शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

परभणीचे तापमान ३४.५ अंशांवर : कूलर, पंख्यांचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:37 IST

वातावरणातील बदलामुळे पंधरा दिवसांपासून परभणीकर नागरिक हैराण झाले आहेत. वातावरणातील उकाडा दिवसेंदिवस वाढत असून, भर पावसाळ्यात नागरिक उन्हाळ्यासारखा असह्य उकाड्याचा अनुभव घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वातावरणातील बदलामुळे पंधरा दिवसांपासून परभणीकर नागरिक हैराण झाले आहेत. वातावरणातील उकाडा दिवसेंदिवस वाढत असून, भर पावसाळ्यात नागरिक उन्हाळ्यासारखा असह्य उकाड्याचा अनुभव घेत आहेत.जिल्ह्यात सध्या विचित्र वातावरण निर्माण झाले आहे. पहाटे हलकासा गारवा, दिवसभर कडक ऊन आणि रात्रीच्या वेळी उकाडा निर्माण होत असून, या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात वाढले आहे. सर्वसाधारणपणे ३० अंशावर असणारे कमाल तापमान ३५ अंशाच्या पुढे सरकल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचा पारा वाढत असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत कडक ऊन पडत आहे. अंगाला चटके देणारे आणि डोळे दीपवणारे ऊन नागरिकांना असह्य करीत आहेत. दीड महिन्यापासून पाऊस गायब असून, त्याची जागा कडक उन्हान घेतली आहे. हस्त नक्षत्रात सर्वसाधारणपणे ऊन तापतेच. आॅक्टोबर महिन्यात या नक्षत्राला सुरुवात होते. मात्र यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच ऊन तापू लागले आहे. वातावरणातील दमटपणाही वाढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत असून, नागरिक त्रस्त आहेत. शेतकऱ्यांना सध्या परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र पावसाऐवजी उन्हाची तीव्रताच वाढत चालल्याने जिल्हावासियांच्या चिंता वाढत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीTemperatureतापमान