शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

परभणीत साडेपाच हजार शौचालयांना लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 12:13 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये सहभागी झालेल्या परभणी शहराला देशपातळीवर स्वच्छतेचे बक्षीस मिळाले असले तरी शहरातील तब्बल साडेपाच हजार कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे समोर आले आहे.  

ठळक मुद्देस्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नागरी भागात परभणी महानगरपालिकेचा समावेशलाखो रुपये या अभियानावर खर्चही झाले; परंतु, वैयक्तिक शौचालयाच्या बांधणीकडे दुर्लक्ष झाले.

परभणी : स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये सहभागी झालेल्या परभणी शहराला देशपातळीवर स्वच्छतेचे बक्षीस मिळाले असले तरी शहरातील तब्बल साडेपाच हजार कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे समोर आले आहे.  

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नागरी भागात परभणी महानगरपालिकेचा समावेश असून या अभियानात सहा महिन्यांपूर्वी शहरात मोठ्या प्रमाणात कामे झाली. सार्वजनिक हगणदारीची स्थळे निष्काशित करुन नागरिकांना शौचालयाच्या वापराचा संदेश देण्यात आला. लाखो रुपये या अभियानावर खर्चही झाले; परंतु, वैयक्तिक शौचालयाच्या बांधणीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे सद्यस्थितीला सुमारे ५ हजार ७८६ कुटुंबांमध्ये शौचालयाचे बांधकाम झाले नसल्याची बाब समोर आली आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत परभणी महापालिकेला १३ हजार वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले होते.

विशेष म्हणजे, यासाठी महापालिकेकडे १३ हजार ७५८ अर्ज दाखल झाले. त्यातून १३ हजार ७०८ अर्ज लाभ देण्यासाठी निवडण्यात आले; परंतु, प्रत्यक्षात या संपूर्ण अभियानामधून केवळ २ हजार १७ शौचालये पूर्ण झाली असून त्याचा वापर सुरु झाला आहे. ५ हजार १९७ शौचालयांचे बांधकाम झाल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे. या दोन्ही आकड्यांची गोळाबेरीज केली तर शहरात ७ हजार २१४ शौचालयांचे बांधकाम झाले आहे. प्रत्यक्षात ५ हजार ७८६ कुटुंबांकडे अजूनही शौचालय नसल्याचे या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे मोठा गाजावाजा करीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले असले तरी शहरातील साडेपाच हजार कुटुंब शौचालयाविना असल्याने या कुटुंबांना सार्वजनिक शौचालयाचा आधार घ्यावा लागत आहे. 

११ हजार लाभार्थ्यांना पहिला हप्तावैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासाठी राज्य शासनाकडून १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. महानगरपालिकेने स्वनिधीतून आणखी चार हजार रुपये असे १६ हजार रुपयांचे अनुदान शौचालय बांधकामासाठी जाहीर केले आहे. परभणी मनपा अंतर्गत ११ हजार ५८ लाभार्थ्यांना शौचालय बांधकामासाठी पहिला हप्ता वितरित करण्यात आला; परंतु, त्यानंतरचे हप्ते मात्र रखडले. त्यामुळे शौचालयाचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही.  

सार्वजनिक शौचालये पडली बंदस्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत परभणी शहरात ६३ ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची उभारणी करण्यात आली. वैयक्तिक शौचालय नसणाऱ्या कुटुुंबियांनी या शौचालयाचा वापर करावा, या उद्देशाने सार्वजनिक शौचालयांची उभारणी करण्यात आली. मात्र उन्हाळ्यामध्ये पाणी नसल्याचे कारण देत काही शौचालये बंद पडली आहेत. सध्या तर निम्म्या सार्वजनिक शौचालयांना चक्क कुलूप लावले आहे. या ठिकाणी नियुक्त कलेले कर्मचारीही जागेवर नाहीत.  

टॅग्स :Parbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान