शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

परभणी : आधारअभावी धान्य वितरणात अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:17 IST

जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभार्थी असलेल्या ७४ हजार १३९ शिधापत्रिका धारकांच्या अंगठ्याचे ठसे प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने या शिधापत्रिका धारकांना रेशनचे धान्य वितरित करताना अडचणी निर्माण होत आहेत़ विशेष म्हणजे, या लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसे उपलब्ध झाले नाही तर नोव्हेंबर महिन्यात हे लाभार्थी धान्यापासूनही वंचित राहू शकतात़ तेव्हा प्रशासनाने शिधापत्रिकाधारकांना ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभार्थी असलेल्या ७४ हजार १३९ शिधापत्रिका धारकांच्या अंगठ्याचे ठसे प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने या शिधापत्रिका धारकांना रेशनचे धान्य वितरित करताना अडचणी निर्माण होत आहेत़ विशेष म्हणजे, या लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसे उपलब्ध झाले नाही तर नोव्हेंबर महिन्यात हे लाभार्थी धान्यापासूनही वंचित राहू शकतात़ तेव्हा प्रशासनाने शिधापत्रिकाधारकांना ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे़जिल्ह्यात ई-पॉस मशीनच्या सहाय्यानेच रेशनचे धान्य वाटप करण्याची प्रक्रिया जून २०१७ पासून सुरू करण्यात आली आहे़ जून महिन्यापासून आतापर्यंत २ लाख ६७ हजार ४१३ शिधापत्रिका धारकांची आधार नोंदणी झाली असून, या शिधापत्रिका धारकांना ई-पॉसच्या सहाय्याने धान्य वाटप सुरू आहे़ मार्च २०१८ पासून जिल्ह्यामध्ये एईपीडीएस ही प्रणाली लागू झाली आहे़ या प्रणाली अंतर्गत आधार क्रमांकाबरोबरच लाभार्थ्याचा अंगठा ई-पॉस मशीनवर जुळवणी झाल्याशिवाय धान्य वितरण करणे अशक्य झाले आहे़ त्यामुळे ७४ हजार लाभार्थ्यांचे अंगठ्याचे ठसे उपलब्ध नसल्याने हे लाभार्थी धान्यापासून वंचित राहू शकतात़नोव्हेंबर महिन्यात ई-पॉस मशीनद्वारे धान्य वाटप करण्यासाठी नव्याने आधार सिडींग केलेला डाटा वापरला जाणार आहे़ हे काम जलदगतीने पूर्ण केले जाणार असून, ज्या लाभार्थ्यांच्या कुटूंबातील काही सदस्यांचे आधार नोंदविले नसतील, अशा सदस्यांनी रास्तभाव दुकानदारांकडे असलेल्या ई-पॉस मशीनवर अंगठ्याचा ठसा ठेवून आधार क्रमांक नोंदविल्यास त्या सदस्याची आधार सिडींग होणार आहे़ तेव्हा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ३१ आॅक्टोबरपूर्वी रास्तभाव दुकानदारांकडे आधार क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे़...तर रद्द होणार शिधापत्रिका४सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत १ डिसेंबर २०१८ पासून आतापर्यंत कुटूंबातील एकाही लाभार्थ्याचा आधार क्रमांक नोंद झालेला नसेल तर ती शिधापत्रिका रद्द केली जाणार आहे़ त्यामुळे ज्या कुटूंबातील एकाही सदस्याचे आधार क्रमांक नोंदविलेले नाहीत, त्यांनी ३० आॅक्टोबरपूर्वी तहसील कार्यालयात जाऊन सर्व सदस्यांचे आधार क्रमांक नोंदणी करून घ्यावेत, अन्यथा अशा शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिका रद्द कराव्या लागतील़ नवीन शिधापत्रिकेसाठी पुन्हा तहसील कार्यालयात अर्ज करावा लागेल़ ही गैरसोय टाळण्यासाठी शिधापत्रिकाधारकांनी तत्काळ आधार सिडींग करावे, असे आवाहन करण्यात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीAdhar Cardआधार कार्ड