शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

परभणी : जिंतूरमध्ये प्लास्टिक बंदीला प्रशासनाचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:06 IST

शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचे साहित्य बाजारपेठेत सहज उपलब्ध होत असून, उलट बंदीनंतर साहित्याची विक्री बंदीच्या नावावर चढ्या दराने होत आहे़ प्रशासनाच्या प्लास्टिक मुक्तीचा निर्णय शहरामध्ये सध्या तरी फुसका बार ठरल्याचे दिसून येत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचे साहित्य बाजारपेठेत सहज उपलब्ध होत असून, उलट बंदीनंतर साहित्याची विक्री बंदीच्या नावावर चढ्या दराने होत आहे़ प्रशासनाच्या प्लास्टिक मुक्तीचा निर्णय शहरामध्ये सध्या तरी फुसका बार ठरल्याचे दिसून येत आहे़महाराष्ट्र शासनाने वर्षभरापूर्वी प्लास्टिकच्या वस्तुवर बंदी घातली होती़ कॅरीबॅग, पाणी पाऊच, प्लास्टिक ग्लास, द्रोण तसेच इतर प्लास्टिक वस्तू वापरू नयेत, असे आदेश असतानाही या वस्तुंची जिंतूर शहरासह तालुक्यात सर्रास विक्री होत असताना बाजारपेठेत दिसून येत आहे़ प्लास्टिक बंदीची घोषणा झाल्यानंतर बाजारपेठेत खळबळ उडाली होती़ प्रशासनाने तीन महिन्यांची सलवत दिली़ मात्र बंदीचा फारसा परिणाम जाणवला नाही़ ५१ मायक्रॉनपेक्षा कमी मॉयक्रॉनचे प्लास्टिक वापरावे, असे आदेश असतानाही या आदेशाचे खुलेआम उल्लंघन होत आहे़ बाजारपेठेतील ७५ टक्के व्यापारी आजही ग्राहकांना कॅरीबॅग उपलब्ध करून देत आहेत़विशेष म्हणजे ग्राहकसुद्धा कॅरीबॅगशिवाय माल घेण्यास तयार नाहीत़ परिणामी बंदीची पर्वा न करता व्यापारी ग्राहकांना कॅरीबॅग उपलब्ध करून देत आहेत़ शिवाय प्लास्टिक ग्लास, द्रोण, पाणी पाऊच व इतर साहित्यांना वापरावयाचे प्लास्टिक सहजपणे उपलब्ध होत असल्याने प्लास्टिक बंदी नसल्याचेच चित्र जिंतूर शहरात दिसून येत आहे़ रस्त्याच्या दुतर्फा पडलेले प्लास्टिकचे साहित्य, कॅरीबॅग, प्लास्टिक ग्लास हे बंदी नसल्याचेच द्योतक आहे़ एकीकडे पर्यावरण वाचवा म्हणणारे कॅरीबॅग व प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत असताना म्हणावा तसा प्रतिसाद व्यापारी, प्रशासन व नागरिकांकडून मिळत नाही, नव्हे तर त्यांची मानसिकताही नसल्याचे दिसून येते़ परिणामी शासनाचा कितीही चांगला निर्णय असला तरी लोकजागृती व प्रशासनाचा उदासिनपणा यामुळे हा निर्णय कागदावरच राहत आहे़रात्रीच्या वेळी होते वाहतूकप्लास्टिक बंदीचा कोणताही धाक न ठेवता कॅरीबॅग, प्लास्टिक ग्लासची रात्रीच्या वेळी वाहनातून सहजपणे वाहतूक केली जाते़ विशेष म्हणजे जालना व नांदेड येथून सर्वाधिक माल शहरात दाखल होतो़ प्लास्टिक बंदीच्या नावावर मोठी भाववाढही झाल्याचे बोलले जात आहे़पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकचा वापर बंद होणे गरजेचे आहे़ प्लास्टिकमुळे कॅन्सरसारख्या आजाराचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे़ प्रशासनाने कठोर पावले उचलून कार्यवाही केली तर त्याचा परिणाम होवू शकतो़ शिवाय जनजागृती होणेही गरजेचे आहे़-अ‍ॅड़ मनोज सारडा, पर्यावरणप्रेमी

टॅग्स :parabhaniपरभणीPlastic banप्लॅस्टिक बंदी