शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

परभणी ; प्रशासकीय सोयीसाठी पुनर्रचना, १३ मंडळे, ७३ सज्जांची नव्याने निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:30 IST

जिल्ह्यातील महसूलचा कारभार अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली १३ महसूल मंडळांसह ७६ तलाठी सज्जांची नव्याने निर्मिती केली जात आहे. या नवीन महसूल विभागांची पुनर्रचनाही झाली असून, प्रशासनाने प्रारुप आराखडा तयार केला आहे. फेब्रुवारी महिन्यात या नव्या पूनर्रचनेला अंतिम मान्यता दिली जाणार आहे.

प्रसाद आर्वीकर।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील महसूलचा कारभार अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली १३ महसूल मंडळांसह ७६ तलाठी सज्जांची नव्याने निर्मिती केली जात आहे. या नवीन महसूल विभागांची पुनर्रचनाही झाली असून, प्रशासनाने प्रारुप आराखडा तयार केला आहे. फेब्रुवारी महिन्यात या नव्या पूनर्रचनेला अंतिम मान्यता दिली जाणार आहे.परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा कारभार यापूर्वी ४० मंडळ कार्यालये आणि २४६ तलाठी सज्जांमार्फत चालाविला जात होता. त्यामुळे एका सज्जांतर्गत १० ते १५ गावांचा समावेश असल्याने अनेक वेळा शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागत असे. यावर मात करण्यासाठी मंडळ कार्यालये आणि तलाठी सज्जांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.राज्यात नवीन तलाठी सज्जे आणि महसूली मंडळांची निर्मिती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार परभणी जिल्ह्यात तलाठी सज्जे आणि महसुली मंडळांची पुनर्रचना करण्यात आली आहे. पूर्वी जिल्ह्यात ४० महसूल मंडळ कार्यालय आणि २४६ तलाठी सज्जांवरुन महसूलचा कारभार चालविला जात असे. नव्याने केलेल्या पुनर्रचनेत १३ महसूल मंडळ आणि ७६ तलाठी सज्जांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात ५३ मंडळ कार्यालय आणि ५२२ तलाठी सज्जांची निर्मिती होणार आहे.या पुनर्रचनेमुळे मंडळ कार्यालय आणि तलाठी सज्जांच्या अंतर्गत गावांची संख्या कमी होणार असल्याने ग्रामस्थांना महसूल प्रशासनाचे लाभ वेळेत देणे सोयीचे होणार आहे.जिल्ह्यात महसूल मंडळ आणि तलाठी सज्जाचे पूनर्रचनेचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मंडळांची पूनर्रचना करण्यात आली असून १५ फेब्रुवारी रोजी या नवीन महसूल मंडळ व तलाठी सज्जांना अंतिम मंजुरी दिली जणार आहे. तलाठी सज्जांच्या स्थापनेचा कार्यक्रम यापूर्वीच पूर्ण झाला आहे.३१ आॅक्टोबर रोजी तलाठी सज्जांची अंतिम अधिसूचनाही प्रसिद्ध झाली आहे. तर नवीन महसूल मंडळाच्या संदर्भात अंतिम अधिसूचना १५ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार आहे. जिल्ह्यात महसूल मंडळ कार्यालय आणि तलाठी सज्जांची संख्या वाढल्याने प्रशासन जास्तीत जास्त ग्रामस्थांपर्यंत पोहोचणे सोयीचे होणार आहे.