शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

परभणी : ई-आॅफीस प्रणाली झाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:50 IST

प्रशासकीय कामकाजात गतीमानता व पारदर्शकता येण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या संकल्पनेतून १ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयात ई- आॅफीस प्रणाली सुरु झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रशासकीय कामकाजात गतीमानता व पारदर्शकता येण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या संकल्पनेतून १ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयात ई- आॅफीस प्रणाली सुरु झाली आहे.‘सरकारी काम महिनाभर थांब’, अशी प्रशासकीय कामकाजाची नकारात्मक प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये आतापर्यंत निर्माण झाली आहे. कोणतेही काम वेळेवर होत नाही. शिवाय पारदर्शकतेलाही वाव नसतो. परिणामी शासकीय कामासाठी अडवणूक होते. एकाच जागेवर दोन ते तीन महिने फाईली पडून राहतात, अशी अनेकांची तक्रार असते.या तक्रारीवर मात करण्यासाठी व प्रशासकीय कामकाजात गतीमानता आणि पारदर्शकता आणण्याकरीता जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी जिल्हा कचेरीत ई- आॅफीस प्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याकरीता जवळपास ५६ लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध करुन देण्यात आला. त्यानंतर १५ हायस्पीड स्कॅनर आणि ३० संगणकांची खरेदी करण्यात आली. जिल्हा कचेरीत यापूर्वीचे ११३ संगणक उपलब्ध आहेत. येथील कर्मचाऱ्यांना ई- आॅफीस प्रणालीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर प्रत्येक कर्मचाºयांना त्यांचा युजर आयडी, पासवर्ड देण्यात आला. डिजीटल सिग्नीचरही उपलब्ध करुन देण्यात आली. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १ फेब्रुवारीपासून ई-आॅफीस प्रणालीअंतर्गत कामकाजास सुरुवात करण्यात आली आहे. आलेल्या प्रत्येक तक्रार अर्जाचे, कामासंदर्भातील आदेश प्रतिचे स्कॅनिंग करुन ते संबंधित लिपिकाकडून वरिष्ठांकडे पाठविले जाते. वरिष्ठ त्याची तपासणी करुन त्यावर त्यांचा अभिप्राय नोंदवितात. त्यानंतर सदरील फाईल विभाग प्रमुखांकडे जाते. विभागप्रमुखच याबाबत अंतिम निर्णय घेतात. गरज पडल्यास सदरील फाईल जिल्हाधिकारी यांच्याकडे जाते. प्रत्येक फाईलीवरील कामकाजासाठी निश्चित कालावधी ठरवून देण्यात आला आहे. त्यामुळे एखाद्या कर्मचाºयाकडे अधिक फाईली पेडींग राहिल्यास विभागप्रमुख व जिल्हाधिकाºयांना त्या आॅनलाईन दिसतात.परिणामी संबंधित कर्मचाºयाची खरडपट्टी काढून त्याला कारणे दाखवा नोटीसही बजावली जावू शकते. शिवाय एखाद्या फाईलवर आपण सही केली नाही किंवा सदरील फाईल मी पाहिलीच नाही, अशी तकलादू कारणेही आता संबंधित कर्मचाºयाला देता येणार नाहीत. कारण ज्या टेबलवर फाईल आली आहे, त्या टेबलवरील कर्मचाºयाची डिजीटल सही संबंधित फाईलवर होणार आहे. परिणामी कामचुकारपणालाही यामुळे आळा बसणार आहे.सर्वसामान्य नागरिकांना पारदर्शक व गतीमान सेवा मिळावी, यासाठी प्रशासन कटीबद्ध आहे. एखाद्या नागरिकाने कामाच्या अनुषंगाने अर्ज दिल्यास व त्या अर्जावर संबंधिताचा मोबाईल नंबर किंवा ई-मेल असल्यास त्यांना त्यांच्या अर्जाची माहिती एसएमएस किंवा मेल केली जाईल. शिवाय प्रत्येक फाईलचे स्टेटस्ही तपासता येणार आहे. जिल्हा कचेरीतील ई- आॅफीस प्रणाली जनतेच्या सोयीसाठीच आहे. ती इतर कार्यालयांमध्येही टप्प्या टप्प्याने लागू करण्यात येणार आहे.- पी. शिव शंकर, जिल्हाधिकारी

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारी