शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: ४३ हजार शेतकऱ्यांनाच पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 23:17 IST

जिल्ह्यातील बँकांनी १५ आॅगस्टपर्यंत फक्त ४२ हजार ७२८ शेतकऱ्यांनाच आतापर्यंत २२५ कोटी १३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे खरीपाचा हंगाम संपत आला तरी कर्जवाटपाचे उद्दीष्ट १५.३१ टक्क्यांपेक्षा अधिक वाढत नसल्याने बँकांची उदासिनता यामाध्यमातून दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील बँकांनी १५ आॅगस्टपर्यंत फक्त ४२ हजार ७२८ शेतकऱ्यांनाच आतापर्यंत २२५ कोटी १३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे खरीपाचा हंगाम संपत आला तरी कर्जवाटपाचे उद्दीष्ट १५.३१ टक्क्यांपेक्षा अधिक वाढत नसल्याने बँकांची उदासिनता यामाध्यमातून दिसून येत आहे.परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम हा शेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकºयांच्या हाती उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे यावर्षी खरीप पिकांच्या पेरण्यांसाठी हातात पैशांची आवश्यकता असताना बँकांनी मात्र आखडता हात घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यातच जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामात वाटप करावयाचे उद्दीष्ट निश्चित करुन दिले आहे. त्यामुळे जुलैअखेरपर्यंत बँकांनी दिलेले उद्दीष्ट पूर्ण करणे अपेक्षित असताना १५ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ १५.३१ टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे. जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या पूर्ण होऊन पिकांना पाते, फुले लागत आहेत. पेरणीसाठीच शेतकºयांना पैशांची आवश्यकता भासते. मात्र बँकांना उद्दीष्ट देऊनही वेळेत कर्ज वाटप झाले नाही. त्यामुळे शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचा कुठलाही फायदा झाला नाही. शेतकºयांनी खाजगी सावकारांचे दारे ठोठावून पैसा जमा केला. जर शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळत नसेल तर उपयोग काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकांना १४७० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट निश्चित करुन दिले आहे. मात्र त्या तुलनेत वाणिज्य बँकांनी केवळ ६ हजार ६५८ शेतकºयांना ६४ कोटी ७० लाख रुपये, खाजगी बँकांनी १ हजार ६५८ शेतकºयांना २७ कोटी ७ लाख रुपये, महाराष्टÑ ग्रामीण बँकेने ५ हजार ५७१ शेतकºयांना ४२ कोटी ४१ लाख रुपये तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २८ हजार ८४१ शेतकºयांना ९० कोटी ९५ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. विशेष म्हणजे, आता खरीप हंगाम संपत आला आहे; परंतु, बँकांनी अद्यापपर्यंत पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण केलेले नाही. जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन बँकांना सूचना कराव्यात व शेतकºयांना वेळेत पैसा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी होत आहे.गतवर्षीपेक्षा ८ टक्क्यांनी घटले कर्ज वाटपच्जिल्ह्यातील सर्वच बँकांना खरीप हंगामामध्ये १४७० कोटी ४४ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले आहे; परंतु, १५ आॅगस्टपर्यंत केवळ १५ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी आतापर्यंत २३.१५ टक्के पीक कर्ज वाटप झाले होते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ८ टक्क्यांनी पीक कर्ज वाटप घटले आहे. दुष्काळात सापडलेल्या शेतकºयांना बँकांकडून मदत करताना आखडता हात घेतला जात असल्याचे दिसून येत आहे.च्बँकांचा कर्ज वाटपाचा आकडा पाहता पीक कर्ज वाटपाचे काम अतिशय संथगतीने होत असल्याचे दिसत आहे. कर्ज वाटपाची गती वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याच बरोबर गतवर्षीच्या व यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकºयांना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.च्बँकांनी वेळेत पीक कर्ज दिले तर पिकांवरील फवारणी, खत, कीटकनाशकांच्या खरेदीसाठी हा पैसा शेतकºयांना उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे पीक कर्जाची मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरीbankबँक