शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

परभणी : सार्वजनिक ग्रंथालयांची निर्मिती काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:22 IST

स्पर्धेच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत असताना वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे़ प्रत्येक गावात सार्वजनिक ग्रंथालयांची आवश्यकता असून, ती काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कवी प्रा़ इंद्रजीत भालेराव यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्पर्धेच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत असताना वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे़ प्रत्येक गावात सार्वजनिक ग्रंथालयांची आवश्यकता असून, ती काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कवी प्रा़ इंद्रजीत भालेराव यांनी केले़उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय यांच्या वतीने घेण्यात येत असलेल्या ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या निरोप समारंभ प्रसंगी भालेराव बोलत होते़७ जून रोजी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या गं्रथालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ़ रामेश्वर पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव विलास शिंदे, नेमीचंद घोडके, केशव तुपे, डॉ़ रामदास टेकाळे, प्राचार्य विठ्ठल घुले, प्रा़रावसाहेब क्षीरसागर यांची उपस्थिती होती़भालेराव म्हणाले, वाचनामुळे मानवाचा बौद्धिक विकास होतो, सध्या स्पर्धेच्या युगामध्ये वाचन महत्त्वाचे असून, यासाठी सार्वजनिक ग्रंथालये हा महत्त्वाचा घटक आहे़आधुनिक जगात स्मार्ट मोबाईल आला असला तरी त्या माध्यमातून चांगले घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले़ यावेळी भालेराव यांनी ‘काट्या कुट्याचा तुडवित रस्ता, गावकडे चल माझ्या दोस्ता’ ही कविता सादर केली़डॉ़ रामेश्वर पवार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर ग्रंथालयाकडे वळा, सतत वाचन करा, वाचनामुळेच तुम्ही जगू शकाल, असे ते म्हणाले़ जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे, प्राचार्य विठ्ठल घुले, विद्यार्थी प्रतिनिधी वैभव राऊत यांनीही मनोगत व्यक्त केले़ राजेश्वरी घाडगे यांनी सूत्रसंचालन केले़ डॉ़ त्रिमूर्ती सोमवंशी यांनी आभार मानले़

टॅग्स :parabhaniपरभणीlibraryवाचनालयcollegeमहाविद्यालय