शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वीस खाटांचा विभाग सुरु करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:54 IST

जिल्हा रुग्णालयांतर्गत कार्यरत असलेला स्त्री रुग्ण विभाग गायब झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने आता या ठिकाणी २० खाटांचा स्वतंत्र स्त्री रुग्ण वॉर्ड कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे १२ वर्षांपासून जिल्हा रुग्णालयातून गायब झालेला स्त्री रुग्ण विभाग पुन्हा नव्याने सुरु होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा रुग्णालयांतर्गत कार्यरत असलेला स्त्री रुग्ण विभाग गायब झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने आता या ठिकाणी २० खाटांचा स्वतंत्र स्त्री रुग्ण वॉर्ड कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे १२ वर्षांपासून जिल्हा रुग्णालयातून गायब झालेला स्त्री रुग्ण विभाग पुन्हा नव्याने सुरु होणार आहे.परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तत्कालीन आरोग्यमंत्री दिवंगत डॉ.विमल मुंदडा यांनी जुलै २००५ मध्ये स्वतंत्र स्त्री रुग्णालयास मंजुरी दिली होती. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाची ६० व स्त्री रुग्णालयाचे ७० असे एकूण १३० खाटांचे स्त्री रुग्णालय सुरु होणे अपेक्षित होते. मात्र रुग्णालय प्रशासनाने गेल्या १२ वर्षापासून परभणीकरांना अंधारात ठेवून ६० खाटांचेच स्त्री रुग्णालय कार्यान्वित केले. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या महिलांची १२ वर्षापासून मोठी हेळसांड झाली. नोव्हेंबर २०१७ मध्ये जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या केंद्र शासनाच्या सीआरएम पथकाच्या अहवालात ही बाब समोर आली. त्यानंतर ‘लोकमत’ने १० मार्च रोजीच्या अंकामध्ये ‘स्त्री रुग्ण विभाग १२ वर्षापासून गायब’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने ७० पैकी २० खाट रुग्णालयातील ट्रॉमाकेअरच्या इमारतीमध्ये सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.दोषींवर कारवाई करागेल्या १२ वर्षापासून परभणीकरांना अंधारात ठेवून जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने कारभार केला. त्यामुळे गायब झालेल्या ७० खाटांपैकी केवळ २० खाटा सुरु करण्याच्या हालचाली रुग्णालय प्रशासनाने सुरु केल्या आहेत. परंतु, २० खाटा सुरु न करता संपूर्ण ७० खाटा सुरु कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्री विभाग बंद ठेवण्यास कारणीभूत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाºयांची चौकशी करुन त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.