शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

परभणी : सार्वजनिक ग्रंथालयांची निर्मिती काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:22 IST

स्पर्धेच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत असताना वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे़ प्रत्येक गावात सार्वजनिक ग्रंथालयांची आवश्यकता असून, ती काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कवी प्रा़ इंद्रजीत भालेराव यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्पर्धेच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत असताना वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे़ प्रत्येक गावात सार्वजनिक ग्रंथालयांची आवश्यकता असून, ती काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कवी प्रा़ इंद्रजीत भालेराव यांनी केले़उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय यांच्या वतीने घेण्यात येत असलेल्या ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या निरोप समारंभ प्रसंगी भालेराव बोलत होते़७ जून रोजी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या गं्रथालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ़ रामेश्वर पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव विलास शिंदे, नेमीचंद घोडके, केशव तुपे, डॉ़ रामदास टेकाळे, प्राचार्य विठ्ठल घुले, प्रा़रावसाहेब क्षीरसागर यांची उपस्थिती होती़भालेराव म्हणाले, वाचनामुळे मानवाचा बौद्धिक विकास होतो, सध्या स्पर्धेच्या युगामध्ये वाचन महत्त्वाचे असून, यासाठी सार्वजनिक ग्रंथालये हा महत्त्वाचा घटक आहे़आधुनिक जगात स्मार्ट मोबाईल आला असला तरी त्या माध्यमातून चांगले घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले़ यावेळी भालेराव यांनी ‘काट्या कुट्याचा तुडवित रस्ता, गावकडे चल माझ्या दोस्ता’ ही कविता सादर केली़डॉ़ रामेश्वर पवार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर ग्रंथालयाकडे वळा, सतत वाचन करा, वाचनामुळेच तुम्ही जगू शकाल, असे ते म्हणाले़ जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे, प्राचार्य विठ्ठल घुले, विद्यार्थी प्रतिनिधी वैभव राऊत यांनीही मनोगत व्यक्त केले़ राजेश्वरी घाडगे यांनी सूत्रसंचालन केले़ डॉ़ त्रिमूर्ती सोमवंशी यांनी आभार मानले़

टॅग्स :parabhaniपरभणीlibraryवाचनालयcollegeमहाविद्यालय