शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

परभणी :प्रचार तोफा थंडावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 23:44 IST

१३ दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी ६ वाजता थांबली आहे़ शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने चारही मतदारसंघात उमेदवारांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढली़ या रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांना आवाहन केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : १३ दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी ६ वाजता थांबली आहे़ शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने चारही मतदारसंघात उमेदवारांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढली़ या रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांना आवाहन केले़७ आॅक्टोबर रोजी अंतीम उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात प्रत्यक्ष जाहीर प्रचाराला सुरुवात झाली़ हा प्रचार करीत असतानाही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन केले होते आणि प्रचाराची सांगता करतानाही शक्ती प्रदर्शन करीत रॅली काढण्यात आल्या़ त्यामुळे निवडणुकीचा ज्वर आता शिगेला पोहचला आहे़ १९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार थांबला असून, उमेदवार आता मतदारांच्या गाठीभेटी घेवून छुप्या मार्गाने प्रचार करण्याची शक्यता आहे़शनिवारी सकाळपासूनच शहरामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती़ प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी रॅली काढत शक्तीप्रदर्शनावर भर दिला़ दुपारी १२ वाजेनंतर शहरातील विविध मार्गावरून रॅलींना सुरुवात झाली़ दिवसभर रॅलींमुळे शहरातील रस्त्यांवर वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे, बिल्ले झळकत होते़ आपल्या पक्षाचा रुमाल गळ्यात घालून कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते़ उमेदवारांच्या रॅलीमुळे शहरात निवडणुकीचा ज्वर चढल्याचे दिसून आले़ सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्व उमेदवारांच्या रॅली पूर्ण झाल्या़ चारही मतदार संघातील जाहीर प्रचार आता थांबला आहे़ मतदानासाठी आणखी एक दिवसांचा काळ शिल्लक आहे़ या काळात मतदारांच्या गाठीभेटी घेणे आणि वैयक्तीक प्रचारावर भर दिला जाण्याची शक्यता आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019