शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

परभणी : सालगड्यांचे भाव सव्वालाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 23:14 IST

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सालगडी ठरविले जातात़ यावर्षी सालगड्याचे भाव ९० हजार ते सव्वालाखांपर्यंत पोहचल्याने शेतीमालक चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सालगडी ठरविले जातात़ यावर्षी सालगड्याचे भाव ९० हजार ते सव्वालाखांपर्यंत पोहचल्याने शेतीमालक चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातून गोदावरी व वाण नदी वाहते. तसेच मुदगल बंधारा व माजलगाव कालव्याचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध आहे; परंतु, अलीकडच्या काळात पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. परिणामी तालुक्यात दुष्काळाचे सावट कायम आहे. निसर्गाच्या लहरीपणाने शेती करणे अवघड झाले आहे. त्यातच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे १० एकरच्या वर शेती आहे, तो शेतकरी शेती कसण्यासाठी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सालगडी ठेऊन वर्षभर शेती करीत असतो़ मागील वर्षी सालगड्यांचे भाव ७५ ते ८५ हजार रुपयांपर्यंत होते; परंतु, यावर्षी सालगाड्यांच्या भावात घसघशीत वाढ झाली आहे़ ९० हजार ते सव्वालाख रुपयांपर्यंत साल मागितले जात आहे. नापिकी व दुष्काळातून शेतकरी अद्याप बाहेर आला नाही. त्यातच सालगड्यांचे भाव हे सव्वालाखापर्यंत पोहचल्याने शेतीमालक चिंताग्रस्त झाले आहेत़यावर्षी रबी हंगाम झाला नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला़ गुढी पाडव्यापासून शेतावर काम करणाºया सालगड्याचे साल ठरविण्याची परंपरा रुढ आहे़ या परंपरेनुसार शनिवारी ग्रामीण भागात ठिक ठिकाणी सालगाड्यांचे साल ठरविण्यात आले़तब्बल सहा महिन्यांपासून शेतीमध्ये काम उपलब्ध नसल्याने पुढील वर्षीच्या हंगामात सालगड्यांचे भाव कमी होतील, अशी अपेक्षा होती़ शेतकरीही आर्थिक कचाट्यात असल्याने यातून तडजोड निघेल, असाही सूर होता़ परंतु, सालाने शेती करण्यासाठी सालगडीच मिळत नसल्याने भाव वधारले आहेत़ ज्या शेतकऱ्यांकडे पूर्वीचे सालगडी होते, ते कामाच्या शोधात शहरी भागात गेले आहेत़ त्यामुळे ग्रामीण भागात सालगडी ठरविताना शेतकºयांना कसरत करावी लागली़ अनेक ठिकाणी शेतकºयांनी जास्तीचे पैसे मोजून शेतीचे साल निश्चित केले आहे़ सालगाड्यांचा भाव तर वाढलाच आहे़ तसेच नगदी रक्कम देण्याबरोबरच धान्याचीही मागणी सालगड्याकडून होत असल्याने शेतकºयांसमोर पुढील हंगामातील उत्पन्नाचेही संकट उभे टाकले आहे़शेती कसण्यास : बटईची पद्धत४खरीप हंगामाला जुलै महिन्यापासून सुरुवात होत असली तरी त्याचे नियोजन गुढी पाडव्याच्या दिवशीच केले जाते़ वर्षभर शेती करण्यासाठी मजूर, सालगड्यांचे भाव ठरविले जातात़ स्वत: घरी शेती करताना सालगडी ठेवला जातो़ परंतु, शेती करणाºया मजुरांची मानसिकता शहरी भागात काम करण्याची असल्याने आणि सालगडी ठरविणे परवडत नसल्याने अनेकांनी बटईने शेती देण्याचा पर्याय निवडला आहे़ यामध्ये शेती करीत असताना झालेल्या उत्पन्नात ठराविक हिस्सा देऊन समोरच्या व्यक्तीला शेती बटाईने दिली जाते़ यात शेतकºयांना तोटा होण्याची शक्यता कमी असल्याने आणि इतर अडचणीही दूर होत असल्याने बटाईचा पर्याय निवडला जात आहे़शेतीत काम करण्यास सध्या कोणी पुढे येत नाही. त्यामुळे मजूरच मिळत नाहीत. वर्षभर शेती कसण्यासाठी सालगडी मिळणे मुश्कील बनले आहे. त्यातून सालगड्यांचे भाव सव्वालाखावर पोहचले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी