शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
2
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
4
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
5
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य
6
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
7
प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा
8
अनंत चतुर्दशी २०२५: घरच्या साहित्यात झटपट करा पेढ्याच्या चवीचे शाही मोदक; बाप्पा खुश आणि घरचेही 
9
रविवारपासून कोस्टल रोडवरही धावणार एसी बस; कोणकोणत्या स्टॉपवर थांबणार, भाडे किती?
10
झोमॅटो आणि स्विगीच्या ग्राहकांना बसणार फटका? डिलिव्हरी शुल्कावर लागणार नवा कर
11
मुरूम कशासाठी उपसला? कुर्ड गावातील नागरिकांनी सत्य सांगितले; अजितदादांनी मध्यस्ती करत पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले होते
12
खासदार इंजिनिअर राशिद तिहार कारागृहात ट्रान्सजेंडर्समुळे त्रस्त; 'ते' HIV पॉझिटिव्ह असल्याचा AIP चा दावा
13
Zara, Nike सारख्या सर्व परदेशी ब्रँड्सना सरकारचा झटका; एका निर्णयानं डोकेदुखी वाढली, खरेदीवर परिणाम होणार?
14
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
15
भारत-चीन ट्रम्प यांच्यावर त्यांचंच जाळ फेकणार; 'बाल्ड ईगल'ला झटका बसणार, लवकरच येणार नवी 'पेमेंट सिस्टम'?
16
Sri Lanka Bus Accident: पर्यटकांची बस थेट १००० फूट खोल दरीत कोसळली; १५ ठार, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
17
राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ सप्टेंबरला नागपूरमध्ये चिंतन शिबिर; कोणकोणत्या विषयांवर होणार चर्चा?
18
६ दिवसांत 'रॉकेट' बनला सेमीकंटक्टर कंपनीचा शेअर; पंतप्रधान मोदींचा या क्षेत्रावर आहे फोकस
19
Thane: बायकोने गर्लफेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं; नवऱ्याने ऐरोलीच्या खाडीत मारली उडी, पण...
20
एअरटेलचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन; एका वर्षासाठी मिळणार अनलिमिटेड बेनिफिट्स, काय-काय आहे?

परभणी : १७ लाख रुपयांची कुशल देयके मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:38 IST

मनरेगा योजनेंतर्गत शासनाकडून कामांची संख्या वाढविली जात असताना तालुक्यात गत वर्षी केलेल्या सिंचन विहीर आणि इतर कामांची १७ लाख रुपयांची कुशल देयके पाच महिन्यांपासून रखडली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : मनरेगा योजनेंतर्गत शासनाकडून कामांची संख्या वाढविली जात असताना तालुक्यात गत वर्षी केलेल्या सिंचन विहीर आणि इतर कामांची १७ लाख रुपयांची कुशल देयके पाच महिन्यांपासून रखडली आहेत.केंद्र शासनाने सुवर्ण जयंती रोजगार हमी योजना बंद करून २००८ पासून महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजना सुरू केली. २०१० पासून या योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली.ग्रामीण भागात मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच वैयक्तिक लाभाच्या योजना तसेच सार्वजनिक मालमत्ता तयार करण्याचा उद्देश समोर ठेऊन ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत ५० टक्के कामे यंत्रणास्तरावर आणि ५० टक्के कामे पंचायत समिती स्तरावर करण्याची तरतूद करण्यात आली आहे.राज्य शासनाने योजनेची अंमलबजावणी करताना गावनिहाय लेबर बजेट तयार करून कृती आराखडे तयार करण्यात आले.पंचायत समिती स्तरावर मागील काही वर्षात सिंचन विहिरींच्या कामांची मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. गतवर्षी २०१७-१८ आणि त्यापूर्वी मंजूर असलेल्या विहिरींची कामे पूर्ण झाली. तरीही आंबेगाव, भोसा, इरळद, कोल्हा, मांडेवडगाव, नागरजवळा, पोंहडूळ येथील लाभार्थ्यांची १७ लाख रुपयांची कुशल देयके रखडली आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांनी विहिरीचे कामे पूर्ण करून कागदपत्रे पंचायत समितीकडे सादर केली आहेत. मात्र देयके रखडल्याने लाभार्थी पंचायत समितीच्या चकरा मारीत आहेत. यामुळे लाभार्थ्यांना दुष्काळात संकटाचा सामना करावा लागत आहे.नवीन सिंचन विहिरींचे प्रस्तावमहात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींचा लाभ मिळावा, यासाठी तालुक्यातील बोंदरवाडी, कोल्हा, रामपुरी बु., मांडेवडगाव, नागरजवळा, किन्होळा, सोनूळा, मानवतरोड, गोगलगाव, ताडबोरगाव, जंगमवाडी, पाळोदी, वझूर बु., आंबेगाव, पोहंडूळ, सावळी, रामेटाकळी, कोल्हावाडी या १८ गावातील ६१ शेतकºयांनी पंचायत समितीकडे नव्याने प्रस्ताव दाखल केले आहेत. पंचायत समिती कार्यालयाने हे प्रस्ताव छाननी समितीकडे पाठविले आहेत.४समितीने हे प्रस्ताव मंजूर करून जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविले आहेत. या प्रस्तावावर दोन्ही अधिकाºयांच्या १८ डिसेंबर रोजी स्वाक्षºया झाल्या. हे ६१ प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविण्यातआले आहेत.४ मात्र जि.प.कडून प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने हे प्रस्ताव धूळ खात पडले आहेत. तेव्हा प्रस्तावांना तात्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणी लाभार्थी शेतकºयांकडून कली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकार