शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

परभणीत व्याख्यान : जीडीपी वाढविण्यासाठी ग्रामीण भागास प्राधान्य द्या- अनिल काकोडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:16 IST

देशातील लोकसंख्येच्या दोन तृतीयांश नागरिक ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत़ देशाचा जीडीपी वाढवायचा असेल तर ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे़ शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन अणूशास्त्रज्ञ डॉ़ अनिल काकोडकर यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : देशातील लोकसंख्येच्या दोन तृतीयांश नागरिक ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत़ देशाचा जीडीपी वाढवायचा असेल तर ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे़ शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन अणूशास्त्रज्ञ डॉ़ अनिल काकोडकर यांनी केले़येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्वयंसहाय्यता बचत गटाच्या वतीने २१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात ‘नव्या युगाकडे वाटचाल’ या विषयावर एकदिवसीय विवेक व्याख्यानसत्राचे आयोजन करण्यात आले होते़ या प्रसंगी अणुशास्त्रज्ञ डॉ़ अनिल काकोडकर बोलत होते़ अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ़बी़ व्यंकटेस्वरलू यांची उपस्थिती होती़ डॉ़ काकोडकर म्हणाले, भारत देश महासत्ता बनावा हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न आहे़ परंतु, देशातील तरुण त्यासाठी झटताना दिसून येत नाही़ इतर देश तंत्रज्ञानाच्या बळावर पुढे आले आहेत़ विकसित देशांनी तयार केलेले तंत्रज्ञान इतर देशांना निर्यात करून मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावली आहे़ परंतु, आपल्या देशातील ग्रामीण भागात सोयी, सुविधा व तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवेत, ते होत नाहीत़केवळ शहरी भागातच नवनवीन तंत्रज्ञानाची उपलब्धता करून जीडीपीचा विचार करण्यात येतो़ परंतु, देशाच्या लोकसंख्येच्या दोन तृतीयांश नागरिक ग्रामीण भागात वास्तव्य करतात़ त्यामुळे सरकारने शहराबरोबरच ग्रामीण भागासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत, तरच देशाचा जीडीपी वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले़या कार्यक्रमाचे आयोजन आनंद देशमुख, श्रीपाद देशपांडे, संदीप पौळ, रविशंकर झिंगरे यांनी केले होते. या व्याख्यानास शहरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती़