शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

परभणीत राष्ट्रीय संमेलन :धर्म मानणाºयांनी शांततेसाठी एकत्र येण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:34 IST

देशातील वातावरण बदलत चालले आहे़ अशांती, अत्याचार, द्वेषाची भावना वाढत असून, दु:ख या गोष्टीचे आहे की याबाबी धर्माच्या अडून केल्या जात आहेत़ त्यामुळे धर्म मानणाºयांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन धर्मगुरु दलाईलामा यांचे उत्तराधिकारी लामा लोबजंग यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : देशातील वातावरण बदलत चालले आहे़ अशांती, अत्याचार, द्वेषाची भावना वाढत असून, दु:ख या गोष्टीचे आहे की याबाबी धर्माच्या अडून केल्या जात आहेत़ त्यामुळे धर्म मानणाºयांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन धर्मगुरु दलाईलामा यांचे उत्तराधिकारी लामा लोबजंग यांनी केले़सोसायटी फॉर कम्युनल हार्मोनी आणि पद्मभूषण मौलाना अब्दुल करीम पारेख फाऊंडेशन यांच्या वतीने शनिवारी परभणी येथील बी़ रघुनाथ सभागृहात राष्ट्राच्या सामाजिक, सांप्रदायिक व आर्थिक समस्यांवर आधारित राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले़ या प्रसंगी लामा लोबजंग बोलत होते़ कार्यक्रमास दिल्ली येथील कॅन्सर इंन्स्टिट्युटचे सहसंचालक अब्दुल मन्नान, मॅक्सीसी अवार्ड विजेते प्रो.संदीप पांडे, विजयवाडा येथील फारुक शुबली, फादर डॉ.बेन्नी कल्लीकट, शहीद भगतसिंग यांचे भाचे प्रो.जगमोहन सिंग, नियोजन आयोगाच्या माजी सदस्या पद्मश्री सय्यदा सैयदैन हमीद, डॉ.मकदुम फारुकी, उद्योजक अब्दुल मजीद पारेख, महापौर मीनाताई वरपूडकर, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, उपमहापौर माजू लाला, मनपाचे गटनेते भगवान वाघमारे, प्रवीण देशपांडे, हमीद मलीक, पंकज खेडकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, दिल्ली येथील सोसायटी फॉर कम्युनल हार्मोनीचे कार्यकारी सदस्य तथा आयोजक अ‍ॅड.मुजाहेद खान आदींची उपस्थिती होती़ लोबजंग म्हणाले, एकमेकांचा द्वेष करणे, अत्याचार करणे अशी शिकवण कोणताही धर्म देत नाही़ परंतु़, धर्माच्या आडून या गोष्टी होत आहेत़ त्यामुळे जगात शांती निर्माण करावयाची असेल तर धर्म मानणाºया व्यक्तींनी एकत्र येऊन काम करण्याची गरज निर्माण झाली आहे़ प्रेमाच्या माध्यमातूनच शांती प्रस्थापित होते़ तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितले आहे की, ‘वैर से वैर’ या नितीने शांती प्रस्थापित होत नाही़ त्यामुळे मैत्री, प्रेम आवश्यक आहे़ मन हेच यासाठी महत्त्वाचे माध्यम आहे़ त्यामुळे मनावर ताबा मिळविला पाहिजे़ प्रत्येकाचे मन शांत आणि पवित्र झाले तर शांती प्रस्थापित होवू शकते़ मनावर ताबा मिळवा आणि चांगले कर्म करा, हीच शिकवण धर्माच्या माध्यमातून दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले़ यावेळी विविध वक्त्यांनी देशाची सद्यस्थिती आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात अब्दुल माजीद पारीख, मजहर अली खान, फारुख शुबली, फादर डॉ़ बेनी कालीकत, प्रा़ जगमोहन सिंग यांनीही मार्गदर्शन केले़ मुजाहेद खान यांनी प्रास्ताविक केले़