शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

परभणी: दलितवस्ती विकासासाठी ५७६ लाख रुपये मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 00:41 IST

जिल्ह्यातील दलितवस्त्यांमध्ये लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या विकासकामांसाठी ५ कोटी ७६ लाख रुपयांच्या निधीला राज्य शासनाकडून तत्वत: मंजुरी देण्यात आली असून त्यातील २ कोटी ३० लाख रुपयांचा निधी जिल्ह्याला वितरित करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील दलितवस्त्यांमध्ये लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या विकासकामांसाठी ५ कोटी ७६ लाख रुपयांच्या निधीला राज्य शासनाकडून तत्वत: मंजुरी देण्यात आली असून त्यातील २ कोटी ३० लाख रुपयांचा निधी जिल्ह्याला वितरित करण्यात आला आहे.राज्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती/गावांचा विकास करण्यासाठी तसेच या भागाला मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी २०१८-१९ या वर्षात सूचविलेल्या कामांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत मंजुरी देण्याचा निर्णय राज्याच्या समाजकल्याण विभागाने घेतला होता.त्यानुसार जिल्ह्यातील आमदार व खासदारांनी राज्य शासनाकडे ५ कोटी ७६ लाख रुपयांची कामे सूचविली होती. त्यानुसार शासनाने सदरील कामांना तत्वत: दोन आदेशाद्वारे मंजुरी दिली आहे. त्यामध्ये पहिल्या आदेशात ३५ लाख रुपयांच्या कामांचा समावेश असून दुसऱ्या आदेशात ५ कोटी ४१ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. पहिल्या आदेशातील ३५ लाखांपैकी १४ लाख रुपयांचा निधी जिल्ह्याच्या खात्यावर वर्ग करण्यात आला असून दुसºया आदेशातील ५ कोटी ४१ लाखांपैकी २ कोटी १६ लाख ४० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित निधी काही कालावधीनंतर जिल्ह्यांना देण्यात येणार आहे.या निधीमधून ग्रामीण व नागरी भागातील अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये रस्ते, नाली, पाण्याची व्यवस्था, सामाजिक सभागृह आदी कामे करता येणार आहेत. त्यामुळे या भागातील विकासकामाला चालना मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींना राज्य शासनाकडून निधी देण्यात आल्याने निश्तिच त्याचा फायदा या लोकप्रतिनिधींना होणार आहे.परभणी शहरात दलितवस्त्यांच्या निधीचा इतरत्र वापर ?४जिल्हा नियोजन समितीने दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत परभणी महानगरपालिकेला १४ कोटी रुपये, जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांना १२ कोटी रुपये आणि जिल्हा परिषदेला ११ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. परभणी मनपाला देण्यात आलेल्या निधीतील जवळपास ६ कोटी ७० लाख रुपयांच्या कामाचे आदेश नुकतेच काढण्यात आले. त्यातील अनेक कामे दलितवस्त्यांऐवजी इतर वस्त्यांमध्ये केली जात जात असल्याची चर्चा नगरसेवकांमधून सुरु झाली आहे.४त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियमानुसार दलितवस्त्यांच्या विकासकामांसाठी आलेला निधी त्याच भागात खर्च करणे बंधनकारक आहे. असे असतानाही दलितवस्त्यांच्या नावाखाली इतर ठिकाणी निधी खर्च होत असल्याच्या तक्रारी होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधीGovernmentसरकार