शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

परभणी-पाथरी रस्ता :झाडे तोडली; मात्र रस्ता काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 00:37 IST

पाथरी-परभणी या राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी संबंधित गुत्तेदाराने २५ किमी रस्त्यावरील मोठ मोठ्या झाडांची कत्तल करण्यासाठी तत्परता दाखविली; परंतु, त्यानंतर वर्षभराचा कालावधी लोटला असला तरी रस्त्याचे काम मात्र साईडपट्ट्याच्या खोदकामाव्यतिरिक्त पुढे गेले नाही़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): पाथरी-परभणी या राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी संबंधित गुत्तेदाराने २५ किमी रस्त्यावरील मोठ मोठ्या झाडांची कत्तल करण्यासाठी तत्परता दाखविली; परंतु, त्यानंतर वर्षभराचा कालावधी लोटला असला तरी रस्त्याचे काम मात्र साईडपट्ट्याच्या खोदकामाव्यतिरिक्त पुढे गेले नाही़ विशेष म्हणजे, सहा महिन्यांपासून तर या रस्त्याचे काम पूर्णत: बंद आहे़ त्यामुळे झाडे तोडण्यासाठी तत्परता दाखविलेल्या गुत्तेदाराने रस्त्याचे कामही तेवढ्याच तत्परतेने मार्गी लावावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे़कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्ग २२२ हा रस्ता अहमदनगर-बीड-परभणी-नांदेड या जिल्ह्यातून जातो़ नगर जिल्ह्यातून रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर पाथर्डी-गढीफाटा-माजलगाव, पाथरी आणि मानवत रोड रेल्वे स्टेशनपर्यंत या रस्त्याचे काम दोन वर्षापूर्वी पूर्ण करण्यात आले़ परंतु, त्यानंतर मानवत रोड रेल्वे स्टेशनच्या रेल्वे लाईनवर हाती घेण्यात आलेल्या उड्डाण पुलाचे काम काही महिन्यांपासून बंद आहे़ केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा बदलत ६१ वर आणून कल्याण ते विशाखापटणम् करण्यात आला़परभणी जिल्ह्यात ढालेगावपासून मानवत रोडपर्यंत जवळपास २५ किमी रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे़ त्या पुढील रस्ता कोल्हापाटी ते परभणीपर्यंत साधारणत: २५ किमीचे कामही दोन वर्षापूर्वी मंजूर करण्यात आले़ हैदराबाद येथील एजन्सीने काम हाती घेतले असून, हे काम मंजूर होऊनही या गुत्तेदाराने कामाची सुरुवात मात्र उशिरानेच केली़ त्यामुळे प्रवासी नागरिकांतून ओरड झाल्यानंतर या कामास सुरुवात करण्यात आली़ गतवर्षी या महामार्गाची दुरवस्था झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती़ त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे डांबरीकरणाने बुजविण्यात आले होते़ परंतु, महामार्ग असल्यामुळे या रस्त्यावर मोठी वर्दळ असते़ परिणामी बुजविलेल्या खड्ड्यांची सध्या वाताहत झाली आहे़ राष्ट्रीय महामार्गावर परभणी शहरापर्यंत मोठ मोठी झाडे अस्तित्वात होती़ दुतर्फा झाडांनी रस्त्यावर भर उन्हाळ्यात प्रवासी, वाहनधारकांना सावली मिळत असे़ मात्र रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी मागील ८ ते १० महिन्यांपूर्वीच रस्त्यावरील वड, लिंब, बाभळ ही मोठी झाडे तोडण्यास संबंधित गुत्तेदाराने तत्परता दाखविली़ या तत्परतेनंतर गुत्तेदार रस्त्याचे कामही तेवढ्याच तत्परतने पूर्ण करील, अशी अपेक्षा होती़ परंतु, मागील एक वर्षापासून या रस्त्याच्या केवळ साईडपट्ट्या भरण्यात आल्या आहेत़ या रस्त्याचे काम सध्या बंद आहे़ त्यामुळे रहदारीला यामुळे मोठा अडथळा निर्माण होत आहे़ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन हा रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे़५०० झाडांची केली कत्तल४या राष्ट्रीय महामार्गावर वडाची मोठ मोठी झाडे असल्याने रस्त्याला झाडांचा वेढा पडलेला दिसत होता़ त्यामुळे भर उन्हाळ्यातही प्रवाशांचा प्रवास सुखकर होत असे़४रस्त्याच्या कामासाठी वडासह इतर जवळपास ५०० झाडे तोडण्यात आली़ त्यानंतर रस्त्याचे कामही बंद करण्यात आले़ त्यामुळे ५०० झाडे तोडण्यासाठी एवढी तत्परता का, असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आहे़४त्याचबरोबर कोल्हापाटी ते परभणीपर्यंतचा २५ किमी रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने चार चाकी वाहनांना हा रस्ता पार करण्यासाठी किमान एक तासाचा कालावधी लागत आहे़ त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीroad transportरस्ते वाहतूकNational Highwayराष्ट्रीय महामार्ग