शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
3
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
4
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
5
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
6
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
7
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
8
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
9
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
10
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
11
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
12
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
13
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
14
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
15
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
16
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
17
अपघात, रोग आणि चिंता होईल दूर! फक्त करा प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले ५ 'रामबाण' उपाय
18
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
19
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
20
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : हा कसला रस्ता सुरक्षा सप्ताह ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:32 IST

शहरातील वाहतुकीची समस्या मागील अनेक वर्षांपासून गंभीर झालेली असताना या समस्यांना बगल देत जिल्हाभरात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. शहरातील वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. सिग्नलचा प्रश्न, पार्किंगचा प्रश्न अनेक वर्षापासून रखडलेले आहेत. वाहतूक सुरक्षा सप्ताहात या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील वाहतुकीची समस्या मागील अनेक वर्षांपासून गंभीर झालेली असताना या समस्यांना बगल देत जिल्हाभरात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. शहरातील वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. सिग्नलचा प्रश्न, पार्किंगचा प्रश्न अनेक वर्षापासून रखडलेले आहेत. वाहतूक सुरक्षा सप्ताहात या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.जिल्हाभरात रस्ता सुरक्षा अभियान साजरे केले जात आहे. या अभियानांतर्गत ठिकठिकाणी मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करुन त्यात सुरक्षित वाहतुकीसाठी नागरिकांना आवाहन केले जात आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही केल्या जात आहेत. याबाबी आवश्यक असल्या तरी प्रशासकीयस्तरावर मात्र सुरळीत व सुरक्षित वाहतुकीसाठी ठोस पाऊले उचलली जात नाहीत. शहरामध्ये मागील अनेक दिवसांपासून वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. जागोजागी वाहतुकीचा खोळंबा होतो. परंतु, पोलीस प्रशासन मात्र या समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढत नसल्याने त्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहेत.परभणी शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी १० वर्षांपूर्वी मुख्य चौकांमध्ये सिग्नल्स बसविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, बसस्थानक, जांब नाका, नारायण चाळ या ठिकाणी बसविलेले सिग्नल अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. हे सिग्नल सुरु करण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासन दोन्ही विभाग पुढाकार घेत नाहीत. परिणामी वर्षानुवर्षापासून लाखो रुपयांची ही यंत्रणा शहरात धूळखात उभी आहे. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे.शनिवारी शहरातील वाहतुकीसंदर्भात पाहणी केली असता हीच परिस्थिती दिसून आली. शहरातील वाहनधारक नियमांचे पालन करीत नाहीत आणि नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई होत नाही. त्यामुळे जागोजागी वाहतुकीचे नियम मोडत वाहने भरधाव वेगाने चालविली जातात. परिणामी शहरातील वाहतूक असुरिक्षत झाल्याचे दिसत आहे. शनिवारी केलेल्या पाहणीत नानलपेठ परिसरातून शिवाजी चौकात येण्यासाठी प्रवेशबंदी असतानाहीे अनेक वाहनधारकांनी सर्रास व बिनधोकपणे विरुद्ध मार्गाने वाहने चालविल्याचे दिसून आले. त्याच प्रमाणे बाजारपेठ भागामध्ये सकाळी १० वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेशबंदी आहे. असे असताना बाजारपेठेच्या रस्त्यावर अनेक जड वाहने धावताना दिसून आली.पोलीस प्रशासनाने याविरुद्ध कारवाई केली तरी वाहतुकीची समस्या निकाली निघू शकते. मात्र शहरात रस्ता सुरक्षा सप्ताहातही वाहतूक नियम डावलणाºया वाहनधारकांवर कारवाई होत नसल्याचे पहावयास मिळाले.दरम्यान, शहरातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठस्तरावरुन पाऊले उचलावीत, अशी मागणी होत आहे.पार्किंगच्या समस्येवर निघेना तोडगाशहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये वाहतुकीचा खोळंबा होण्याचे प्रमाण अधिक आहे. अलीकडच्या काही दिवसांत नारायणचाळ भागात ही समस्या वाढत चालली आहे. या ठिकाणी दररोज वाहतुकीचा खोळंबा होतो. वाहने अडकून पडतात तर शनिवारी बाजाराचा दिवस असल्याने नानलपेठ, कच्छी बाजार, गुजरी बाजार या भागात वाहतुकीचा खोळंबा होत आहे. बाजारपेठ भागात पार्किंगची व्यवस्था नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे. दुकानांसमोर रस्त्यावर लावलेली वाहने, हातगाडे यामुळे वाहतुकीसाठी रस्ता शिल्लक राहत नाही. परिणामी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. पाच वर्षांपुर्वी शहरात सम आणि विषम तारखांना पी-१, पी २ पार्किंगचे नियोजन केले होते. बाजारपेठेमध्ये आजही हे फलक दिसून येतात. परंतु, त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही. पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या समन्वयातून पार्किंगच्या जागा निश्चित केल्या तर वाहतुकीची समस्या निकाली निघू शकते.

टॅग्स :parabhaniपरभणीroad safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी