शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सा़बां़च्या अधिकाºयांचे दुर्लक्ष : काम मंद गतीने; तरीही सव्वा सहा कोटी वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:11 IST

पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा येथून पूर्णाकडे जाणाºया रस्त्यावरील लक्ष्मीनगर ते पूर्णा या रस्त्याचे सद्यस्थितीत अत्यंत मंदगतीने काम सुरू असून, त्याचा दर्जाही राखला जात नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल सव्वा सहा कोटी रुपयांच्या बिलाची अदायगी संबंधित कंत्राटदाराला केल्याचा प्रकार समोर आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा येथून पूर्णाकडे जाणाºया रस्त्यावरील लक्ष्मीनगर ते पूर्णा या रस्त्याचे सद्यस्थितीत अत्यंत मंदगतीने काम सुरू असून, त्याचा दर्जाही राखला जात नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल सव्वा सहा कोटी रुपयांच्या बिलाची अदायगी संबंधित कंत्राटदाराला केल्याचा प्रकार समोर आला आहे़पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा येथून पूर्णाकडे जाणाºया रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्याचे नव्याने काम करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती़ त्या अनुषंगाने शासनाने लक्ष्मीनगर फाटा ते पूर्णा या रस्त्याच्या कामासाठी तब्बल १९ कोटी ४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला़ त्यानंतर हे काम परभणी येथील एका कंत्राटदाराला देण्यात आले़ या कंत्राटदाराने स्वत: हे काम पूर्ण करण्याऐवजी दुसरे तीन उप कंत्राटदार नियुक्त केले़ या निधीतून या १२ किमी रस्त्याची दुरुस्ती, डांबरीकरण तसेच या रस्त्यावर येणारे तीन पूल यांची उभारणी करण्याचे काम समाविष्ट आहे़ हे काम करीत असताना चांगल्या दर्जाचा मुरूम टाकून त्याची चांगली दबाई करणे तसेच डांबरीकरण करण्यासाठीही निकष ठरवून देण्यात आले होते़ त्यानंतर सदरील काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले़ ३१ मार्चपर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे़ परंतु, सद्यस्थितीत त्या दृष्टीकोणातून हे काम होताना दिसून येत नाही़ या कामाचा दर्जा न तपासताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी संबंधित कंत्राटदाराला दोन टप्प्यात काही दिवसांपूर्वी सव्वा सहा कोटी रुपयांच्या बिलाची अदायगी केली आहे़ सद्यस्थितीत लक्ष्मीनगर ते माटेगावपर्यंतच्या ४ किमीच्या अंतरावरील डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे़ त्यापुढे बरमाल नाला, नांदेड टी पाँर्इंट येथे गिट्टी टाकून दबाई सुरू आहे़ या रस्त्यावर येणाºया लहान नळकांडी पुलांचे काम संथगतीने सुरू आहे़ पूर्णा येथील वैभव जिनिंग समोरील कामाला अद्याप सुरुवातच झालेली नाही़ शिवाय ४ कंत्राटदारांमार्फत हे काम करण्यात येत असल्याने जागोजागी हे काम कोठे पूर्ण तर कोठे अर्धवट सोडून देण्यात आले आहे़ त्यामुळे या रस्त्यावर किरकोळ अपघात होत आहेत़ शिवाय या रस्त्यावरील धुळीने वाहनधारक त्रस्त झाले आहेत़ नियमानुसार हे काम येत्या २४ दिवसांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे़ परंतु, सद्यस्थितीत ज्या मंदगतीने हे काम सुरू आहे ते पाहता मार्च महिना संपला तरी हे काम पूर्ण होईल, याची शाश्वती नाही़ विशेष म्हणजे या संपूर्ण कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांचे फारसे लक्ष नाही़ त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे़