शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

परभणी : सा़बां़च्या अधिकाºयांचे दुर्लक्ष : काम मंद गतीने; तरीही सव्वा सहा कोटी वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:11 IST

पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा येथून पूर्णाकडे जाणाºया रस्त्यावरील लक्ष्मीनगर ते पूर्णा या रस्त्याचे सद्यस्थितीत अत्यंत मंदगतीने काम सुरू असून, त्याचा दर्जाही राखला जात नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल सव्वा सहा कोटी रुपयांच्या बिलाची अदायगी संबंधित कंत्राटदाराला केल्याचा प्रकार समोर आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा येथून पूर्णाकडे जाणाºया रस्त्यावरील लक्ष्मीनगर ते पूर्णा या रस्त्याचे सद्यस्थितीत अत्यंत मंदगतीने काम सुरू असून, त्याचा दर्जाही राखला जात नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल सव्वा सहा कोटी रुपयांच्या बिलाची अदायगी संबंधित कंत्राटदाराला केल्याचा प्रकार समोर आला आहे़पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा येथून पूर्णाकडे जाणाºया रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्याचे नव्याने काम करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती़ त्या अनुषंगाने शासनाने लक्ष्मीनगर फाटा ते पूर्णा या रस्त्याच्या कामासाठी तब्बल १९ कोटी ४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला़ त्यानंतर हे काम परभणी येथील एका कंत्राटदाराला देण्यात आले़ या कंत्राटदाराने स्वत: हे काम पूर्ण करण्याऐवजी दुसरे तीन उप कंत्राटदार नियुक्त केले़ या निधीतून या १२ किमी रस्त्याची दुरुस्ती, डांबरीकरण तसेच या रस्त्यावर येणारे तीन पूल यांची उभारणी करण्याचे काम समाविष्ट आहे़ हे काम करीत असताना चांगल्या दर्जाचा मुरूम टाकून त्याची चांगली दबाई करणे तसेच डांबरीकरण करण्यासाठीही निकष ठरवून देण्यात आले होते़ त्यानंतर सदरील काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले़ ३१ मार्चपर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे़ परंतु, सद्यस्थितीत त्या दृष्टीकोणातून हे काम होताना दिसून येत नाही़ या कामाचा दर्जा न तपासताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी संबंधित कंत्राटदाराला दोन टप्प्यात काही दिवसांपूर्वी सव्वा सहा कोटी रुपयांच्या बिलाची अदायगी केली आहे़ सद्यस्थितीत लक्ष्मीनगर ते माटेगावपर्यंतच्या ४ किमीच्या अंतरावरील डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे़ त्यापुढे बरमाल नाला, नांदेड टी पाँर्इंट येथे गिट्टी टाकून दबाई सुरू आहे़ या रस्त्यावर येणाºया लहान नळकांडी पुलांचे काम संथगतीने सुरू आहे़ पूर्णा येथील वैभव जिनिंग समोरील कामाला अद्याप सुरुवातच झालेली नाही़ शिवाय ४ कंत्राटदारांमार्फत हे काम करण्यात येत असल्याने जागोजागी हे काम कोठे पूर्ण तर कोठे अर्धवट सोडून देण्यात आले आहे़ त्यामुळे या रस्त्यावर किरकोळ अपघात होत आहेत़ शिवाय या रस्त्यावरील धुळीने वाहनधारक त्रस्त झाले आहेत़ नियमानुसार हे काम येत्या २४ दिवसांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे़ परंतु, सद्यस्थितीत ज्या मंदगतीने हे काम सुरू आहे ते पाहता मार्च महिना संपला तरी हे काम पूर्ण होईल, याची शाश्वती नाही़ विशेष म्हणजे या संपूर्ण कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांचे फारसे लक्ष नाही़ त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे़