शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

परभणी : गारपीट नुकसानीसाठी ५८ कोटी रुपयांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:43 AM

दोन आठवड्यापूर्वी जिल्ह्यात गारपीटीने शेती पिके आडवी झाली होती. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून, ६६ हजार ८८३ हेक्टरवरील पिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी ५८ कोटी ३२ लाख रुपयांची मागणी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे नोंदविली आहे.

प्रसाद आर्वीकर।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दोन आठवड्यापूर्वी जिल्ह्यात गारपीटीने शेती पिके आडवी झाली होती. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून, ६६ हजार ८८३ हेक्टरवरील पिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी ५८ कोटी ३२ लाख रुपयांची मागणी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे नोंदविली आहे.११, १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. निसर्गाच्या या संकटात हातातोंडाशी आलेली पिके हातची गेली होती. त्यामुळे शेतकºयांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. पहिल्या दिवशी जिंतूर आणि सेलू तालुक्यात, दुसºया दिवशी परत सेलू, पूर्णा तालुक्यात आणि त्यानंतर गंगाखेड, पालम, सोनपेठ या तालुक्यात गारपीटीने थैमान घातले होते. रबीचा हंगाम अंतिम चरणात आहे. गहू, ज्वारी ही पिके वाढीस लागली होती तर हरभरा काढणीला आला होता. गारपीटीने ही सर्व पिके आडवी झाली. तसेच बागायती आणि फळ पिकांनाही गारपीटीचा फटका सहन करावा लागला होता.जिल्हा प्रशासनाने गारपीट झाल्यानंतर लगेच प्राथमिक अहवाल नोंदवित प्रत्यक्ष पंचनाम्यांनाही सुरुवात केली होती. हे पंचनामे पूर्ण झाले असून, २२ फेब्रुवारी रोजी अंतिम अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. या अहवालानुसार सेलू, सोनपेठ, गंगाखेड आणि जिंतूर या चार तालुक्यातील ३० हजार १८५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकºयांना मदत देण्यासाठी २५ कोटी १० लाख रुपयांची आवश्यकता लागणार आहे. त्याचप्रमाणे सेलू, सोनपेठ, गंगाखेड, पालम आणि पूर्णा या पाच तालुक्यात ३६ हजार ६७८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, नुकसान भरपाईसाठी ३३ कोटी २२ लाख रुपयांची आवश्यकता लागणार आहे. तालुकानिहाय नुकसानीसह लागणाºया नुकसान भरपाई रकमेची मागणी जिल्हा प्रशासनाने नोंदविली आहे. त्यामुळे राज्य शासन आता प्रत्यक्षात किती नुकसान भरपाई देते, याकडे लक्ष लागले आहे.पालम तालुक्यात सर्वाधिक नुकसान४जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी केलेल्या प्रत्यक्ष पंचनाम्यामध्ये पालम तालुक्यात गारपीटीने पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे.४या तालुक्यातील २४ हजार ९२८ हेक्टरवरील पिके गारपीटीच्या भक्ष्यस्थानी पडली. विशेष म्हणजे, या सर्व पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, त्यासाठी २१ कोटी ८२ लाख रुपयांची मागणी नोंदविण्यात आली. त्या खालोखाल गंगाखेड तालुक्यामध्ये १५ हजार ५०५ हेक्टर क्षेत्रावरील पिके गारपीटीने आडवी झाली. या पिकांचे ३३ ते ५० टक्क्यांपर्यंतचे नुकसान झाले आहे. त्यासाठी १३ कोटी २९ लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे नोंदविली आहे.