शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

परभणी : सा़बां़च्या अधिकाºयांचे दुर्लक्ष : काम मंद गतीने; तरीही सव्वा सहा कोटी वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:11 IST

पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा येथून पूर्णाकडे जाणाºया रस्त्यावरील लक्ष्मीनगर ते पूर्णा या रस्त्याचे सद्यस्थितीत अत्यंत मंदगतीने काम सुरू असून, त्याचा दर्जाही राखला जात नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल सव्वा सहा कोटी रुपयांच्या बिलाची अदायगी संबंधित कंत्राटदाराला केल्याचा प्रकार समोर आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा येथून पूर्णाकडे जाणाºया रस्त्यावरील लक्ष्मीनगर ते पूर्णा या रस्त्याचे सद्यस्थितीत अत्यंत मंदगतीने काम सुरू असून, त्याचा दर्जाही राखला जात नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल सव्वा सहा कोटी रुपयांच्या बिलाची अदायगी संबंधित कंत्राटदाराला केल्याचा प्रकार समोर आला आहे़पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा येथून पूर्णाकडे जाणाºया रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्याचे नव्याने काम करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती़ त्या अनुषंगाने शासनाने लक्ष्मीनगर फाटा ते पूर्णा या रस्त्याच्या कामासाठी तब्बल १९ कोटी ४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला़ त्यानंतर हे काम परभणी येथील एका कंत्राटदाराला देण्यात आले़ या कंत्राटदाराने स्वत: हे काम पूर्ण करण्याऐवजी दुसरे तीन उप कंत्राटदार नियुक्त केले़ या निधीतून या १२ किमी रस्त्याची दुरुस्ती, डांबरीकरण तसेच या रस्त्यावर येणारे तीन पूल यांची उभारणी करण्याचे काम समाविष्ट आहे़ हे काम करीत असताना चांगल्या दर्जाचा मुरूम टाकून त्याची चांगली दबाई करणे तसेच डांबरीकरण करण्यासाठीही निकष ठरवून देण्यात आले होते़ त्यानंतर सदरील काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले़ ३१ मार्चपर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे़ परंतु, सद्यस्थितीत त्या दृष्टीकोणातून हे काम होताना दिसून येत नाही़ या कामाचा दर्जा न तपासताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी संबंधित कंत्राटदाराला दोन टप्प्यात काही दिवसांपूर्वी सव्वा सहा कोटी रुपयांच्या बिलाची अदायगी केली आहे़ सद्यस्थितीत लक्ष्मीनगर ते माटेगावपर्यंतच्या ४ किमीच्या अंतरावरील डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे़ त्यापुढे बरमाल नाला, नांदेड टी पाँर्इंट येथे गिट्टी टाकून दबाई सुरू आहे़ या रस्त्यावर येणाºया लहान नळकांडी पुलांचे काम संथगतीने सुरू आहे़ पूर्णा येथील वैभव जिनिंग समोरील कामाला अद्याप सुरुवातच झालेली नाही़ शिवाय ४ कंत्राटदारांमार्फत हे काम करण्यात येत असल्याने जागोजागी हे काम कोठे पूर्ण तर कोठे अर्धवट सोडून देण्यात आले आहे़ त्यामुळे या रस्त्यावर किरकोळ अपघात होत आहेत़ शिवाय या रस्त्यावरील धुळीने वाहनधारक त्रस्त झाले आहेत़ नियमानुसार हे काम येत्या २४ दिवसांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे़ परंतु, सद्यस्थितीत ज्या मंदगतीने हे काम सुरू आहे ते पाहता मार्च महिना संपला तरी हे काम पूर्ण होईल, याची शाश्वती नाही़ विशेष म्हणजे या संपूर्ण कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांचे फारसे लक्ष नाही़ त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे़