शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
5
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
8
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
9
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
10
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
11
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
12
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
13
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
14
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
15
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
16
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
17
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
18
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
19
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
20
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

परभणी :प्रचार तोफा थंडावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 23:44 IST

१३ दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी ६ वाजता थांबली आहे़ शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने चारही मतदारसंघात उमेदवारांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढली़ या रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांना आवाहन केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : १३ दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी ६ वाजता थांबली आहे़ शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने चारही मतदारसंघात उमेदवारांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढली़ या रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांना आवाहन केले़७ आॅक्टोबर रोजी अंतीम उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात प्रत्यक्ष जाहीर प्रचाराला सुरुवात झाली़ हा प्रचार करीत असतानाही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन केले होते आणि प्रचाराची सांगता करतानाही शक्ती प्रदर्शन करीत रॅली काढण्यात आल्या़ त्यामुळे निवडणुकीचा ज्वर आता शिगेला पोहचला आहे़ १९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार थांबला असून, उमेदवार आता मतदारांच्या गाठीभेटी घेवून छुप्या मार्गाने प्रचार करण्याची शक्यता आहे़शनिवारी सकाळपासूनच शहरामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती़ प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी रॅली काढत शक्तीप्रदर्शनावर भर दिला़ दुपारी १२ वाजेनंतर शहरातील विविध मार्गावरून रॅलींना सुरुवात झाली़ दिवसभर रॅलींमुळे शहरातील रस्त्यांवर वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे, बिल्ले झळकत होते़ आपल्या पक्षाचा रुमाल गळ्यात घालून कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते़ उमेदवारांच्या रॅलीमुळे शहरात निवडणुकीचा ज्वर चढल्याचे दिसून आले़ सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्व उमेदवारांच्या रॅली पूर्ण झाल्या़ चारही मतदार संघातील जाहीर प्रचार आता थांबला आहे़ मतदानासाठी आणखी एक दिवसांचा काळ शिल्लक आहे़ या काळात मतदारांच्या गाठीभेटी घेणे आणि वैयक्तीक प्रचारावर भर दिला जाण्याची शक्यता आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019