शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी:जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालय सलाईनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:04 IST

येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक मागील एक महिन्यापासून फिरकले नाहीत. त्याचप्रमाणे औषधींचा तुटवडा, ठिकठिकाणी असणारी अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व विस्कटलेली प्रशासन व्यवस्था या ग्रामीण रुग्णालयातील सेवाच सलाईनवर असल्याची भावना रुग्णांमध्ये निर्माण होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक मागील एक महिन्यापासून फिरकले नाहीत. त्याचप्रमाणे औषधींचा तुटवडा, ठिकठिकाणी असणारी अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व विस्कटलेली प्रशासन व्यवस्था या ग्रामीण रुग्णालयातील सेवाच सलाईनवर असल्याची भावना रुग्णांमध्ये निर्माण होत आहे.येथील ग्रामीण रुग्णालयात सहा महिन्यांपूर्वी मुंंंबई येथून वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. दोंडे यांची नियुक्ती झाली. सुुरुवातीला दोन-चार दिवस राहिल्यानंतर महिन्यातील चार दिवस जिंतूरला राहून उर्वरित दिवसाचा कारभार मुंबई येथून बघायचा, हे नित्याचेच झाले आहे. वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालयात नसल्याने इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नाही. ग्रामीण भागातील सर्वाधिक रुग्ण या रुग्णालयात येतात; परंतु, त्यांना योग्य उपचार मिळत नसल्याने अनेकांना खाजगी दवाखान्याचा सहारा घ्यावा लागतो.विशेष म्हणजे ग्रामीण रुग्णालयाची अवस्था दयनीय झाली आहे. त्याच बरोबर औषधींचा तुटवडा जानवत असून बॅडेंंज पट्टीपासून ते दररोज रुग्णांना लागणारी कोणतीच औषधी रुग्णालयात नाहीत. अनेक डॉक्टर रुग्णांना बाहेरून औषधी आणण्यास भाग पाडतात. दररोज येणाऱ्या रुग्णांची तपासणी व्हिजीट डॉक्टरांकडून करून घेण्यात येते. तज्ज्ञ डॉक्टर ओपीडी काढत नसल्याने नियमित रुग्णांची तपासणी करण्यासाठी आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आदी डॉक्टरांचा सहारा घ्यावा लागत आहे. विशेष म्हणजे दवाखान्यामध्ये रुग्णाला पिण्यासाठी पाणी सुद्धा नाही. रुग्णांचे हाल प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. रुग्णांच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. तीनच स्वच्छता कर्मचारी असल्याने रुग्णालयात दुर्गंधी पसरली आहे. ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे, शौचालयातील स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे.या सर्व प्रकाराकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. या शिवाय रुग्णालयातील अनेक विभागात डॉक्टरांची गरज असते. तात्पुरत्या सेवा देणारे डॉक्टर खाजगी सेवा देण्यास जास्त महत्त्व देत असल्याने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या रुग्णालयातील मोडकळीस आलेला कारभार सुधारावा, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकातून होत आहे.रुग्णालय रामभरोसे४जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मुंबईत असल्याने रुग्णालयातील कर्मचारी, सफाई कामगार व इतर रुग्ण सेवक यांच्यावर नियंत्रण राहिले नाही. कोणताही कर्मचारी केव्हाही निघून जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयास प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रकाश डाके व आपण स्वत: भेट देऊन रुग्णालयातील कारभारात तातडीने सुधारणा करण्याबाबत सूचना ्रकेल्या आहेत. तात्पुरत्या स्वरुपात रविकांत चांडगे यांना कारभार पाहण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.-रिझवान काझी,निवासी शल्य चिकित्सक, परभणी

टॅग्स :parabhaniपरभणीhospitalहॉस्पिटल