शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

परभणी : आधारअभावी धान्य वितरणात अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:17 IST

जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभार्थी असलेल्या ७४ हजार १३९ शिधापत्रिका धारकांच्या अंगठ्याचे ठसे प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने या शिधापत्रिका धारकांना रेशनचे धान्य वितरित करताना अडचणी निर्माण होत आहेत़ विशेष म्हणजे, या लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसे उपलब्ध झाले नाही तर नोव्हेंबर महिन्यात हे लाभार्थी धान्यापासूनही वंचित राहू शकतात़ तेव्हा प्रशासनाने शिधापत्रिकाधारकांना ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभार्थी असलेल्या ७४ हजार १३९ शिधापत्रिका धारकांच्या अंगठ्याचे ठसे प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने या शिधापत्रिका धारकांना रेशनचे धान्य वितरित करताना अडचणी निर्माण होत आहेत़ विशेष म्हणजे, या लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसे उपलब्ध झाले नाही तर नोव्हेंबर महिन्यात हे लाभार्थी धान्यापासूनही वंचित राहू शकतात़ तेव्हा प्रशासनाने शिधापत्रिकाधारकांना ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे़जिल्ह्यात ई-पॉस मशीनच्या सहाय्यानेच रेशनचे धान्य वाटप करण्याची प्रक्रिया जून २०१७ पासून सुरू करण्यात आली आहे़ जून महिन्यापासून आतापर्यंत २ लाख ६७ हजार ४१३ शिधापत्रिका धारकांची आधार नोंदणी झाली असून, या शिधापत्रिका धारकांना ई-पॉसच्या सहाय्याने धान्य वाटप सुरू आहे़ मार्च २०१८ पासून जिल्ह्यामध्ये एईपीडीएस ही प्रणाली लागू झाली आहे़ या प्रणाली अंतर्गत आधार क्रमांकाबरोबरच लाभार्थ्याचा अंगठा ई-पॉस मशीनवर जुळवणी झाल्याशिवाय धान्य वितरण करणे अशक्य झाले आहे़ त्यामुळे ७४ हजार लाभार्थ्यांचे अंगठ्याचे ठसे उपलब्ध नसल्याने हे लाभार्थी धान्यापासून वंचित राहू शकतात़नोव्हेंबर महिन्यात ई-पॉस मशीनद्वारे धान्य वाटप करण्यासाठी नव्याने आधार सिडींग केलेला डाटा वापरला जाणार आहे़ हे काम जलदगतीने पूर्ण केले जाणार असून, ज्या लाभार्थ्यांच्या कुटूंबातील काही सदस्यांचे आधार नोंदविले नसतील, अशा सदस्यांनी रास्तभाव दुकानदारांकडे असलेल्या ई-पॉस मशीनवर अंगठ्याचा ठसा ठेवून आधार क्रमांक नोंदविल्यास त्या सदस्याची आधार सिडींग होणार आहे़ तेव्हा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ३१ आॅक्टोबरपूर्वी रास्तभाव दुकानदारांकडे आधार क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे़...तर रद्द होणार शिधापत्रिका४सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत १ डिसेंबर २०१८ पासून आतापर्यंत कुटूंबातील एकाही लाभार्थ्याचा आधार क्रमांक नोंद झालेला नसेल तर ती शिधापत्रिका रद्द केली जाणार आहे़ त्यामुळे ज्या कुटूंबातील एकाही सदस्याचे आधार क्रमांक नोंदविलेले नाहीत, त्यांनी ३० आॅक्टोबरपूर्वी तहसील कार्यालयात जाऊन सर्व सदस्यांचे आधार क्रमांक नोंदणी करून घ्यावेत, अन्यथा अशा शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिका रद्द कराव्या लागतील़ नवीन शिधापत्रिकेसाठी पुन्हा तहसील कार्यालयात अर्ज करावा लागेल़ ही गैरसोय टाळण्यासाठी शिधापत्रिकाधारकांनी तत्काळ आधार सिडींग करावे, असे आवाहन करण्यात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीAdhar Cardआधार कार्ड