शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

परभणी : पीक विम्यासाठी केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:52 IST

तालुक्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी खरीप हंगामातील पीक विमा भरण्यासाठी शहरातील आॅनलाईन केंद्रावर गर्दी करू लागले आहेत. या गर्दीचा फायदा घेत केंद्र चालकांकडून १०० ते १५० रुपयांची लूट केली जात असल्याचा प्रकार सर्रास दिसून येत आहे. या प्रकाराकडे मात्र महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने केंद्रचालकांचे चांगलेच फावत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : तालुक्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी खरीप हंगामातील पीक विमा भरण्यासाठी शहरातील आॅनलाईन केंद्रावर गर्दी करू लागले आहेत. या गर्दीचा फायदा घेत केंद्र चालकांकडून १०० ते १५० रुपयांची लूट केली जात असल्याचा प्रकार सर्रास दिसून येत आहे. या प्रकाराकडे मात्र महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने केंद्रचालकांचे चांगलेच फावत आहे.पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विमा भरण्यासाठी शासनाने २४ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. सुरुवातीला पीक विमा भरण्यासाठी शेतकरी फारसे आॅनलाईन केंद्राकडे फिरकले नाहीत. मात्र पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे; परंतु, अद्यापही तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. पेरणी केलेल्या पिकांची उगवण झाली असून, या पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आता परिस्थिती बिकट बनणार असे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी शेवटच्या टप्प्यात शेतकऱ्यांनी लगबग सुरू केली आहे.मागील काही दिवसांपासून तलाठी संपर्क कार्यालये आणि आॅनलाईन केंदे्र फुलून गेली आहेत.दिवसभर आॅनलाईन केंद्रावर थांबूनही अनेकांचे अर्ज भरले जात नाहीत. अशा शेतकºयांकडून अर्ज भरून घेण्यासाठी केंद्र चालकांकडून एका अर्जासाठी १०० ते १५० रुपये जास्तीचे आकारले जात आहेत. यासाठी कोणतीही पावती दिली जात नाही. त्यामुळे एकीकडे शेतकºयांची लूट होत असताना दुसरीकडे महसूल प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.सातबारा काढण्यासाठी तलाठ्यांकडे गर्दी४पीक विमा भरण्यासाठी आॅनलाईन सातबारा आवश्यक आहे. मात्र सेतू सुविधा केंद्रावर आता आॅनलाईन सातबारा देणे बंद करण्यात आल्याने तलाठ्यांकडूनच आॅनलाईन सातबारा घ्याव्या लागत आहे. विशेष म्हणजे एका तलाठ्याकडे चार ते पाच गावे येत असल्याने सातबारा काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. परिणामी सातबारा वेळेवर मिळत नाहीत.४या सातबारा वेळेवर मिळत नसल्याने शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर २४ जुलैपर्यंत सर्वच तलाठ्यांनी मुख्यालयी हजर राहून कागदपत्रे वितरित करावीत, बायोमेट्रिक हजेरी नोंदवावी, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी काढले आहेत. त्यामुळे आता तरी शेतकºयांना वेळेत सातबारा मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा