शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कवडीमोल दराने शेतकºयांची तूर खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:20 IST

येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात व्यापाºयांनी हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी केली आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकºयांची कोंडी झाली आहे. २० दिवसांत मार्केट यार्डात १२५ क्विंटलची खरेदी खाजगी व्यापाºयांकडून करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात व्यापाºयांनी हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी केली आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकºयांची कोंडी झाली आहे. २० दिवसांत मार्केट यार्डात १२५ क्विंटलची खरेदी खाजगी व्यापाºयांकडून करण्यात आली आहे.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील खाजगी व्यापाºयांनी १ ते २० जानेवारी या काळात १२५ क्विंटल तुरीची खरेदी शेतकºयांकडून केली. केंद्र शासनाने तुरीला ५ हजार ४५० रुपये असा हमीभाव जाहीर केला आहे. सर्वसाधारणपणे शासनाने जाहीर केलेल्या हमीभावानुसारच शेतमालाची खरेदी करणे बंधनकारक आहे.परंतु, अनेक वेळा व्यापारी हमीभावाने खरेदी करीत नाहीत. परिणामी शेतकºयांना नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर्षीच्या हंगामात तुरीचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे निश्चित तुरीला भाव मिळणे अपेक्षित आहे. परंतु, त्याला फाटा देत व्यापाºयांनी हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणे सुरु आहे. परभणी येथील बाजार समितीमध्ये कमीत कमी ३९०० रुपयांपासून तुरीची खरेदी करण्यात आली.मोजक्या काही शेतकºयांना ४ हजार २३८ रुपये क्विंटलचा भाव मिळाला. २० दिवसांत कृउबाच्या कार्यक्षेत्रातील तूर उत्पादकांनी १२५ क्विंटल तुरीची विक्री केली आहे. मात्र हमीभाव जाहीर झाला असतानाही शेतमालाची विक्री कवडीमोल दराने करावी लागल्याने तूर उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.यावर्षी खरीप हंगामात शेतकºयांनी कापूस, मूग, सोयाबीन, उडीद, तूर आदी पिकांची लागवड केली होती. परंतु, जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग ही पिके शेतकºयांच्या हातची गेली असली तरी तुरीने मात्र शेतकºयांना तारले आहे.मात्र, शेतकºयांच्या शेतमालाला बाजारपेठेत कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्य शासनाने तत्काळ जिल्ह्यामध्ये तूर खरेदी करण्यासाठी हमीभाव खरेदी केंद्र उघडावेत, अशी मागणी तूर उत्पादकांमधून होत आहे.मूग, सोयाबीन, तूरीला : हमीभाव मिळेनायावर्षीच्या खरीप हंगामात शेतकºयांनी जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली. त्याच बरोबरीला मूग, उडीद ही पिकेही घेतली. परंतु, जुलै आणि आॅगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने अनेक शेतकºयांच्या हातची पिके गेली.ज्या शेतकºयांकडे उपलब्ध पाणी होते, त्यांना चांगले उत्पादन झाले. परंतु, बाजारपेठेत या शेतमालाला शासनाचा हमीभाव मिळालाच नाही.त्यातच सध्या बाजारपेठेत नवीन तूर विक्रीस शेतकरी आणत आहेत. परंतु, शासनाने जाहीर केलेल्या ५ हजार ४५० रुपये या हमीभावास फाटा देत व्यापारी कवडीमोल दराने तुरीची खरेदी करीत आहेत. त्यामुळे सोयाबीन, मुगापाठोपाठ तुरीलाही बाजारपेठेत हमीभाव मिळेनासा झाला आहे.सोयाबीन पोहचले ३ हजार ३०० रुपयांवरजिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांजवळ जोपर्यंत सोयाबीन विक्रीस होते, तोपर्यंत सोयाबीनला भाव मिळालाच नाही. बाजारपेठेतील व्यापाºयांनीही शासनाने जाहीर केलेल्या ३ हजार ५० रुपये या हमीभावाला फाटा देत २५०० ते २७०० रुपयापर्यंतची सोयाबीनची खरेदी केली. परंतु, सध्या सोयाबीनचा भाव चांगलाच वधारला आहे. सोयाबीनचा सध्या ३ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल दर झाला आहे. त्यामुळे वाढलेल्या भावाचा शेतकºयांऐवजी व्यापाºयांनाच फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.