शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : नऊ टक्क्यांनी घटली पीककर्ज वाटपाची गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:04 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकांना १४७० कोटी ४४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र यावर्षी जिल्ह्यातील बँकांनी गतवर्षीपेक्षा यावर्षी पीक कर्ज वाटप करताना आखडता हात घेतला आहे. गतवर्षी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत ३०.०५ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. यावर्षी मात्र केवळ २१.४६ टक्केच पीक कर्ज वाटप करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकांना १४७० कोटी ४४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र यावर्षी जिल्ह्यातील बँकांनी गतवर्षीपेक्षा यावर्षी पीक कर्ज वाटप करताना आखडता हात घेतला आहे. गतवर्षी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत ३०.०५ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. यावर्षी मात्र केवळ २१.४६ टक्केच पीक कर्ज वाटप करण्यात आले.जिल्ह्यात तीन वर्षापासून दुष्काळी सदृष्य परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप व रबी हंगामात उसणवारी करुन बी बियाणांची पेरणी केली; परंतु, अपुºया पावसाअभावी पिकांची उगवणच झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी मागील तीनही वर्षात पिकांवर केलेला खर्च उत्पादनातून निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले. त्यामुळे २०१९-२० च्या खरीप हंगामात शेतकºयांना पेरणी करण्यासाठी व बी बियाणे खरेदीसाठी पैशाची गरज होती.जिल्हा प्रशासनाने शेतकºयांची अवस्था लक्षात घेऊन जिल्ह्यासाठी खरीप हंगामात १४७० कोटी ४४ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामुळे खरीप हंगाम सुरू होईपर्यंत प्रत्येक लाभार्थी शेतकºयांना पीक कर्ज मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती.मात्र खरीप हंगाम संपत आला तरीही बँकांनी दिलेले पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण केले नाही. ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यामध्ये २१.४६ टक्के पीक कर्ज वाटप केले आहे. यामध्येही व्यवसायिक बँकांनी ११ हजार ४७६ शेतकºयांना १०४ कोटी १८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करून केवळ १०.१२ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्याच बरोबर खाजगी बँकांनी २०६६ शेतकºयांना ३२ कोटी ५ लाख रुपयांचे कर्ज वाटप करीत ४२.६१ टक्के पीक कर्ज वाटप केले आहे. त्यानंतर महाराष्टÑ ग्रामीण बँकेने ११ हजार ४५७ शेतकºयांना ७८ कोटी २८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करीत ३९.११ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३३ हजार २८७ शेतकºयांना १०१ कोटी ४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करीत ६१.६ टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गाठले आहे. त्यामुळे खरीप हंगाम संपला तरीही अद्यापपर्यंत एकाही बँकेने पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण केले नाही. विशेष म्हणजे गतवर्षीच्या खरीप हंगामात ३० सप्टेंबरपर्यंत ३०.५ टक्के कर्ज वाटप करण्यात आले होते. मात्र यावर्षी बँकांनी पीक कर्ज वाटप करताना केवळ २१.४६ टक्के पीक कर्ज वाटप केले आहे. यावर्षी ९ टक्क्यांनी पीक कर्ज वाटप करण्याची गती कमी झाल्याचे दिसून येत आहे.रबीसाठी ३१३ कोटींचे उद्दिष्टच्रबी हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यासाठी ३१३ कोटी ४७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. एकीकडे खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांनी पूर्ण केले नसतानाच दुसरीकडे रबी हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बँकांना पीक कर्ज वाटप करताना आगामी काळात मोठी कसरत करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.च्पीक कर्ज वाटप करताना बँकांकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचे कारण पुढे करून शेतकºयांना पीक कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करीत आहेत. त्यामुुळे जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी याकडे लक्ष देऊन पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे.च्जिल्ह्यातील बँकांनी लाभार्थी शेतकºयांना वेळेत पीक कर्ज वाटप करण्यासाठी स्वतंत्र काऊंटर सुरु करून गती वाढवावी. ज्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना रबी हंगामात पीक कर्ज मिळून बी बियाणे खरेदीसाठी मदत मिळेल, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकCrop Loanपीक कर्ज