शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

परभणी : हमीभावाने तूर खरेदीला १९ क्विंटलची मर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:21 IST

जिल्ह्यात शासकीय हमीभावाने तूर खरेदी सुरू झाली असली तरी प्रती हेक्टरी केवळ १९ क्विंटल तूर खरेदी करण्याची मर्यादा घातल्याने उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात शासकीय हमीभावाने तूर खरेदी सुरू झाली असली तरी प्रती हेक्टरी केवळ १९ क्विंटल तूर खरेदी करण्याची मर्यादा घातल्याने उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे़खरीप हंगामातील तुरीचे पीक जिल्ह्यात बहरात आले होते़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले आहे़ मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही तुरीचे विक्रमी उत्पादन झाले आहे़ त्यामुळे तूर उत्पादकांच्या आशा वाढल्या आहेत़ मात्र शेतकºयांची फरफट अजूनही सुरूच आहे़ दोन महिन्यांपासून तूर विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल होत आहे़ परंतु, शासनाने हमीभाव तूर खरेदी केंद्र वेळेत सुरू केले नाहीत़ याचा फायदा घेत व्यापाºयांनी कवडीमोल दराने तुरीची खरेदी केली़ शासनाने तुरीसाठी ५ हजार ४५० रुपये हमीभाव जाहीर केला असताना खुल्या बाजारपेठेत मात्र ४ हजार १०० ते ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे तुरीची खरेदी झाली़ त्यामुळे सुरुवातीचे दोन महिने शेतकºयांना क्विंटलमागे १२०० रुपयांचा फटका सहन करावा लागला़ आर्थिक विवंचनेत असलेल्या अनेक शेतकºयांनी खुल्या बाजारात तूर विक्रीलाही घातली़दरम्यान, हमीभाव खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने शेतकºयांची ओरड वाढली़ ही बाब लक्षात घेऊन शासनाने फेबु्रवारी महिन्यात खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला़ मात्र हे केंद्र सुरू करीत असताना देखील अनेक नियम व अटी घालण्यात आल्या़ शेतकºयांना थेट तूर विक्रीची मुभा दिली नाही़ तूर विक्रीसाठी सुरुवातीला नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले़ नोंदणी केलेल्या शेतकºयांचीच तूर खरेदी केली जात आहे़ त्यातही अनेक त्रुटी आहेत़ शासनाने केवळ नोंदणीकृती शेतकºयांचीच तूर खरेदी करीत असताना खरेदी संदर्भातही अटी घातल्या आहेत़ त्यात परभणी जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रांवर १ हेक्टर शेत जमिनीसाठी केवळ १९ क्विंटल तूर खरेदी करण्याची मर्यादा घालण्यात आली आहे़ परभणी जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात निसर्गाची साथ लाभली़ मुबलक पाणीही उपलब्ध झाले होते़ सर्वसाधारणपणे एकरी १० क्विंटलपर्यंत तुरीचे उत्पादन होते़ हेक्टरचा हिशोब केला तर २५ क्विंटलपर्यंत हेक्टरी उत्पादन मिळते़ त्यामुळे बहुतांश शेतकºयांना उत्पादन अधिक झाले असतानाही मर्यादेतच तूर घालावी लागत आहे़ खुल्या बाजारात तुरीला भाव मिळत नाही़ त्यामुळे चांगले उत्पादन होवूनही नुकसान सहन करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे़नऊ हजार : क्विंटल तुरीची खरेदीजिल्ह्यात ७ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत़ त्यात नाफेडचे ६ आणि विदर्भ फेडरशेनच्या एका केंद्राचा समावेश आहे़ विशेष म्हणजे, जिल्ह्यात तुरीचे उत्पादन भरपूर झाले आहे आणि हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले असताना विक्रीसाठी मात्र गर्दी होत नसल्याचे दिसत आहे़ आतापर्यंत या हमीभाव केंद्रांवर ९ हजार क्विंटलपर्यंतची तूर खरेदी करण्यात आली आहे़ शासनाच्या नियम व अटींमुळे तूर खरेदीत अडथळे निर्माण होत आहेत़ खरेदी केंद्रामार्फत दररोज शेतकºयांना संदेश देऊन बोलावून घेतले जाते़ परंतु, काही कारणास्तव शेतकरी खरेदी केंद्रावर पोहचले नाही तर त्यांचे नुकसानच होत आहे़ तसेच केंद्र चालकांचा वेळ वाया जात आहे़खुल्या बाजारात मोठी खरेदीहमीभाव केंद्रांवर ५ हजार ४५० रुपयांचा भाव मिळत असला तरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मात्र त्यापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी झाली आहे़ तीही केंद्राच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक आहे़ त्यामुळे हमीभाव मिळूनही शेतकºयांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे़