शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत व्याख्यान : जीडीपी वाढविण्यासाठी ग्रामीण भागास प्राधान्य द्या- अनिल काकोडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:16 IST

देशातील लोकसंख्येच्या दोन तृतीयांश नागरिक ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत़ देशाचा जीडीपी वाढवायचा असेल तर ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे़ शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन अणूशास्त्रज्ञ डॉ़ अनिल काकोडकर यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : देशातील लोकसंख्येच्या दोन तृतीयांश नागरिक ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत़ देशाचा जीडीपी वाढवायचा असेल तर ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे़ शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन अणूशास्त्रज्ञ डॉ़ अनिल काकोडकर यांनी केले़येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्वयंसहाय्यता बचत गटाच्या वतीने २१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात ‘नव्या युगाकडे वाटचाल’ या विषयावर एकदिवसीय विवेक व्याख्यानसत्राचे आयोजन करण्यात आले होते़ या प्रसंगी अणुशास्त्रज्ञ डॉ़ अनिल काकोडकर बोलत होते़ अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ़बी़ व्यंकटेस्वरलू यांची उपस्थिती होती़ डॉ़ काकोडकर म्हणाले, भारत देश महासत्ता बनावा हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न आहे़ परंतु, देशातील तरुण त्यासाठी झटताना दिसून येत नाही़ इतर देश तंत्रज्ञानाच्या बळावर पुढे आले आहेत़ विकसित देशांनी तयार केलेले तंत्रज्ञान इतर देशांना निर्यात करून मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावली आहे़ परंतु, आपल्या देशातील ग्रामीण भागात सोयी, सुविधा व तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवेत, ते होत नाहीत़केवळ शहरी भागातच नवनवीन तंत्रज्ञानाची उपलब्धता करून जीडीपीचा विचार करण्यात येतो़ परंतु, देशाच्या लोकसंख्येच्या दोन तृतीयांश नागरिक ग्रामीण भागात वास्तव्य करतात़ त्यामुळे सरकारने शहराबरोबरच ग्रामीण भागासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत, तरच देशाचा जीडीपी वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले़या कार्यक्रमाचे आयोजन आनंद देशमुख, श्रीपाद देशपांडे, संदीप पौळ, रविशंकर झिंगरे यांनी केले होते. या व्याख्यानास शहरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती़