शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

परभणी : ४३ लाखांचा खनिज विकास निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:37 IST

जिल्हा खनीजकर्म विभागांतर्गत जमा असलेल्या खनीज विकास निधीतून तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींना गावात विविध विकासकामे करण्यासाठी ४३ लाख २६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ५० टक्के निधी म्हणजेच २१ लाख ६३ हजार १८४ रुपये मानवत पंचायत समितीला प्राप्त झाले असून या निधीतून तालुक्यातील नऊ गावांमध्ये विविध विकासकामे केली जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : जिल्हा खनीजकर्म विभागांतर्गत जमा असलेल्या खनीज विकास निधीतून तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींना गावात विविध विकासकामे करण्यासाठी ४३ लाख २६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ५० टक्के निधी म्हणजेच २१ लाख ६३ हजार १८४ रुपये मानवत पंचायत समितीला प्राप्त झाले असून या निधीतून तालुक्यातील नऊ गावांमध्ये विविध विकासकामे केली जाणार आहेत.तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या क्षेत्रावर गौण खनिजाचे उत्खनन केल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने एकूण उत्पादनाच्या काही भाग संबंधित ग्रामपंचायतीमार्फत गावाच्या विकासासाठी देण्यासाठी पुढाकार घेतला.तालुक्यातील रामपुरी, वांगी, उक्कलगाव, कोल्हा, इरळद, कोल्हावाडी, हटकरवाडी, खरबा, रुढी या ग्रामपंचायतीच्या हद्दीत गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आले होते. या बदल्यात लाखोंचा महसूल जमा झाला होता. यापैकी काही रक्कम ग्रामपंचायतीला मिळणार असल्याने ग्रामपंचायतींनी गावातील महत्त्वाची व अति महत्त्वाच्या कामाची यादी करून या कामाचे ठराव घेऊन जिल्हा परिषदेला पाठविण्यात आले. जि.प. ने हे ठराव आणि कामाची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली. छाननी करून ९ ग्रामपंचायतींना विकासकामासाठी एकूण ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी ५० टक्के निधी पंचायत समितीला प्राप्त झाला आहे.उर्वरित ५० टक्के निधी काम पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे. यामध्ये कोल्हावाडी गावासाठी ११ लाख रुपये, हटकरवाडी ७१ हजार ५५९ रुपये, खरबा ३८ हजार ८५९ रुपये, ३ लाख ४५ हजार ७१५, रामपुरी ७३ हजार ३७६, वांगी ४ लाख ५२ हजार ९२२ रुपये, उक्कलगाव ६४ हजार ७६५, कोल्हा १९ हजार ३९८ , इरळद ६ हजार ७६३ असा एकूण २१ लाख ६३ हजार १८४ रुपयांचा ५० टक्के निधी पंचायत समितीकडे वर्ग करण्यात आला आहे.निधीचा हिशोब ठेवावा लागणारगौण खनिज खनिकर्म विभागाकडून मिळालेल्या निधीतून विकासकामे करताना ग्रामपंचायतींना वितरित केलेला निधी त्याच कामावर खर्च करावा लागणार आहे. मंजूर निधीपेक्षा जास्तीचा खर्च करता येणार नसल्याचे आदेश देण्यात आले आहेत. विकासकामांचा मासिक प्रगतीचा अहवाल न चुकता ग्रामपंचायतींना सादर करावा लागणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर कामाच्या ठिकाणी दर्शनी भागात कामाचा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमानुसार काम झाले असल्याची खात्री झाल्यानंतरच उर्वरित निधी वितरित केला जावा, असा आदेश जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दिला आहे. त्यामुळे मिळालेल्या निधीतून झालेल्या विकासकामांचा चोख हिशोब ठेवावा लागणार आहे.कोल्हावाडी ग्रा.पं.ला : सर्वाधिक निधीगौण खनिजाचे उत्खनन केल्याबद्दल मानवत तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींना ४३ लाख २६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये हटकरवाडी ग्रामपंचायतीला १ लाख ४३ हजार रुपये, खरबा ७७ हजार रुपये, रुढी ३ लाख ९ हजार रुपये, रामपुरी १ लाख ६४ हजार रुपये, वांगी ९ लाख २१ हजार रुपये, इरळद १३ हजार ५०० रुपये, उक्कलगाव १ लाख २९ हजार तर सर्वाधिक कोल्हावाडी ग्रामपंचायतीला २१ लाख ६४ हजार रुपयांचा निधी गौण खनिज खनिकर्म विभागांतर्गत मंजूर करण्यात आला आहे. मात्र यातील ५० टक्के निधी पं.स.ला वर्ग झाला आहे. उर्वरित निधी काम पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे. या निधीतून पाणीपुरवठा, वृक्ष लागवड, अंगणवाडी, शालेय साहित्य खरेदी, पर्यावरण संवर्धन, कौशल्य विकास, सिमेंट रस्ते, पथदिवे बसविणे, पाणलोट इ. कामे केली जाणार आहेत.ग्रामपंचायतींनी अंदाजपत्रक तयार करून पंचायत समितीला सादर केल्यानंतर कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहेत.-शैलेंद्र पानपाटील,विस्तार अधिकारी, पं.स. मानवत

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारीgram panchayatग्राम पंचायत