शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 23:03 IST

जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर रविवारी सकाळपासूनच शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच सेवाभावी संस्था, व्यापारी, अधिकारी या लढ्यात सहभागी झाले. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यास यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर रविवारी सकाळपासूनच शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच सेवाभावी संस्था, व्यापारी, अधिकारी या लढ्यात सहभागी झाले. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यास यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.परभणी शहरात पहाटेपासूनच जनजीवनाला प्रारंभ होतो. रविवारी ही सर्व कामे ठप्प ठेवण्यात आली. कृषी विद्यापीठ, राजगोपालाचारी उद्यान, जिल्हा स्टेडियम या भागात पहाटे देखील कोणी फिरकले नाही. सकाळी ७ वाजेच्या सुमारास मात्र दुधविक्रेते, भाजी विक्रेते काही भागात दिसून आली. वृत्तपत्रही नियमितपणे वेळेवर नागरिकांच्या घरात पोहचले. यासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांनीही तेवढा वेळ देऊन त्यानंतरचा वेळ मात्र घरातच राहणे पसंद केले. त्यामुळे सकाळच्या सुमारास दिसणारी हलकीशी वर्दळ ९ वाजेनंतर मात्र थांबली. एरव्ही सकाळी १० वाजता बाजारपेठेत गजबज सुरु होते. मात्र रविवारी कुठेही ही गजबज पहावयास मिळाली नाही. गुजरी बाजार, शिवाजी चौक, कच्छी बाजार, क्रांती चौक, स्टेशनरोड, स्टेडियम कॉम्लेक्स, शिवाजी कॉम्प्लेक्स, जनता मार्केट या भागातील दुकाने कडकडीत बंद होते. कुठलेही आवाहन न करता किंवा कुणाच्याही दबावाखाली न येता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात सहभाग नोंदविला.येथील रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि जिल्हा रुग्णालयातही प्रथमच शुकशुकाट पहावयास मिळाला. दिवसभरामध्ये परभणी बसस्थानकावरुन एकही बस बाहेरगावी धावली नाही. रेल्वे स्थानकावर मात्र सकाळच्या सुमारास चार रेल्वे दाखल झाल्या. त्यामध्ये रामेश्वर- ओखा, हैदराबाद- औरंगाबाद, पनवेल एक्सप्रेस आणि देवगिरी एक्सप्रेस या रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. मात्र या गाड्यांमधून बोटावर मोजण्याइतकेच प्रवासी परभणी रेल्वेस्थानकावर उतरले. त्यानंतर मात्र दिवसभर रेल्वेस्थानक सुनसान पडले होते. जिल्हा रुग्णालयातही रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांची गर्दी गायब असल्याचे दिसून आले.परभणी शहरासह ग्रामीण भागातही याच पद्धतीने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग नोंदविला. दिवसभरात एकाही शहरातून बसेस धावल्या नाहीत. बाजारपेठेमध्ये बंद पाळण्यात आला. त्यामुळे कोरोना या आजाराची धास्ती आता सर्वसामान्यांनी घेतली असून या आजाराविरुद्ध लढा यशस्वी करायचा असेल तर अलिप्त राहणे हा एकमेव उपाय आहे, याची जाण नागरिकांना झाली आहे. रविवारी हेच नागरिकांनी दाखवून दिले. दरम्यान, सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरात सर्वच वसाहतींमध्ये नागरिकांनी घराबाहेर पडून टाळ्या वाजवत तसेच थाळीनाद करीत कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये सहभाग नोंदविलेल्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, विविध प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतरही नागरिक घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे रविवारी संपूर्ण दिवसभर शहर शांत राहिले. या काळात पोलीस प्रशासनाने शहरामध्ये गस्त घालून आणि फिक्स पॉर्इंटवर बंदोबस्त लावला होता.

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्या