शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

परभणी : बैठक न घेताच पाणीटंचाईचा आराखडा कसा पाठवला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:32 IST

पाणीटंचाई आराखड्यासाठी लोकप्रतिनिधींची बैठक न घेताच याबाबतचा आराखडा तयार करुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कसा काय पाठविला? असा सवाल मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्याथी समितीच्या बैठकीत सदस्यांनी अधिकाºयांना केल्याने अधिकाºयांची गोची झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पाणीटंचाई आराखड्यासाठी लोकप्रतिनिधींची बैठक न घेताच याबाबतचा आराखडा तयार करुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कसा काय पाठविला? असा सवाल मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्याथी समितीच्या बैठकीत सदस्यांनी अधिकाºयांना केल्याने अधिकाºयांची गोची झाली.जि.प.अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.व्ही. करडखेलकर, विजय मुळीक, उपाध्यक्षा भावनाताई नखाते, सभापती अशोक काकडे, श्रीनिवास मुंडे, राधाबाई सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. यावेळी कृषी व पशूसंवर्धन विभागाच्या वतीने विशेष घटक योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जनावरे वितरित करण्याच्या निधीला मंजुरी देण्यात आली. तसेच जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या ३५ लाख रुपयांमधून ड्युलडेस्क खरेदीसही मंजुरी देण्यात आली. त्यानंतर झालेल्या चर्चेत पाणीटंचाईचा विषय आला. यावेळी अधिकाºयांनी पाणीटंचाईचा आराखडा मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला असल्याचे सांगितले. त्यावर सदस्यांनी तालुकास्तरावर पं.स.सभापती, सरपंचांच्या उपस्थितीमध्ये बैठका घेतल्या का? असा सवाल केला असता, अनेक ठिकाणी अशा बैठका झाल्या नसल्याचे स्पष्ट झाले. पाणीटंचाईच्या कालावधीत जनतेला लोकप्रतिनिधींना उत्तरे द्यावी लागतात. त्यामुळे पाणीटंचाईसाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत, याबाबत लोकप्रतिनिधी योग्य उपाय सूचवू शकतात; परंतु, त्यांना न विचारताच गटविकास अधिकाºयांनी परस्परच पाणीटंचाईचे आराखडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कसे काय सादर केले, असा सवाल उपस्थित सदस्यांनी केला. त्यावर अधिकाºयांची गोची झाली. शिवाय झालेली चूकही यावेळी कबूल करण्यात आली. पाणीटंचाईचा विषय प्रशासनाकडून गांभीर्याने घेतला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी समितीचे सदस्य राजेंद्र लहाने, विष्णू मांडे, समशेर वरपूडकर, भोसले आदींची उपस्थिती होती.