शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

परभणी : महावितरण कंपनीकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 00:45 IST

शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परिसरात वीज वितरण कंपनीने वर्दळीच्या रस्त्याच्या कडेला टेम्पोमध्ये विद्युत रोहित्र ठेऊन वीजपुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. याकडे अधीक्षक अभियंत्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परिसरात वीज वितरण कंपनीने वर्दळीच्या रस्त्याच्या कडेला टेम्पोमध्ये विद्युत रोहित्र ठेऊन वीजपुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. याकडे अधीक्षक अभियंत्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.वीज वितरण कंपनीकडून औद्योगिक, घरगुती, कृषी व वाणिज्य अशा जवळपास ३ लाख वीज ग्राहकांच्या वीजपुरवठा केला जातो. या वीज ग्राहकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्ह्यात १० उपविभागांची निर्मिती करण्यात आली; परंतु, मागील काही दिवसांपासून या उपविभागांसह वीज वितरण कंपनीचा कारभार ढेपाळला आहे. परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रंथालय इमारतीच्या पाठीमागील वर्दळीच्या रस्त्याच्या कडेला विद्युत रोहित्र उभारण्यात आले होेते. मात्र हे विद्युत रोहित्र अचानक जळाले. त्यामुळे विद्यापीठ परिसरातील वीज खंडित झाली. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या वतीने एम.एच.१४ एफ ३८१९ या क्रमांकाच्या टेम्पोमध्ये विद्युत रोहित्र ठेऊन वीजपुरवठा सुरळीत केला आहे. तीन ते चार दिवसांपासून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोमधील विद्युत रोहित्रामधून वीजपुरवठा सुरु आहे. हा विद्यापीठातील प्रमुख रस्ता असल्याने या ठिकाणी २४ तास वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक व वाहनधारक आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. मागील तीन दिवसांपासून नवीन विद्युत रोहित्र या ठिकाणी बसविण्यात आले नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीचा कारभार ढेपाळला असल्याचे दिसून येत आहे. याकडे महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.विद्युतरोहित्र : जळण्याचे प्रमाण वाढले४मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांसह गावठाणाला वीज वितरण कंपनीकडून देण्यात येणारे विद्युत रोहित्र दोन ते तीन दिवसात जळत असल्याचा प्रकार परभणी तालुक्यातील जांब, वांगी या ठिकाणी घडला आहे.४दुरुस्ती व नवीन विद्युतरोहित्र जळण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे महावितरणकडून विद्युत रोहित्र ने-आण करण्याचा खर्चही देण्यात येतो.४मात्र संबंधित एजन्सीकडून मागील काही दिवसांपासून ने-आण करण्याचे पैसे ही दिले जात नाहीत. त्यामुळे वीज ग्राहकांना आर्थिक फटका सहन करीत गैरसोयीचाही सामना करावा लागत असल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत.टेम्पोमधील विद्युत रोहित्राचा नागरिकांच्या जिवाला धोका नाही. टेम्पोमधील विद्युत रोहित्राचा वीजपुरवठा खंडित करून त्या ठिकाणी नवीन विद्युत रोहित्र बसविण्यात येणार आहे. त्या ठिकाणचे विद्युत रोहित्र दुुरुस्तीसाठी नेण्यात आले आहे. दुरुस्तीला वेळ लागला आहे. उद्यापर्यंत त्या ठिकाणी नवीन विद्युत रोहित्र बसविण्यात येऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.- राजेश लोंढे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण