शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

परभणी : प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पावन झालेली रामपुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:05 IST

प्रभू श्रीराम वनवासात असताना मानवत तालुक्यातील रामपुरी परिसरात काही काळ ते वास्तव्याला होते. त्यामुळेच या गावाला रामपुरी, असे नाव पडले. त्याचबरोबर याठिकाणी हनुमानाची एकूण बारा मंदिरे आहेत, त्यामुळे बारा हनुमंतांची रामपुरी, अशी या गावाची ओळख आहे.

प्रसाद आर्वीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: प्रभू श्रीराम वनवासात असताना मानवत तालुक्यातील रामपुरी परिसरात काही काळ ते वास्तव्याला होते. त्यामुळेच या गावाला रामपुरी, असे नाव पडले. त्याचबरोबर याठिकाणी हनुमानाची एकूण बारा मंदिरे आहेत, त्यामुळे बारा हनुमंतांची रामपुरी, अशी या गावाची ओळख आहे.गोदावरी नदीच्या काठावर हे गाव वसलेले आहे. सुपीक जमीन, गोदावरीच्या प्रवाहामुळे पाण्याची मुबलक सुविधा अशी नैसर्गिक सुबत्ता गाव परिसरात आहे. या गावाला पौराणिक महत्त्व प्राप्त झाले असून गावाच्या शिवारामध्ये प्रभू श्री रामचंद्राचे वास्तव्य असल्याचे दाखले पुराणात मिळतात. गावातील हनुमानाच्या मुख्य मंदिरासोबतच मोठा मारुती, नवरा हनुमान, दसरा हनुमान, शनी हनुमान अशी गावामध्ये पाच हनुमानाची मंदिरे आहेत तर परिसरातील शेतशिवारात सहा मंदिरे असून, या मंदिरामुळेच या गावाला बारा हनुमंताची रामपुरी, अशी ओळख निर्माण झाली, अशी माहिती कांता महाराज जोशी, नारायण पुजारी यांनी दिली. या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अमृता आणि पवित्रा या दोन नद्या या ठिकाणी गोदावरी नदीत मिसळतात. त्यामुळे नद्यांचा त्रिवेणी संगम येथे आहे. हनुमान मंदिराबरोबरच गावांमध्ये महादेव मंदिरांचीही शृंखला पाहावयास मिळते. त्यात स्वयंभू मूर्ती असलेले मल्लीकर्जून मंदिर, पापदंडेश्वर, खंडेश्वर, रामेश्वर, काशी विश्वेश्वर, खंडेश्वर, गोकर्णेश्वर, नर्मदेश्वर अशी महादेवाचे मंदिर या ठिकाणी आहेत. या सर्व मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. पुरातन मंदिरामुळे या गावाला मोठा पौराणिक वारसा निर्माण झाला आहे.अधिकाऱ्यांचे गाव म्हणूनही ओळख४परभणी शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर मानवत तालुक्यात गोदावरी नदीच्या तीरावर वसलेल्या रामपुरी या गावाला पौराणिक वारस्यामुळे मूळ ओळख असली तरी येथील गावकऱ्यांनी या गावाला अधिकाºयांचे गाव, अशी नवी ओळख प्राप्त करून दिली आहे. गावातील युवकांनी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून राज्यातल्या विविध भागात प्रशासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे.४येथील रहिवासी असलेले अनेकजण प्रशासनात ठिक ठिकाणी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या अधिकाºयांची गावाशी अजूनही बांधीलकी असून प्रत्येक महिन्यात ते या ठिकाणी येऊन सामाजिक उपक्रम राबवितात. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्यामुळे शासकीय नोकरीमध्ये दाखल होणाºया अधिकाºयांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे. त्यामुळेच या गावाला आता अधिकाºयांचे गाव म्हणूनही ओळख प्राप्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीReligious Placesधार्मिक स्थळे