शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

परभणी : वीस खाटांचा विभाग सुरु करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:54 IST

जिल्हा रुग्णालयांतर्गत कार्यरत असलेला स्त्री रुग्ण विभाग गायब झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने आता या ठिकाणी २० खाटांचा स्वतंत्र स्त्री रुग्ण वॉर्ड कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे १२ वर्षांपासून जिल्हा रुग्णालयातून गायब झालेला स्त्री रुग्ण विभाग पुन्हा नव्याने सुरु होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा रुग्णालयांतर्गत कार्यरत असलेला स्त्री रुग्ण विभाग गायब झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने आता या ठिकाणी २० खाटांचा स्वतंत्र स्त्री रुग्ण वॉर्ड कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे १२ वर्षांपासून जिल्हा रुग्णालयातून गायब झालेला स्त्री रुग्ण विभाग पुन्हा नव्याने सुरु होणार आहे.परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तत्कालीन आरोग्यमंत्री दिवंगत डॉ.विमल मुंदडा यांनी जुलै २००५ मध्ये स्वतंत्र स्त्री रुग्णालयास मंजुरी दिली होती. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाची ६० व स्त्री रुग्णालयाचे ७० असे एकूण १३० खाटांचे स्त्री रुग्णालय सुरु होणे अपेक्षित होते. मात्र रुग्णालय प्रशासनाने गेल्या १२ वर्षापासून परभणीकरांना अंधारात ठेवून ६० खाटांचेच स्त्री रुग्णालय कार्यान्वित केले. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या महिलांची १२ वर्षापासून मोठी हेळसांड झाली. नोव्हेंबर २०१७ मध्ये जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या केंद्र शासनाच्या सीआरएम पथकाच्या अहवालात ही बाब समोर आली. त्यानंतर ‘लोकमत’ने १० मार्च रोजीच्या अंकामध्ये ‘स्त्री रुग्ण विभाग १२ वर्षापासून गायब’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने ७० पैकी २० खाट रुग्णालयातील ट्रॉमाकेअरच्या इमारतीमध्ये सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.दोषींवर कारवाई करागेल्या १२ वर्षापासून परभणीकरांना अंधारात ठेवून जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने कारभार केला. त्यामुळे गायब झालेल्या ७० खाटांपैकी केवळ २० खाटा सुरु करण्याच्या हालचाली रुग्णालय प्रशासनाने सुरु केल्या आहेत. परंतु, २० खाटा सुरु न करता संपूर्ण ७० खाटा सुरु कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्री विभाग बंद ठेवण्यास कारणीभूत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाºयांची चौकशी करुन त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.