शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कृषी उत्पादकतेला ८४ गावांत चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:24 IST

कृषी उत्पादकता वाढविण्याच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना जिल्ह्यातील २७५ गावांमध्ये राबविण्यात येणार असून पहिल्या टप्यात या योजनेंतर्गत ८४ गावांची निवड करण्यात आली आहे .

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कृषी उत्पादकता वाढविण्याच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना जिल्ह्यातील २७५ गावांमध्ये राबविण्यात येणार असून पहिल्या टप्यात या योजनेंतर्गत ८४ गावांची निवड करण्यात आली आहे .राज्यातील कृषी क्षेत्रासमोर निर्माण झालेली आव्हाने पाहता कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी व शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाने या प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना राज्यातील १५ आवर्षणग्रस्त जिल्हे व खारपट्टा भागात सुरू करण्याचा निर्णय गतवर्षी घेण्यात आला होता. त्यात परभणी जिल्ह्याचा समावेश होता. जिल्ह्यातील २७५ गावांची ही योजना राबविण्यासाठी निवडण्यात आली आहे. पहिल्या टप्यात यातील ९ तालुक्यातील ८४ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये गंगाखेड तालुक्यातील १२ गावांचा समावेश असून या गावांमध्ये ११ ग्रा.पं.त कृषी संजीवनी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जिंतूर तालुक्यातील १३ गावांची निवड करण्यात आली असून १० समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मानवत तालुक्यातील ६ गावांची निवड करण्यात आली असून सर्वच ठिकाणी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. सेलू तालुक्यातील ७ गावांची निवड करण्यात आली असून सर्वच ठिकाणी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.पाथरी तालुक्यातील १० गावांची निवड करण्यात आली. त्यापैकी ९ ठिकाणी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. सोनपेठ तालुक्यातील ९ गावांची निवड करण्यात आली असून ८ ठिकाणी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.परभणी तालुक्यातील ५ गावांची निवड करण्यात आली असून या सर्व गावांमध्ये समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. पूर्णा तालुक्यातील ११ गावांची निवड करण्यात आली. त्यापैकी ८ गावांमध्ये समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. पालम तालुक्यात ११ गावांची या योजनेसाठी निवड करण्यात आली असून त्यापैकी १० गावांमध्ये समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.या योजनेंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार ८४ गावांमध्ये ८४० हेक्टरवर फळबाग लागवडीचा लक्षांक ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये गंगाखेड व जिंतूर तालुक्यात प्रत्येकी १२० हेक्टर जमिनीवर तर मानवत तालुक्यात ६०, सेलू तालुक्यात ७०, पाथरी तालुक्यात १००, सोनपेठ तालुक्यात ९०, परभणी तालुक्यात ५०, पूर्णा, पालम तालुक्यात प्रत्येकी ११० हेक्टरचा लक्षांक आहे.अशी आहेत: प्रकल्पाची वैशिष्टे४नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत हवामान बदलास अनुसरून कृषी पद्धती विकसित करणे, अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादकतेत वृद्धी करणे, शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषीमूल्य साखळीमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे ही या प्रकल्पाची वैशिष्टये आहेत.४क्रीडा व टेरी यांनी विकसित केलेल्या शास्त्रीय निर्देशांकांचा वापर करून प्रकल्पांतर्गत समूह पद्धतीने गावांची निवड करण्यात आली आहे. महसूल मंडळ निहाय उभारणी करण्यात येणाºया स्वयंचलित हवामान केंद्रांकडून प्राप्त होणाºया माहितीस अनुसरून शेतकºयांना कृषी हवामान सल्ला देण्यात येणार आहे. शिवारातील पाण्याच्या ताळेबंदानुसार पिकांचे नियोजन करण्यात येणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेतीGovernmentसरकारFarmerशेतकरी