शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
5
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
6
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
7
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
8
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
9
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
10
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
11
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
12
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
13
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
14
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
15
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
16
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
17
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
18
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
19
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
20
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?

परभणी : १४ योजनांचा वीज पुरवठा केला खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:41 IST

तालुक्यात महावितरणच्या वतीने मार्चएंडच्या तोंडावर वीज बिल वसुली मोहीम सुरू आहे़ आतापर्यंत तालुक्यातील १४ पाणीपुरवठ्याची वीज जोडणी तोडण्यात आली आहे़ त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : तालुक्यात महावितरणच्या वतीने मार्चएंडच्या तोंडावर वीज बिल वसुली मोहीम सुरू आहे़ आतापर्यंत तालुक्यातील १४ पाणीपुरवठ्याची वीज जोडणी तोडण्यात आली आहे़ त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़मानवत तालुक्यामध्ये ४९ ग्रामपंचायती आहेत़ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांकडे वीज बिलाची लाखो रुपयांची थकबाकी आहे़ महावितरणच्या वतीने तालुकाभरात वीज बिल वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे़तालुक्यातील देवलगाव, कोल्हा, रुढी, नरळद, खरबा, हत्तरवाडी, उक्कलगाव, सावरगाव, केकरजवळा, रामपुरी, रामेटाकळी, इटाळी, बोंदरवाडी, कोल्हावाडी, गोगलगाव, आंबेगाव, थार, पिंपळा, जंगमवाडी, आटोळा, मंगरुळ पा़प़, कोथाळा, सारंगापूर तर मानवत विभागांतर्गत येणाºया पाथरी तालुक्यामधील दोन गावांमध्ये सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येतो़महावितरणच्या वतीने ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे़ त्याचा फटका वीज बिल थकलेल्या ग्रामपंचायतींना बसला आहे़वीज बिलाचा भरणा न करणाºया खरबा, उक्कलगाव, सावरगाव, केकरवळा, रामपुरी बु़, रामेटाकळी, इटाळी, बोंदरवाडी, कोल्हावाडी, थार, पिंपळा, जंगमवाडी, आटोळा, सारंगापूर या ग्रामपंचायतींचा वीज पुरवठा महावितरणने तोडला आहे़ वीज पुरवठा तोडल्याने या गावामध्ये ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़या गावातील पाणीपुरवठा योजनेकडे २८ लाख १७ हजार ६२१ रुपये थकले आहेत़ दरम्यान, यापूर्वी वीज पुरवठा तोडलेल्या देवगाव, कोल्हा, रुढी, नरळद, हत्तलवाडी, गोगलगाव, आंबेगाव, मंगरुळ पा़प़, कोथाळा या ग्रामपंचायतींनी काही रक्कम भरून वीज पुरवठा सुरळीत केला आहे़ त्यामुळे या गावांमध्ये सध्या तरी पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे़ मात्र वीज पुरवठा तोडलेल्या गावांमध्ये ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़विद्यार्थ्यांना नाहक त्रास : अभ्यासावर परिणाममहावितरणच्या वतीने दरवर्षी मार्च महिन्यातच वीज बिल वसुली मोहीम राबविली जाते़ ग्राहकांकडे अनेक वर्षांची थकबाकी असताना ऐन मार्च महिन्यात वसुली करण्यात येत आहे़ फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये दहावी, बारावी, पदवीच्या परीक्षा घेण्यात येतात़ याच काळामध्ये वीज पुरवठ्याची आवश्यकता विद्यार्थ्यांना असते़ नेमके याच काळात महावितरणच्या वतीने वसुली मोहीम राबविण्यात येत आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे़ वर्षभर महावितरणला वसुली मोहीम राबविण्यासाठी वेळच मिळत नाही का, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांमधून केला जात आहे़ ग्रामस्थांना पाणी मिळावे, यासाठी उन्हाळ्यामध्ये शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च केले जातात़ असे असताना महावितरण पाणीपुरवठ्याची जोडणीही खंडित केली जात आहे़ त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ वर्षभरामध्ये महावितरणने थकबाकी वसुली मोहीम राबविली असती तर ग्राहक व विद्यार्थ्यांनाही फटका बसला नसता़ परंतु, वेठीस धरण्यासाठीच ही कारवाईची मोहीम राबविली जाते की काय, अशी शंका निर्माण होत आहे़सिरकळसचा वीजपुरवठा तीन दिवसांपासून बंदताडकळस- पूर्णा तालुक्यातील सिरकळस येथील वीज पुरवठा महावितरणने ३ दिवसांपासून बंद केला आहे़ सिरकळस येथील ११० ग्राहकांपैकी १०३ ग्राहकांकडे थकबाकी आहे़ वीज बिल भरणा न केल्यामुळे संपूर्ण गावाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे़