शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: वाहतूक सुरू होण्यापूर्वीच सिमेंट रस्त्याला भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 00:19 IST

कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून वाहनधारकांना दर्जेदार रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहे; परंतु, कंत्राटदार व अभियंत्यांच्या उदासिन भूमिकेचा फटका या रस्त्यांच्या कामाला बसत आहे़ परभणी-गंगाखेड या महामार्गाचे काम सध्या सुरू आहे़. या महामार्गाचे काम पुर्ण होऊन त्यावर वाहने धावण्यापूर्वीच या रस्त्याला परभणी तालुक्यातील दैठणा ते धारासूर या दरम्यान भेगा पडल्याचे वास्तव समोर आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून वाहनधारकांना दर्जेदार रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहे; परंतु, कंत्राटदार व अभियंत्यांच्या उदासिन भूमिकेचा फटका या रस्त्यांच्या कामाला बसत आहे़ परभणी-गंगाखेड या महामार्गाचे काम सध्या सुरू आहे़. या महामार्गाचे काम पुर्ण होऊन त्यावर वाहने धावण्यापूर्वीच या रस्त्याला परभणी तालुक्यातील दैठणा ते धारासूर या दरम्यान भेगा पडल्याचे वास्तव समोर आले आहे़परभणी जिल्ह्यातील महामार्गासह ग्रामीण रस्त्यांची बकाल अवस्था झालेली आहे़ त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातून जाणाऱ्या महामार्गांचे काम तातडीने हाती घेवून नागरिकांना दर्जेदार व गुळगुळीत रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी जोर धरू लागली़ त्यानंतर राज्य व केंद्र शासनाने जिल्ह्यातील नागरिकांची रस्त्याबद्दलची मागणी लक्षात घेता परभणी-गंगाखेड, जिंतूर-परभणी, परभणी- पाथरी व परभणी- वसमत या चारही महामार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे सुरू केली़ त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही मंजूर केला़ या चार महामार्गापैकी परभणी- पाथरी या महामार्गाचे काम अंतीम टप्प्यात आहे तर उर्वरित तीन महामार्गांचे काम प्रगतीपथावर आहे़केंद्र व राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केल्याने नागरिकांच्या मागणीप्रमाणे दर्जेदार रस्ते उपलब्ध होतील, अशी अपेक्षा जिल्हावासियांना आहे; परंतु, परभणी-गंगाखेड या महामार्गाची पाहणी केली असता, परभणी तालुक्यातील दैठणा ते धारासूर या परिसरामध्ये तयार होत असलेल्या सिमेंट रस्त्याला वाहने धावण्यापूर्वीच भेगा पडल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे या रस्त्यासाठी मंजूर असलेल्या २०३ कोटी रुपयांच्या निवीतून होत असलेल्या कामांवर कंत्राटदार व अभियंत्यांचे लक्ष नाही की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे़ या कामांकडे राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात की काय? असा सवाल वाहनधारक व नागरिकांतून उपस्थित केला जात आहे़वाहने धावण्यापूर्वीच सिमेंट रस्त्याला जर भेगा पडत असतील तर हा रस्ता राज्य व केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीपर्यंत टिकेल की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी होत असलेल्या रस्त्याच्या कामांची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे़राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे गुणवत्तेकडे दुर्लक्ष ?४परभणी- गंगाखेड हा राष्ट्रीय महमार्ग आहे़ त्यामुळे या रस्त्यावरून २४ तास दुचाकीसह अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते़ त्यामुळे या रस्त्याचे काम करताना आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे़; परंतु, या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असताना दैठणा ते धारासूर परिसरात सिमेंट रस्त्यावर भेगा पडल्या आहेत़ त्यामुळे संबंधित कामाच्या दर्जाबाबत वाहनधाकांमधून साशंकता व्यक्त केली जात आहे़काळ्या मातीचा वापर का?४परभणी-गंगाखेड या महामार्गाचे खोदकाम झाल्यानंतर पक्का मुरूम टाकून दबाई करणे आवश्यक होते; परंतु, या महामार्गाची दबाई करताना काळ्या मातीचा वापर होत असल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या होत्या़४मात्र त्याकडे संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केले़ त्यामुळे परभणी-गंगाखेड या महामार्गावरून वाहने धावण्यापूर्वीच व रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच तडे जात आहेत़४त्यामुळे रस्त्याची दबई करताना पक्क्या मुरूमाऐवजी सर्रास काळ्या मातीचा वापर झाला की काय ? हा रस्ता तयार करताना सिमेंट, गिट्टी व गज या तिन्हींचा आवश्यक तेवढा वापर झाला की नाही? याबाबत नागरिक व वाहनधारकांतून सवाल उपस्थित केला जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीroad transportरस्ते वाहतूकState Governmentराज्य सरकार