शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

परभणी जिल्हा: हमीभाव केंद्रांना लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:54 IST

शेतमालाला रास्तभाव मिळावा, या उद्देशाने राज्य शासनाने सुरु केलेल्या हमीभाव योजनेंतर्गत जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकऱ्यांची मात्र अडचण होत आहे. एकीकडे नोंदणीच्या किचकट प्रक्रियेतून शेतकºयांना जावे लागत असल्याने थेट खुल्या बाजारात शेतमालाची विक्री करुन दिवाळीचा सण साजरा करण्याची तयारी शेतकºयांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतमालाला रास्तभाव मिळावा, या उद्देशाने राज्य शासनाने सुरु केलेल्या हमीभाव योजनेंतर्गत जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकऱ्यांची मात्र अडचण होत आहे. एकीकडे नोंदणीच्या किचकट प्रक्रियेतून शेतकºयांना जावे लागत असल्याने थेट खुल्या बाजारात शेतमालाची विक्री करुन दिवाळीचा सण साजरा करण्याची तयारी शेतकºयांनी केली आहे.यावर्षी परभणी जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा ३० टक्के पाऊस कमी झाला असला तरी खरीप हंगामामध्ये जेमतेम उत्पादन शेतकºयांना झाले आहे. उत्पादित मालाला योग्य भाव मिळावा आणि शेतकºयांच्या पदरात दोन पैसे पडावेत, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या शेतकºयांच्या आशेवर मात्र पाणी फेरले जात आहे. खरीप हंगामामध्ये मूग हे पहिले पीक साधारणत: दोन महिन्यांपूर्वीच बाजारात आले. त्यानंतर उडीद आणि सोयाबीन ही पिकेही हाती आली आहेत; परंतु, शासनाचे हमीभाव खरेदी केंद्रच जिल्ह्यात सुरु झाले नसल्याने शेतकºयांची अडचण होत आहे. मुगाची विक्री तर खुल्या बाजारात करण्यात आली. शेतकºयांच्या अपेक्षा सोयाबीन या पिकावर असतात. मागील काही वर्षांपासून नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. त्यामुळे या पिकावर शेतकºयांच्या आशा असतात. उत्पादित झालेल्या सोयाबीनला चांगला भाव मिळावा. किमान शासनाने जाहीर केलेला हमीभाव तरी मिळेल, या उद्देशाने आर्थिक गणिते लावली जातात; परंतु, बाजारपेठेत चित्र उलटेच निर्माण होत आहे. सोयाबीन बाजारात आले की भाव गडगडतात आणि हमीभाव केंद्रांचाही पत्ता नसतो. त्यामुळे प्रति क्विंटलमागे हजार ते दीड हजार रुपयांचे नुकसान शेतकºयांना सहन करावे लागत आहे.परभणी जिल्ह्यामध्ये सहा हमीभाव केंद्र सुरु करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. महिनाभरापूर्वी हमीभाव केंद्रासाठी अर्ज मागविण्यात आले. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे; परंतु, अजूनही हमीभाव केंद्र सुरु झाले नाहीत. जिल्हा प्रशासनामार्फत शेतकºयांकडून खरेदीसाठी नोंदणी केली जात आहे. या नोंदणीलाही शेतकºयांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. दिवाळी तोंडावर येऊन ठेपली असून सोयाबीन विक्रीतून येणाºया पैशांमध्ये दिवाळीचा सण साजरा करण्याचे नियोजन शेतकºयांनी केले आहे. त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री झालेल्या मालाचा पैसा हाती येण्यास किमान दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. ही बाब लक्षात घेऊन शेतकºयांनी खुल्या बााजारपेठेतच शेतमाल विक्री करण्यावर भर दिला आहे. शासनाने वेळेत हमीभाव केंद्र सुरु केले असते तर शेतकºयांना त्याचा फायदा झाला असता. आताही वेळ गेलेली नसून हमीभाव खरेदी केंद्र तातडीने सुरु करावेत, अशी मागणी होत आहे.सहा ठिकाणी होणार खरेदी केंद्र४जिल्ह्यात नाफेडमार्फत परभणी, जिंतूर, सेलू, पालम, पाथरी आणि पूर्णा अशा सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले जाणार आहेत. तर विदर्भ को. आॅप .फेडरेशनच्या वतीने गंगाखेड आणि मानवत या ठिकाणी खरेदी केंद्र सुरु केले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडे खरेदी केंद्र सुरु करण्यासंदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. शासनाच्या निर्देशानुसार या खरेदी केंद्रावर ९ सप्टेंबरपासून शेतमाल विक्रीसाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. या नोंदणीला १५ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून त्यानंतरच प्रत्यक्षात हमीभाव खरेदी केंद्र सुरु होतील, अशी शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी त्वरित हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावेत, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.४हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. काही ठिकाणच्या कागदपत्रांची पूर्तताही झाली आहे. शेतकºयांची नोंदणी आणि खरेदी एकाचवेळी सुरु करावी, असे निर्देश शासनाने दोन दिवसांपूर्वीच दिले आहेत. त्यामुळे या निर्देशानुसार येत्या एक-दोन दिवसांत हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले जातील, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी कापुरे यांनी दिली.\३८०० शेतकºयांची नोंदणी४जिल्ह्यातील पाच केंद्रावर २२ आॅक्टोबरपर्यंत ३ हजार ८६० शेतकºयांनी हमीभावाने शेतमाल विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे. त्यामध्ये परभणीच्या केंद्रावर ८२५, जिंतूर ९२५, सेलू १५४५, पालम ४७० आणि पूर्णा येथील खरेदी केंद्रावर ९५ शेतकºयांची नोंदणी झाली आहे. हमीभाव केंद्रांसाठी शेतकºयांचा अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे या नोंदणीवरुन दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती