शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

परभणी : माजलगावचे पोलीस पाथरीत तळ ठोकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:12 IST

रेशनचे २०० पोते धान्य माजलगाव पोलिसांनी पकडल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी माजलगावचे पोलीस पाथरीत दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. पोलिसांनी धान्याचे दस्ताऐवज ताब्यात घेतले आहेत. पाथरी येथील शासकीय गोदामाचा गोदामपाल शेख इम्रान हा गायब असल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : रेशनचे २०० पोते धान्य माजलगाव पोलिसांनी पकडल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी माजलगावचे पोलीस पाथरीत दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. पोलिसांनी धान्याचे दस्ताऐवज ताब्यात घेतले आहेत. पाथरी येथील शासकीय गोदामाचा गोदामपाल शेख इम्रान हा गायब असल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे.लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्य वितरणाची नवी पद्धत दोन महिन्यांपासून अंमलात आणली जात आहे. शासनाच्या गोदामातून थेट रेशन दुकानदारापर्यंत माल पोहचविण्यासाठी ठेकेदार नेमले आहेत. तसेच स्वस्तधान्य दुकानांमध्ये ई-पॉस मशीनचा वापर सुरु झाला आहे. धान्य पोहचविणाºया वाहनांवर जीपीएस प्रणाली देखील बसविली आहे. एवढे सर्व असताना स्वस्तधान्य दुकानातील माल काळ्या बाजारात जाण्याचा प्रकार माजलगाव पोलिसांनी उघड केला. दोनशे पोते धान्य असलेला टेंपो १३ फेब्रुवारी रोजी पकडला होता. हा टेंपो पाथरी तालुक्यात धान्य वितरणासाठी वापरला जात होता.माजलगाव पोलिसांनी पकडलेला टेंपो आणि त्यातील माल तपासण्यासाठी पाथरीच्या पुरवठा विभागातील नायब तहसीलदार निलेश पळसकर यांना माजलगाव येथे बोलावून मालाची सत्यता तपासण्यात आली. माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत माजलगावचे पोलीस दोन दिवसांपासून पाथरीत तळ ठोकून आहेत. शासकीय गोदामातील धान्याची तपासणी सुरु आहे. दरम्यान, धान्य गोदामाचा गोदामपाल शेख इम्रान कोणतीही रजा न देता गायब झाल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे. या धान्य गोदामाचा अतिरिक्त पदभार बी.के.घनसावंत यांच्याकडे देण्यात आला आहे.शासकीय धान्य गोदाम आणि १४ स्वस्तधान्य दुकानदारांना वितरित केलेले धान्य याचा ताळमेळ जुळत असल्याचे सांगितले जात आहे. असे असेल तर पाथरी येथील टेंपोमध्ये पकडलेले धान्य आले कोठून असा सवाल उपस्थित होत आहे.माजलगाव पोलिसांच्या कारवाईनंतर पाथरी येथील पुरवठा विभागाने फेब्रुवारी महिन्यात वितरित केलेल्या १४ स्वस्तधान्य दुकानांची चौकशी केली. त्याचा अहवालही जिल्हा पुरवठा विभागाला पाठविला आहे, अशी माहिती तहसीलदार वासुदेव शिंदे यांनी दिली.