शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

परभणी जिल्हा: हमीभाव केंद्रांना लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:54 IST

शेतमालाला रास्तभाव मिळावा, या उद्देशाने राज्य शासनाने सुरु केलेल्या हमीभाव योजनेंतर्गत जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकऱ्यांची मात्र अडचण होत आहे. एकीकडे नोंदणीच्या किचकट प्रक्रियेतून शेतकºयांना जावे लागत असल्याने थेट खुल्या बाजारात शेतमालाची विक्री करुन दिवाळीचा सण साजरा करण्याची तयारी शेतकºयांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतमालाला रास्तभाव मिळावा, या उद्देशाने राज्य शासनाने सुरु केलेल्या हमीभाव योजनेंतर्गत जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकऱ्यांची मात्र अडचण होत आहे. एकीकडे नोंदणीच्या किचकट प्रक्रियेतून शेतकºयांना जावे लागत असल्याने थेट खुल्या बाजारात शेतमालाची विक्री करुन दिवाळीचा सण साजरा करण्याची तयारी शेतकºयांनी केली आहे.यावर्षी परभणी जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा ३० टक्के पाऊस कमी झाला असला तरी खरीप हंगामामध्ये जेमतेम उत्पादन शेतकºयांना झाले आहे. उत्पादित मालाला योग्य भाव मिळावा आणि शेतकºयांच्या पदरात दोन पैसे पडावेत, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या शेतकºयांच्या आशेवर मात्र पाणी फेरले जात आहे. खरीप हंगामामध्ये मूग हे पहिले पीक साधारणत: दोन महिन्यांपूर्वीच बाजारात आले. त्यानंतर उडीद आणि सोयाबीन ही पिकेही हाती आली आहेत; परंतु, शासनाचे हमीभाव खरेदी केंद्रच जिल्ह्यात सुरु झाले नसल्याने शेतकºयांची अडचण होत आहे. मुगाची विक्री तर खुल्या बाजारात करण्यात आली. शेतकºयांच्या अपेक्षा सोयाबीन या पिकावर असतात. मागील काही वर्षांपासून नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. त्यामुळे या पिकावर शेतकºयांच्या आशा असतात. उत्पादित झालेल्या सोयाबीनला चांगला भाव मिळावा. किमान शासनाने जाहीर केलेला हमीभाव तरी मिळेल, या उद्देशाने आर्थिक गणिते लावली जातात; परंतु, बाजारपेठेत चित्र उलटेच निर्माण होत आहे. सोयाबीन बाजारात आले की भाव गडगडतात आणि हमीभाव केंद्रांचाही पत्ता नसतो. त्यामुळे प्रति क्विंटलमागे हजार ते दीड हजार रुपयांचे नुकसान शेतकºयांना सहन करावे लागत आहे.परभणी जिल्ह्यामध्ये सहा हमीभाव केंद्र सुरु करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. महिनाभरापूर्वी हमीभाव केंद्रासाठी अर्ज मागविण्यात आले. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे; परंतु, अजूनही हमीभाव केंद्र सुरु झाले नाहीत. जिल्हा प्रशासनामार्फत शेतकºयांकडून खरेदीसाठी नोंदणी केली जात आहे. या नोंदणीलाही शेतकºयांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. दिवाळी तोंडावर येऊन ठेपली असून सोयाबीन विक्रीतून येणाºया पैशांमध्ये दिवाळीचा सण साजरा करण्याचे नियोजन शेतकºयांनी केले आहे. त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री झालेल्या मालाचा पैसा हाती येण्यास किमान दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. ही बाब लक्षात घेऊन शेतकºयांनी खुल्या बााजारपेठेतच शेतमाल विक्री करण्यावर भर दिला आहे. शासनाने वेळेत हमीभाव केंद्र सुरु केले असते तर शेतकºयांना त्याचा फायदा झाला असता. आताही वेळ गेलेली नसून हमीभाव खरेदी केंद्र तातडीने सुरु करावेत, अशी मागणी होत आहे.सहा ठिकाणी होणार खरेदी केंद्र४जिल्ह्यात नाफेडमार्फत परभणी, जिंतूर, सेलू, पालम, पाथरी आणि पूर्णा अशा सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले जाणार आहेत. तर विदर्भ को. आॅप .फेडरेशनच्या वतीने गंगाखेड आणि मानवत या ठिकाणी खरेदी केंद्र सुरु केले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडे खरेदी केंद्र सुरु करण्यासंदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. शासनाच्या निर्देशानुसार या खरेदी केंद्रावर ९ सप्टेंबरपासून शेतमाल विक्रीसाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. या नोंदणीला १५ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून त्यानंतरच प्रत्यक्षात हमीभाव खरेदी केंद्र सुरु होतील, अशी शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी त्वरित हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावेत, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.४हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. काही ठिकाणच्या कागदपत्रांची पूर्तताही झाली आहे. शेतकºयांची नोंदणी आणि खरेदी एकाचवेळी सुरु करावी, असे निर्देश शासनाने दोन दिवसांपूर्वीच दिले आहेत. त्यामुळे या निर्देशानुसार येत्या एक-दोन दिवसांत हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले जातील, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी कापुरे यांनी दिली.\३८०० शेतकºयांची नोंदणी४जिल्ह्यातील पाच केंद्रावर २२ आॅक्टोबरपर्यंत ३ हजार ८६० शेतकºयांनी हमीभावाने शेतमाल विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे. त्यामध्ये परभणीच्या केंद्रावर ८२५, जिंतूर ९२५, सेलू १५४५, पालम ४७० आणि पूर्णा येथील खरेदी केंद्रावर ९५ शेतकºयांची नोंदणी झाली आहे. हमीभाव केंद्रांसाठी शेतकºयांचा अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे या नोंदणीवरुन दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती