शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

परभणी : कुशलच्या देयकांसाठी ७२ लाखांचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:09 IST

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या सिंचन विहिरींची कुशल देयके अदा करण्यासाठी जिल्हा परिषदेने ७२ लाख रुपयांचा प्रस्ताव ग्रामीण विकास विभागाकडे पाठविला आहे़ मात्र हा निधी अद्याप उपलब्ध झाला नसल्याने हजारो लाभार्थी विहिरीचे काम पूर्ण होऊनही आर्थिक लाभापासून वंचित राहिले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या सिंचन विहिरींची कुशल देयके अदा करण्यासाठी जिल्हा परिषदेने ७२ लाख रुपयांचा प्रस्ताव ग्रामीण विकास विभागाकडे पाठविला आहे़ मात्र हा निधी अद्याप उपलब्ध झाला नसल्याने हजारो लाभार्थी विहिरीचे काम पूर्ण होऊनही आर्थिक लाभापासून वंचित राहिले आहेत़महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषदेला सिंचन विहीर बांधकामाचे उद्दिष्ट दिले जाते़ २००८ मध्ये जिल्ह्यात ही योजना राबविण्यास सुरुवात झाली़ ९ तालुक्यांसाठी १२ हजार ७१३ सिंचन विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते़ त्यापैकी केवळ ५ हजार ३९८ विहिरींची कामे पूर्ण झाली असून, ४ हजार ८५४ कामे प्रगतीपथावर आहेत़ रोहयोंतर्गत सिंचन विहीर बांधकाम करताना टप्प्या टप्प्याने मजुरांना वेतन दिले जाते़ विहिरीचे बांधकाम झाल्यानंतर मजुरांचे मस्टर तयार करून त्यानुसार त्यांचे वेतन देण्यात येते़ तर सिंचन विहिरींच्या लाभार्थ्यांना देखील टप्पे पाडून कुशल देयके दिली जातात़ त्यामुळे ठराविक कालावधीमध्ये विहिरींचे बांधकाम पूर्ण होऊन लाभार्थ्याला या विहिरीच्या पाण्याचा लाभ घेता येतो़सिंचन विहीर बांधकामात अनेक वेळेला अकुशल देयके नियमित होत असली तरी कुशलच्या देयकांसाठी मात्र लाभार्थ्यांची फरफट होत असल्याचे यापूर्वीचे अनुभव आहेत़ उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ४ हजार ८५४ विहिरींची कामे सुरू आहेत़ त्यापैकी ज्या विहिरींचे काम ७५ टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे़, अशा सिंचन विहीर लाभार्थ्यांना कुशल देयके देण्यासाठी जिल्हा परिषदेने ७२ लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे़ मात्र हा प्रस्ताव पाठवून एक महिना उलटून गेला़ परंतु, जिल्हा परिषदेला निधी मिळाला नाही़ त्यामुळे सिंचन विहिरीचे लाभार्थी कुशलच्या देयकांसाठी पंचायत समित्यांमध्ये चकरा मारत आहेत़ विहीर बांधकाम पूर्ण करूनही शासकीय रक्कम मिळत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे़जिंतूर तालुक्यातून सर्वाधिक प्रस्तावजि़प़ने पंचायत समितीनिहाय कुशल देयकांचे प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविले आहेत़ त्यात जिंतूर तालुक्यासाठी सर्वाधिक २६ लाख ५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली़ तसेच सेलू तालुक्यातून १५ लाख ७ हजार, पूर्णा १४ लाख ८ हजार, पाथरी ४ लाख २ हजार, मानवत २ लाख ५ हजार, गंगाखेड २ लाख ३ हजार, सोनपेठ २ लाख ५ हजार, पालम १ लाख ५ हजार आणि परभणी तालुक्यातून १ लाख ९ हजार रुपयांचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे़ या प्रस्तावानुसार रक्कम प्राप्त झाल्यास लाभार्थ्यांच्या अडचणी दूर होणार आहेत़