शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: ४३ हजार शेतकऱ्यांनाच पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 23:17 IST

जिल्ह्यातील बँकांनी १५ आॅगस्टपर्यंत फक्त ४२ हजार ७२८ शेतकऱ्यांनाच आतापर्यंत २२५ कोटी १३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे खरीपाचा हंगाम संपत आला तरी कर्जवाटपाचे उद्दीष्ट १५.३१ टक्क्यांपेक्षा अधिक वाढत नसल्याने बँकांची उदासिनता यामाध्यमातून दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील बँकांनी १५ आॅगस्टपर्यंत फक्त ४२ हजार ७२८ शेतकऱ्यांनाच आतापर्यंत २२५ कोटी १३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे खरीपाचा हंगाम संपत आला तरी कर्जवाटपाचे उद्दीष्ट १५.३१ टक्क्यांपेक्षा अधिक वाढत नसल्याने बँकांची उदासिनता यामाध्यमातून दिसून येत आहे.परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम हा शेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकºयांच्या हाती उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे यावर्षी खरीप पिकांच्या पेरण्यांसाठी हातात पैशांची आवश्यकता असताना बँकांनी मात्र आखडता हात घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यातच जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामात वाटप करावयाचे उद्दीष्ट निश्चित करुन दिले आहे. त्यामुळे जुलैअखेरपर्यंत बँकांनी दिलेले उद्दीष्ट पूर्ण करणे अपेक्षित असताना १५ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ १५.३१ टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे. जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या पूर्ण होऊन पिकांना पाते, फुले लागत आहेत. पेरणीसाठीच शेतकºयांना पैशांची आवश्यकता भासते. मात्र बँकांना उद्दीष्ट देऊनही वेळेत कर्ज वाटप झाले नाही. त्यामुळे शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचा कुठलाही फायदा झाला नाही. शेतकºयांनी खाजगी सावकारांचे दारे ठोठावून पैसा जमा केला. जर शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळत नसेल तर उपयोग काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकांना १४७० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट निश्चित करुन दिले आहे. मात्र त्या तुलनेत वाणिज्य बँकांनी केवळ ६ हजार ६५८ शेतकºयांना ६४ कोटी ७० लाख रुपये, खाजगी बँकांनी १ हजार ६५८ शेतकºयांना २७ कोटी ७ लाख रुपये, महाराष्टÑ ग्रामीण बँकेने ५ हजार ५७१ शेतकºयांना ४२ कोटी ४१ लाख रुपये तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २८ हजार ८४१ शेतकºयांना ९० कोटी ९५ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. विशेष म्हणजे, आता खरीप हंगाम संपत आला आहे; परंतु, बँकांनी अद्यापपर्यंत पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण केलेले नाही. जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन बँकांना सूचना कराव्यात व शेतकºयांना वेळेत पैसा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी होत आहे.गतवर्षीपेक्षा ८ टक्क्यांनी घटले कर्ज वाटपच्जिल्ह्यातील सर्वच बँकांना खरीप हंगामामध्ये १४७० कोटी ४४ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले आहे; परंतु, १५ आॅगस्टपर्यंत केवळ १५ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी आतापर्यंत २३.१५ टक्के पीक कर्ज वाटप झाले होते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ८ टक्क्यांनी पीक कर्ज वाटप घटले आहे. दुष्काळात सापडलेल्या शेतकºयांना बँकांकडून मदत करताना आखडता हात घेतला जात असल्याचे दिसून येत आहे.च्बँकांचा कर्ज वाटपाचा आकडा पाहता पीक कर्ज वाटपाचे काम अतिशय संथगतीने होत असल्याचे दिसत आहे. कर्ज वाटपाची गती वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याच बरोबर गतवर्षीच्या व यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकºयांना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.च्बँकांनी वेळेत पीक कर्ज दिले तर पिकांवरील फवारणी, खत, कीटकनाशकांच्या खरेदीसाठी हा पैसा शेतकºयांना उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे पीक कर्जाची मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरीbankबँक