलस्त्रोत आटल्याने ग्रामीण भागात टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 23:59 IST

यंदाच्या पावसाळी हंगामात तालुक्यात एकही मोठा पाऊस झाला नसल्याने ग्रामीण भागातील जलस्त्रोत आटलेलेच असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): यंदाच्या पावसाळी हंगामात तालुक्यात एकही मोठा पाऊस झाला नसल्याने ग्रामीण भागातील जलस्त्रोत आटलेलेच असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.पूर्णा तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे़ संपूर्ण पावसाळी हंगामात मोठा पाऊस झाला नाही़ त्यामुळे भूजल पातळीतही वाढ झाली नसून ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे़पूर्णा शहराला पूर्णा येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो़ उन्हाळ्यात या बंधाºयातील पाणी आटल्याने शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते़ पावसाळ्यात पूर्णा नदीचे पाणी बंधाºयात साचेल, अशी अपेक्षा होती़ मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही पूर्णा नदीला पुरेशे पाणी आले नाही़ परिणामी बंधाºयातही पाणीसाठा झाला नाही़ उन्हाळ्यामध्ये पुर्णेकरांसाठी सिद्धेश्वर प्रकल्प आणि निम्न दूधना प्रकल्पातून पाणी घेतले होते़ हा पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंत पुरविण्यात आला़ परंतु, आता मात्र बंधाºयातील पाणीसाठाही कमी झाला असून, आगामी काळात मोठा पाऊस झाला नाही तर शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे़दरम्यान, पूर्णा नगरपालिकेने उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याच्या हेतुने शहराला आठ दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा सुरू केला आहे़ ज्या भागात नळ योजना आहेत त्या ठिकाणी किमान आठ दिवसांना पाणी मिळते़ परंतु, नवीन वसाहतींमध्ये नळ योजना नसल्याने भर पावसाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ या भागातील हातपंपांना अजूनही पाणी आले नाही़ परिणामी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ शहराबरोबरच ग्रामीण भागातही उन्हाळ्यात निर्माण झालेली पाणी टंचाई कायम असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई