शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

परभणी : १४ योजनांचा वीज पुरवठा केला खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:41 IST

तालुक्यात महावितरणच्या वतीने मार्चएंडच्या तोंडावर वीज बिल वसुली मोहीम सुरू आहे़ आतापर्यंत तालुक्यातील १४ पाणीपुरवठ्याची वीज जोडणी तोडण्यात आली आहे़ त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : तालुक्यात महावितरणच्या वतीने मार्चएंडच्या तोंडावर वीज बिल वसुली मोहीम सुरू आहे़ आतापर्यंत तालुक्यातील १४ पाणीपुरवठ्याची वीज जोडणी तोडण्यात आली आहे़ त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़मानवत तालुक्यामध्ये ४९ ग्रामपंचायती आहेत़ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांकडे वीज बिलाची लाखो रुपयांची थकबाकी आहे़ महावितरणच्या वतीने तालुकाभरात वीज बिल वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे़तालुक्यातील देवलगाव, कोल्हा, रुढी, नरळद, खरबा, हत्तरवाडी, उक्कलगाव, सावरगाव, केकरजवळा, रामपुरी, रामेटाकळी, इटाळी, बोंदरवाडी, कोल्हावाडी, गोगलगाव, आंबेगाव, थार, पिंपळा, जंगमवाडी, आटोळा, मंगरुळ पा़प़, कोथाळा, सारंगापूर तर मानवत विभागांतर्गत येणाºया पाथरी तालुक्यामधील दोन गावांमध्ये सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येतो़महावितरणच्या वतीने ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे़ त्याचा फटका वीज बिल थकलेल्या ग्रामपंचायतींना बसला आहे़वीज बिलाचा भरणा न करणाºया खरबा, उक्कलगाव, सावरगाव, केकरवळा, रामपुरी बु़, रामेटाकळी, इटाळी, बोंदरवाडी, कोल्हावाडी, थार, पिंपळा, जंगमवाडी, आटोळा, सारंगापूर या ग्रामपंचायतींचा वीज पुरवठा महावितरणने तोडला आहे़ वीज पुरवठा तोडल्याने या गावामध्ये ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़या गावातील पाणीपुरवठा योजनेकडे २८ लाख १७ हजार ६२१ रुपये थकले आहेत़ दरम्यान, यापूर्वी वीज पुरवठा तोडलेल्या देवगाव, कोल्हा, रुढी, नरळद, हत्तलवाडी, गोगलगाव, आंबेगाव, मंगरुळ पा़प़, कोथाळा या ग्रामपंचायतींनी काही रक्कम भरून वीज पुरवठा सुरळीत केला आहे़ त्यामुळे या गावांमध्ये सध्या तरी पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे़ मात्र वीज पुरवठा तोडलेल्या गावांमध्ये ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़विद्यार्थ्यांना नाहक त्रास : अभ्यासावर परिणाममहावितरणच्या वतीने दरवर्षी मार्च महिन्यातच वीज बिल वसुली मोहीम राबविली जाते़ ग्राहकांकडे अनेक वर्षांची थकबाकी असताना ऐन मार्च महिन्यात वसुली करण्यात येत आहे़ फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये दहावी, बारावी, पदवीच्या परीक्षा घेण्यात येतात़ याच काळामध्ये वीज पुरवठ्याची आवश्यकता विद्यार्थ्यांना असते़ नेमके याच काळात महावितरणच्या वतीने वसुली मोहीम राबविण्यात येत आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे़ वर्षभर महावितरणला वसुली मोहीम राबविण्यासाठी वेळच मिळत नाही का, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांमधून केला जात आहे़ ग्रामस्थांना पाणी मिळावे, यासाठी उन्हाळ्यामध्ये शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च केले जातात़ असे असताना महावितरण पाणीपुरवठ्याची जोडणीही खंडित केली जात आहे़ त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ वर्षभरामध्ये महावितरणने थकबाकी वसुली मोहीम राबविली असती तर ग्राहक व विद्यार्थ्यांनाही फटका बसला नसता़ परंतु, वेठीस धरण्यासाठीच ही कारवाईची मोहीम राबविली जाते की काय, अशी शंका निर्माण होत आहे़सिरकळसचा वीजपुरवठा तीन दिवसांपासून बंदताडकळस- पूर्णा तालुक्यातील सिरकळस येथील वीज पुरवठा महावितरणने ३ दिवसांपासून बंद केला आहे़ सिरकळस येथील ११० ग्राहकांपैकी १०३ ग्राहकांकडे थकबाकी आहे़ वीज बिल भरणा न केल्यामुळे संपूर्ण गावाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे़