शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

परभणी: ४३ हजार शेतकऱ्यांनाच पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 23:17 IST

जिल्ह्यातील बँकांनी १५ आॅगस्टपर्यंत फक्त ४२ हजार ७२८ शेतकऱ्यांनाच आतापर्यंत २२५ कोटी १३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे खरीपाचा हंगाम संपत आला तरी कर्जवाटपाचे उद्दीष्ट १५.३१ टक्क्यांपेक्षा अधिक वाढत नसल्याने बँकांची उदासिनता यामाध्यमातून दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील बँकांनी १५ आॅगस्टपर्यंत फक्त ४२ हजार ७२८ शेतकऱ्यांनाच आतापर्यंत २२५ कोटी १३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे खरीपाचा हंगाम संपत आला तरी कर्जवाटपाचे उद्दीष्ट १५.३१ टक्क्यांपेक्षा अधिक वाढत नसल्याने बँकांची उदासिनता यामाध्यमातून दिसून येत आहे.परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम हा शेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकºयांच्या हाती उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे यावर्षी खरीप पिकांच्या पेरण्यांसाठी हातात पैशांची आवश्यकता असताना बँकांनी मात्र आखडता हात घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यातच जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामात वाटप करावयाचे उद्दीष्ट निश्चित करुन दिले आहे. त्यामुळे जुलैअखेरपर्यंत बँकांनी दिलेले उद्दीष्ट पूर्ण करणे अपेक्षित असताना १५ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ १५.३१ टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे. जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या पूर्ण होऊन पिकांना पाते, फुले लागत आहेत. पेरणीसाठीच शेतकºयांना पैशांची आवश्यकता भासते. मात्र बँकांना उद्दीष्ट देऊनही वेळेत कर्ज वाटप झाले नाही. त्यामुळे शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचा कुठलाही फायदा झाला नाही. शेतकºयांनी खाजगी सावकारांचे दारे ठोठावून पैसा जमा केला. जर शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळत नसेल तर उपयोग काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकांना १४७० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट निश्चित करुन दिले आहे. मात्र त्या तुलनेत वाणिज्य बँकांनी केवळ ६ हजार ६५८ शेतकºयांना ६४ कोटी ७० लाख रुपये, खाजगी बँकांनी १ हजार ६५८ शेतकºयांना २७ कोटी ७ लाख रुपये, महाराष्टÑ ग्रामीण बँकेने ५ हजार ५७१ शेतकºयांना ४२ कोटी ४१ लाख रुपये तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २८ हजार ८४१ शेतकºयांना ९० कोटी ९५ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. विशेष म्हणजे, आता खरीप हंगाम संपत आला आहे; परंतु, बँकांनी अद्यापपर्यंत पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण केलेले नाही. जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन बँकांना सूचना कराव्यात व शेतकºयांना वेळेत पैसा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी होत आहे.गतवर्षीपेक्षा ८ टक्क्यांनी घटले कर्ज वाटपच्जिल्ह्यातील सर्वच बँकांना खरीप हंगामामध्ये १४७० कोटी ४४ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले आहे; परंतु, १५ आॅगस्टपर्यंत केवळ १५ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी आतापर्यंत २३.१५ टक्के पीक कर्ज वाटप झाले होते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ८ टक्क्यांनी पीक कर्ज वाटप घटले आहे. दुष्काळात सापडलेल्या शेतकºयांना बँकांकडून मदत करताना आखडता हात घेतला जात असल्याचे दिसून येत आहे.च्बँकांचा कर्ज वाटपाचा आकडा पाहता पीक कर्ज वाटपाचे काम अतिशय संथगतीने होत असल्याचे दिसत आहे. कर्ज वाटपाची गती वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याच बरोबर गतवर्षीच्या व यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकºयांना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.च्बँकांनी वेळेत पीक कर्ज दिले तर पिकांवरील फवारणी, खत, कीटकनाशकांच्या खरेदीसाठी हा पैसा शेतकºयांना उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे पीक कर्जाची मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरीbankबँक