शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

परभणी : १७ लाख रुपयांची कुशल देयके मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:38 IST

मनरेगा योजनेंतर्गत शासनाकडून कामांची संख्या वाढविली जात असताना तालुक्यात गत वर्षी केलेल्या सिंचन विहीर आणि इतर कामांची १७ लाख रुपयांची कुशल देयके पाच महिन्यांपासून रखडली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : मनरेगा योजनेंतर्गत शासनाकडून कामांची संख्या वाढविली जात असताना तालुक्यात गत वर्षी केलेल्या सिंचन विहीर आणि इतर कामांची १७ लाख रुपयांची कुशल देयके पाच महिन्यांपासून रखडली आहेत.केंद्र शासनाने सुवर्ण जयंती रोजगार हमी योजना बंद करून २००८ पासून महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजना सुरू केली. २०१० पासून या योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली.ग्रामीण भागात मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच वैयक्तिक लाभाच्या योजना तसेच सार्वजनिक मालमत्ता तयार करण्याचा उद्देश समोर ठेऊन ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत ५० टक्के कामे यंत्रणास्तरावर आणि ५० टक्के कामे पंचायत समिती स्तरावर करण्याची तरतूद करण्यात आली आहे.राज्य शासनाने योजनेची अंमलबजावणी करताना गावनिहाय लेबर बजेट तयार करून कृती आराखडे तयार करण्यात आले.पंचायत समिती स्तरावर मागील काही वर्षात सिंचन विहिरींच्या कामांची मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. गतवर्षी २०१७-१८ आणि त्यापूर्वी मंजूर असलेल्या विहिरींची कामे पूर्ण झाली. तरीही आंबेगाव, भोसा, इरळद, कोल्हा, मांडेवडगाव, नागरजवळा, पोंहडूळ येथील लाभार्थ्यांची १७ लाख रुपयांची कुशल देयके रखडली आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांनी विहिरीचे कामे पूर्ण करून कागदपत्रे पंचायत समितीकडे सादर केली आहेत. मात्र देयके रखडल्याने लाभार्थी पंचायत समितीच्या चकरा मारीत आहेत. यामुळे लाभार्थ्यांना दुष्काळात संकटाचा सामना करावा लागत आहे.नवीन सिंचन विहिरींचे प्रस्तावमहात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींचा लाभ मिळावा, यासाठी तालुक्यातील बोंदरवाडी, कोल्हा, रामपुरी बु., मांडेवडगाव, नागरजवळा, किन्होळा, सोनूळा, मानवतरोड, गोगलगाव, ताडबोरगाव, जंगमवाडी, पाळोदी, वझूर बु., आंबेगाव, पोहंडूळ, सावळी, रामेटाकळी, कोल्हावाडी या १८ गावातील ६१ शेतकºयांनी पंचायत समितीकडे नव्याने प्रस्ताव दाखल केले आहेत. पंचायत समिती कार्यालयाने हे प्रस्ताव छाननी समितीकडे पाठविले आहेत.४समितीने हे प्रस्ताव मंजूर करून जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविले आहेत. या प्रस्तावावर दोन्ही अधिकाºयांच्या १८ डिसेंबर रोजी स्वाक्षºया झाल्या. हे ६१ प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविण्यातआले आहेत.४ मात्र जि.प.कडून प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने हे प्रस्ताव धूळ खात पडले आहेत. तेव्हा प्रस्तावांना तात्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणी लाभार्थी शेतकºयांकडून कली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकार