शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

परभणी :पारदर्शक तपासणीच्या दुर्लक्षामुळेच धान्य घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:29 IST

सखोल व पारदर्शक तपासणी झाली नसल्यामुळेच पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात ३४ लाख रुपयांचा धान्य घोटाळा झाल्याची बाब समोर आली आहे़ त्यामुळे या तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाºयांवरही कार्यवाही होणे गरजेचे आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सखोल व पारदर्शक तपासणी झाली नसल्यामुळेच पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात ३४ लाख रुपयांचा धान्य घोटाळा झाल्याची बाब समोर आली आहे़ त्यामुळे या तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाºयांवरही कार्यवाही होणे गरजेचे आहे़पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात ३४ लाखांचा घोटाळा झाल्याची बाब १० जानेवारी रोजी उघडकीस आली होती़ या संदर्भातील वृत्त ११ जानेवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती़ या प्रकरणात जिल्हाधिकाºयांनी गोदामपाल एस़एम़ कांबळे यांना निलंबित केले आहे; परंतु, येथील गोदामाची नियमित तपासणी करण्याची जबाबदारी ज्या अधिकाºयांवर होती, त्या अधिकाºयांवर मात्र अद्याप कार्यवाही झालेली नाही़ या प्रकरणी जिल्हाधिकाºयांनी पालमचे पुरवठा निरीक्षक तथा प्रभारी तहसीलदार श्रीरंग कदम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती़ त्यानुसार कदम यांनी जिल्हाधिकाºयांना मंगळवारी खुलासा सादर केला आहे़ या खुलाशात त्यांनी स्वत:चीच बाजू मांडल्याचे समजते़ त्यामुळे त्यांचा खुलासा जिल्हाधिकारी कितपत स्वीकारणार याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे़ मुळातच पालम येथील गोदामाची नियमितपणे तपासणी होणे आवश्यक होते़ परंतु, तशी तपासणी झाली नसल्यामुळेच धान्य अपहाराचा प्रकार झाल्याची चर्चा होवू लागली आहे़ जून २०१७ पासून गोदामपाल कांबळे यांच्याकडे पदभार होता़ त्यानंतरच गेल्या सहा महिन्यांमध्ये धान्य अपहाराचा प्रकार झाल्याचे समजते़ त्यामुळे गेल्या सहा महिन्यांमध्ये ज्या ज्या अधिकाºयांनी या गोदामाची तपासणी केली व पारदर्शकता बाळगली नाही, असे सर्व अधिकारी या प्रकरणात दोषी आढळत आहेत; परंतु, त्यांच्यावरील दोषारोप प्रशासनालाच सिद्ध करावा लागणार आहे़ अन्यथा केवळ एका कर्मचाºयावर कार्यवाही करून धान्य घोटाळ्याचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न प्रशासकीय स्तरावरून होवू शकतो. तशी भीतीही कर्मचाºयांनी व्यक्त केली आहे़ आतापर्यंत उघडकीस आलेल्या धान्य घोटाळ्यात कर्मचाºयांबरोबरच अधिकाºयांवरही कार्यवाही होणे अपेक्षित होते; परंतु, तशी कार्यवाही झालेली नाही.मुंबईच्या पथकाने ओढले ताशेरेपरभणी येथील पुरवठा विभागाच्या गोदामातील धान्य घोटाळा दोन वर्षापूर्वी मुंबईच्या पथकानेच उघडकीस आणला होता़ या पथकाची नियमितपणे गोदाम तपासणी होत असते़ त्या अनुषंगाने २५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत या पथकाने जिल्ह्यातील १० गोदामांची तपासणी केली़ सर्वात शेवटी या पथकाने पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामाची तपासणी केली़ त्यानंतर तयार केलेल्या अहवालात पथकाने गोदामाची सखोल आणि पारदर्शक तपासणी झाली नसल्यामुळेच धान्य घोटाळा घडल्याचे नमूद केले आहे़ त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत या पारदर्शकतेकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाºयांवरही कार्यवाहीचा बडगा उगारणे आवश्यक आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीfraudधोकेबाजी