शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

परभणी:जलस्त्रोत आटल्याने ग्रामीण भागात टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 23:59 IST

यंदाच्या पावसाळी हंगामात तालुक्यात एकही मोठा पाऊस झाला नसल्याने ग्रामीण भागातील जलस्त्रोत आटलेलेच असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): यंदाच्या पावसाळी हंगामात तालुक्यात एकही मोठा पाऊस झाला नसल्याने ग्रामीण भागातील जलस्त्रोत आटलेलेच असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.पूर्णा तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे़ संपूर्ण पावसाळी हंगामात मोठा पाऊस झाला नाही़ त्यामुळे भूजल पातळीतही वाढ झाली नसून ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे़पूर्णा शहराला पूर्णा येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो़ उन्हाळ्यात या बंधाºयातील पाणी आटल्याने शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते़ पावसाळ्यात पूर्णा नदीचे पाणी बंधाºयात साचेल, अशी अपेक्षा होती़ मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही पूर्णा नदीला पुरेशे पाणी आले नाही़ परिणामी बंधाºयातही पाणीसाठा झाला नाही़ उन्हाळ्यामध्ये पुर्णेकरांसाठी सिद्धेश्वर प्रकल्प आणि निम्न दूधना प्रकल्पातून पाणी घेतले होते़ हा पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंत पुरविण्यात आला़ परंतु, आता मात्र बंधाºयातील पाणीसाठाही कमी झाला असून, आगामी काळात मोठा पाऊस झाला नाही तर शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे़दरम्यान, पूर्णा नगरपालिकेने उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याच्या हेतुने शहराला आठ दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा सुरू केला आहे़ ज्या भागात नळ योजना आहेत त्या ठिकाणी किमान आठ दिवसांना पाणी मिळते़ परंतु, नवीन वसाहतींमध्ये नळ योजना नसल्याने भर पावसाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ या भागातील हातपंपांना अजूनही पाणी आले नाही़ परिणामी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ शहराबरोबरच ग्रामीण भागातही उन्हाळ्यात निर्माण झालेली पाणी टंचाई कायम असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई