शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

परभणी : कवडीमोल दराने शेतकºयांची तूर खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:20 IST

येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात व्यापाºयांनी हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी केली आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकºयांची कोंडी झाली आहे. २० दिवसांत मार्केट यार्डात १२५ क्विंटलची खरेदी खाजगी व्यापाºयांकडून करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात व्यापाºयांनी हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी केली आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकºयांची कोंडी झाली आहे. २० दिवसांत मार्केट यार्डात १२५ क्विंटलची खरेदी खाजगी व्यापाºयांकडून करण्यात आली आहे.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील खाजगी व्यापाºयांनी १ ते २० जानेवारी या काळात १२५ क्विंटल तुरीची खरेदी शेतकºयांकडून केली. केंद्र शासनाने तुरीला ५ हजार ४५० रुपये असा हमीभाव जाहीर केला आहे. सर्वसाधारणपणे शासनाने जाहीर केलेल्या हमीभावानुसारच शेतमालाची खरेदी करणे बंधनकारक आहे.परंतु, अनेक वेळा व्यापारी हमीभावाने खरेदी करीत नाहीत. परिणामी शेतकºयांना नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर्षीच्या हंगामात तुरीचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे निश्चित तुरीला भाव मिळणे अपेक्षित आहे. परंतु, त्याला फाटा देत व्यापाºयांनी हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणे सुरु आहे. परभणी येथील बाजार समितीमध्ये कमीत कमी ३९०० रुपयांपासून तुरीची खरेदी करण्यात आली.मोजक्या काही शेतकºयांना ४ हजार २३८ रुपये क्विंटलचा भाव मिळाला. २० दिवसांत कृउबाच्या कार्यक्षेत्रातील तूर उत्पादकांनी १२५ क्विंटल तुरीची विक्री केली आहे. मात्र हमीभाव जाहीर झाला असतानाही शेतमालाची विक्री कवडीमोल दराने करावी लागल्याने तूर उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.यावर्षी खरीप हंगामात शेतकºयांनी कापूस, मूग, सोयाबीन, उडीद, तूर आदी पिकांची लागवड केली होती. परंतु, जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग ही पिके शेतकºयांच्या हातची गेली असली तरी तुरीने मात्र शेतकºयांना तारले आहे.मात्र, शेतकºयांच्या शेतमालाला बाजारपेठेत कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्य शासनाने तत्काळ जिल्ह्यामध्ये तूर खरेदी करण्यासाठी हमीभाव खरेदी केंद्र उघडावेत, अशी मागणी तूर उत्पादकांमधून होत आहे.मूग, सोयाबीन, तूरीला : हमीभाव मिळेनायावर्षीच्या खरीप हंगामात शेतकºयांनी जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली. त्याच बरोबरीला मूग, उडीद ही पिकेही घेतली. परंतु, जुलै आणि आॅगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने अनेक शेतकºयांच्या हातची पिके गेली.ज्या शेतकºयांकडे उपलब्ध पाणी होते, त्यांना चांगले उत्पादन झाले. परंतु, बाजारपेठेत या शेतमालाला शासनाचा हमीभाव मिळालाच नाही.त्यातच सध्या बाजारपेठेत नवीन तूर विक्रीस शेतकरी आणत आहेत. परंतु, शासनाने जाहीर केलेल्या ५ हजार ४५० रुपये या हमीभावास फाटा देत व्यापारी कवडीमोल दराने तुरीची खरेदी करीत आहेत. त्यामुळे सोयाबीन, मुगापाठोपाठ तुरीलाही बाजारपेठेत हमीभाव मिळेनासा झाला आहे.सोयाबीन पोहचले ३ हजार ३०० रुपयांवरजिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांजवळ जोपर्यंत सोयाबीन विक्रीस होते, तोपर्यंत सोयाबीनला भाव मिळालाच नाही. बाजारपेठेतील व्यापाºयांनीही शासनाने जाहीर केलेल्या ३ हजार ५० रुपये या हमीभावाला फाटा देत २५०० ते २७०० रुपयापर्यंतची सोयाबीनची खरेदी केली. परंतु, सध्या सोयाबीनचा भाव चांगलाच वधारला आहे. सोयाबीनचा सध्या ३ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल दर झाला आहे. त्यामुळे वाढलेल्या भावाचा शेतकºयांऐवजी व्यापाºयांनाच फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.