शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

परभणी : हमीभावाने तूर खरेदीला १९ क्विंटलची मर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:21 IST

जिल्ह्यात शासकीय हमीभावाने तूर खरेदी सुरू झाली असली तरी प्रती हेक्टरी केवळ १९ क्विंटल तूर खरेदी करण्याची मर्यादा घातल्याने उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात शासकीय हमीभावाने तूर खरेदी सुरू झाली असली तरी प्रती हेक्टरी केवळ १९ क्विंटल तूर खरेदी करण्याची मर्यादा घातल्याने उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे़खरीप हंगामातील तुरीचे पीक जिल्ह्यात बहरात आले होते़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले आहे़ मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही तुरीचे विक्रमी उत्पादन झाले आहे़ त्यामुळे तूर उत्पादकांच्या आशा वाढल्या आहेत़ मात्र शेतकºयांची फरफट अजूनही सुरूच आहे़ दोन महिन्यांपासून तूर विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल होत आहे़ परंतु, शासनाने हमीभाव तूर खरेदी केंद्र वेळेत सुरू केले नाहीत़ याचा फायदा घेत व्यापाºयांनी कवडीमोल दराने तुरीची खरेदी केली़ शासनाने तुरीसाठी ५ हजार ४५० रुपये हमीभाव जाहीर केला असताना खुल्या बाजारपेठेत मात्र ४ हजार १०० ते ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे तुरीची खरेदी झाली़ त्यामुळे सुरुवातीचे दोन महिने शेतकºयांना क्विंटलमागे १२०० रुपयांचा फटका सहन करावा लागला़ आर्थिक विवंचनेत असलेल्या अनेक शेतकºयांनी खुल्या बाजारात तूर विक्रीलाही घातली़दरम्यान, हमीभाव खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने शेतकºयांची ओरड वाढली़ ही बाब लक्षात घेऊन शासनाने फेबु्रवारी महिन्यात खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला़ मात्र हे केंद्र सुरू करीत असताना देखील अनेक नियम व अटी घालण्यात आल्या़ शेतकºयांना थेट तूर विक्रीची मुभा दिली नाही़ तूर विक्रीसाठी सुरुवातीला नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले़ नोंदणी केलेल्या शेतकºयांचीच तूर खरेदी केली जात आहे़ त्यातही अनेक त्रुटी आहेत़ शासनाने केवळ नोंदणीकृती शेतकºयांचीच तूर खरेदी करीत असताना खरेदी संदर्भातही अटी घातल्या आहेत़ त्यात परभणी जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रांवर १ हेक्टर शेत जमिनीसाठी केवळ १९ क्विंटल तूर खरेदी करण्याची मर्यादा घालण्यात आली आहे़ परभणी जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात निसर्गाची साथ लाभली़ मुबलक पाणीही उपलब्ध झाले होते़ सर्वसाधारणपणे एकरी १० क्विंटलपर्यंत तुरीचे उत्पादन होते़ हेक्टरचा हिशोब केला तर २५ क्विंटलपर्यंत हेक्टरी उत्पादन मिळते़ त्यामुळे बहुतांश शेतकºयांना उत्पादन अधिक झाले असतानाही मर्यादेतच तूर घालावी लागत आहे़ खुल्या बाजारात तुरीला भाव मिळत नाही़ त्यामुळे चांगले उत्पादन होवूनही नुकसान सहन करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे़नऊ हजार : क्विंटल तुरीची खरेदीजिल्ह्यात ७ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत़ त्यात नाफेडचे ६ आणि विदर्भ फेडरशेनच्या एका केंद्राचा समावेश आहे़ विशेष म्हणजे, जिल्ह्यात तुरीचे उत्पादन भरपूर झाले आहे आणि हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले असताना विक्रीसाठी मात्र गर्दी होत नसल्याचे दिसत आहे़ आतापर्यंत या हमीभाव केंद्रांवर ९ हजार क्विंटलपर्यंतची तूर खरेदी करण्यात आली आहे़ शासनाच्या नियम व अटींमुळे तूर खरेदीत अडथळे निर्माण होत आहेत़ खरेदी केंद्रामार्फत दररोज शेतकºयांना संदेश देऊन बोलावून घेतले जाते़ परंतु, काही कारणास्तव शेतकरी खरेदी केंद्रावर पोहचले नाही तर त्यांचे नुकसानच होत आहे़ तसेच केंद्र चालकांचा वेळ वाया जात आहे़खुल्या बाजारात मोठी खरेदीहमीभाव केंद्रांवर ५ हजार ४५० रुपयांचा भाव मिळत असला तरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मात्र त्यापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी झाली आहे़ तीही केंद्राच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक आहे़ त्यामुळे हमीभाव मिळूनही शेतकºयांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे़