शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ई-आॅफीस प्रणाली झाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:50 IST

प्रशासकीय कामकाजात गतीमानता व पारदर्शकता येण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या संकल्पनेतून १ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयात ई- आॅफीस प्रणाली सुरु झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रशासकीय कामकाजात गतीमानता व पारदर्शकता येण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या संकल्पनेतून १ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयात ई- आॅफीस प्रणाली सुरु झाली आहे.‘सरकारी काम महिनाभर थांब’, अशी प्रशासकीय कामकाजाची नकारात्मक प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये आतापर्यंत निर्माण झाली आहे. कोणतेही काम वेळेवर होत नाही. शिवाय पारदर्शकतेलाही वाव नसतो. परिणामी शासकीय कामासाठी अडवणूक होते. एकाच जागेवर दोन ते तीन महिने फाईली पडून राहतात, अशी अनेकांची तक्रार असते.या तक्रारीवर मात करण्यासाठी व प्रशासकीय कामकाजात गतीमानता आणि पारदर्शकता आणण्याकरीता जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी जिल्हा कचेरीत ई- आॅफीस प्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याकरीता जवळपास ५६ लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध करुन देण्यात आला. त्यानंतर १५ हायस्पीड स्कॅनर आणि ३० संगणकांची खरेदी करण्यात आली. जिल्हा कचेरीत यापूर्वीचे ११३ संगणक उपलब्ध आहेत. येथील कर्मचाऱ्यांना ई- आॅफीस प्रणालीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर प्रत्येक कर्मचाºयांना त्यांचा युजर आयडी, पासवर्ड देण्यात आला. डिजीटल सिग्नीचरही उपलब्ध करुन देण्यात आली. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १ फेब्रुवारीपासून ई-आॅफीस प्रणालीअंतर्गत कामकाजास सुरुवात करण्यात आली आहे. आलेल्या प्रत्येक तक्रार अर्जाचे, कामासंदर्भातील आदेश प्रतिचे स्कॅनिंग करुन ते संबंधित लिपिकाकडून वरिष्ठांकडे पाठविले जाते. वरिष्ठ त्याची तपासणी करुन त्यावर त्यांचा अभिप्राय नोंदवितात. त्यानंतर सदरील फाईल विभाग प्रमुखांकडे जाते. विभागप्रमुखच याबाबत अंतिम निर्णय घेतात. गरज पडल्यास सदरील फाईल जिल्हाधिकारी यांच्याकडे जाते. प्रत्येक फाईलीवरील कामकाजासाठी निश्चित कालावधी ठरवून देण्यात आला आहे. त्यामुळे एखाद्या कर्मचाºयाकडे अधिक फाईली पेडींग राहिल्यास विभागप्रमुख व जिल्हाधिकाºयांना त्या आॅनलाईन दिसतात.परिणामी संबंधित कर्मचाºयाची खरडपट्टी काढून त्याला कारणे दाखवा नोटीसही बजावली जावू शकते. शिवाय एखाद्या फाईलवर आपण सही केली नाही किंवा सदरील फाईल मी पाहिलीच नाही, अशी तकलादू कारणेही आता संबंधित कर्मचाºयाला देता येणार नाहीत. कारण ज्या टेबलवर फाईल आली आहे, त्या टेबलवरील कर्मचाºयाची डिजीटल सही संबंधित फाईलवर होणार आहे. परिणामी कामचुकारपणालाही यामुळे आळा बसणार आहे.सर्वसामान्य नागरिकांना पारदर्शक व गतीमान सेवा मिळावी, यासाठी प्रशासन कटीबद्ध आहे. एखाद्या नागरिकाने कामाच्या अनुषंगाने अर्ज दिल्यास व त्या अर्जावर संबंधिताचा मोबाईल नंबर किंवा ई-मेल असल्यास त्यांना त्यांच्या अर्जाची माहिती एसएमएस किंवा मेल केली जाईल. शिवाय प्रत्येक फाईलचे स्टेटस्ही तपासता येणार आहे. जिल्हा कचेरीतील ई- आॅफीस प्रणाली जनतेच्या सोयीसाठीच आहे. ती इतर कार्यालयांमध्येही टप्प्या टप्प्याने लागू करण्यात येणार आहे.- पी. शिव शंकर, जिल्हाधिकारी

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारी