शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वाढत्या उन्हाने रस्ते निर्मनुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:26 IST

उष्णतेच्या झळांनी सध्या तालुका होरपळून निघत आहे. २९ एप्रिल रोजी शहारात ४५ अंशाच्यावर तापमानाची नोंद झाली. या उन्हाचा परिणाम सोमवारी आठवडे बाजारावर देखील झाल्याचे दिसून आले. नेहमी गर्दीने भरुन असलेल्या आठवडे बाजारात दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान शुकशुकाट दिसून आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : उष्णतेच्या झळांनी सध्या तालुका होरपळून निघत आहे. २९ एप्रिल रोजी शहारात ४५ अंशाच्यावर तापमानाची नोंद झाली. या उन्हाचा परिणाम सोमवारी आठवडे बाजारावर देखील झाल्याचे दिसून आले. नेहमी गर्दीने भरुन असलेल्या आठवडे बाजारात दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान शुकशुकाट दिसून आला.मागील चार दिवसांपासून उन्हाचा पारा वाढतच चालला असून नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील रस्ते निर्मनुष्य होत असून याचा परिणाम व्यावसायावर होत आहे. लहान बालके, वयोवृद्धांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.महत्त्वाचे काम असल्यावरच नागरिक दुपारी घराबाहेर पडत असल्याचे चित्र सद्यस्थितीत शहरासह तालुक्यात दिसत आहे. वाढत्या उन्हामुळे शेतकऱ्यांनी शेतातील मशागतीचे कामे पुढे ढकल्याचे दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांकडून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत शेतातील कामे आटोपण्यावर भर दिला जात आहे. उन्हापासून बचावासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. उष्माघातापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी टोपी, रुमालाचा वापर वाढला आहे. घशाला कोरड पडल्यावर थंड पेयाचा आधार घेतला जात आहे. संपूर्ण मानवत तालुक्यात उष्णतेची लाट असून दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत शहरातील रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. प्रत्येकजण सावलीचा आधार घेत असल्याचे चित्र आहे.ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर झालेल्या बेसुमार वृक्षतोडीमुळे रस्त्यालगत थांबण्यासाठीही झाडाची सावली शिल्लक राहिली नाही. त्यामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी नागरिक गारवा असलेल्या ठिकाणी थांबणे पसंत करीत आहेत. गेल्या आठ दिवसापासून तापमान वाढतच चालल्याने बाजारपेठेवर देखील याचा परिणाम दिसून येत आहे. बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाली आहे.सायंकाळी ६ वाजेनंंतर बाजारपेठेत गर्दी४उन्हाच्या या लाटेमुळे नेहमी गजबजुन राहत असलेली शहरातील भाजी मार्केट, कापड मार्केट, जिल्हा बँक परिसर, बसस्थानक या प्रमुख ठिकाणांसह तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, पोलीस ठाणे परिसर, मोंढा इत्यादी भागांत दुपारच्या वेळी शुकशुकाट दिसून येत आहे.४संध्याकाळी ६ वाजल्यानंतर लिंबू सरबत, उसाचा रस पिण्यासाठी दुकानांवर गर्दी करीत आहेत. त्याचबरोबर फळे खरेदी करण्यासाठीही नागरिक गर्दी करीत आहेत.मुलांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, पांढºया कपड्याचा वापर करावा. डोकेदुखी किंवा चक्कर आल्यास डॉक्टरांना भेटावे.-डॉ योगेश तोडकरीबालरोग तज्ञ

टॅग्स :parabhaniपरभणीTemperatureतापमान