शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कृषी विद्यापीठातील भरती वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:22 IST

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात वर्ग ३ व वर्ग ४ च्या रिक्त पदासाठी राबविण्यात येत असलेली भरती प्रक्रिया वादात सापडली आहे. या प्रक्रियेमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली नसल्याच्या कारणावरून केलेल्या तक्रारीनंतर कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रक्रियेला स्थगिती दिली असल्याची माहिती माजी आ.विजय गव्हाणे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात वर्ग ३ व वर्ग ४ च्या रिक्त पदासाठी राबविण्यात येत असलेली भरती प्रक्रिया वादात सापडली आहे. या प्रक्रियेमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली नसल्याच्या कारणावरून केलेल्या तक्रारीनंतर कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रक्रियेला स्थगिती दिली असल्याची माहिती माजी आ.विजय गव्हाणे यांनी दिली.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने सध्या २०१४ मधील कृषी सहाय्यक पदवीधर, कृषी सहाय्यक पदविकाधारक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक गृहविज्ञान या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मूळात ही भरती प्रक्रियाच कृषी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने चुकीच्या पद्धतीने राबविण्यात येत असल्याची तक्रार विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य अजय गव्हाणे यांनी कुलगुरु डॉ.अशोक ढवन यांच्याकडे केली होती. या प्रक्रियेत मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आलेली नाही. शिवाय कृषी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कृषी सहाय्यक पदवीधर पदासाठी जी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांना व मागास प्रवर्गातील प्रकल्पग्रस्तांना जाणूनबुजून डावलण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या अनुषंगाने दाखल याचिके अंतर्गत जाहिरातीला कायमची स्थगिती देण्यात आली होती. २६ आॅगस्ट २००९ च्या प्रकल्पग्रस्तांच्या जाहिरातीप्रमाणे जोपर्यंत भरती होणार नाही. तोपर्यंत ही स्थगिती दिली होती. यावर विद्यापीठाच्या पूनर्विचार याचिकेमध्ये न्यायालयाने २००९ च्या जाहिरातीप्रमाणे प्रकल्पग्रस्तांची पदभरती करावी, असे आदेशित केले असताना ते न करता २०१४ च्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु केली व लेखी परीक्षा घेतली. सदर जाहिरातीमध्ये प्रकल्पग्रस्तांचे आरक्षण ५० टक्के असायला हवे होते. तसे न करता ५ टक्के आरक्षण ठेवले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाचा अवमान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते.याच अनुषंगाने माजी आ.विजय गव्हाणे यांनीही कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांना २८ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे भेटून निवेदन दिले होते. यावेळी त्यांनी शासनाच्या एससीबीसीचे १६ टक्के आरक्षण डावलून व न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची पायमल्ली करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेस स्थगिती देण्यात यावी, अशीही मागणी माजी आ.गव्हाणे यांनी निवेदनाद्वारे केली होती. संबंधित निवेदनावरच कृषीमंत्री पाटील यांनी कुलगुरुंच्या नावाने शेरा लिहून सदरील भरती प्रक्रियेस तातडीने स्थगिती देऊन कायद्याप्रमाणे कार्यवाही करावी, असे नमूद केले असल्याचे गव्हाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तशी मूळ पत्रही त्यांनी कुलगुरु डॉ.ढवन यांना दिली असल्याचे सांगितले.दरम्यान, माजी आ.गव्हाणे यांनी सदरील भरती प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली असल्याचे सांगितले असले तरी विद्यापीठ प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे या भरती प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम कायम आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ