शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

परभणी : जिंतूर तालुक्यात दोन राष्ट्रीय महामार्गांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:22 IST

तालुक्यात जिंतूर- परभणी हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर काही महिन्यातच जिंतूर-सेनगाव व गणेशपूर-मेहकर या महामार्गाची घोषणा झाली आहे. या दोन्ही रस्त्याचे प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर: तालुक्यात जिंतूर- परभणी हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर काही महिन्यातच जिंतूर-सेनगाव व गणेशपूर-मेहकर या महामार्गाची घोषणा झाली आहे. या दोन्ही रस्त्याचे प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले आहे.या संदर्भात केंद्र शासनाच्या बांधकाम विभागाने ६ मार्च रोजी जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये गणेशपूर- कोठा-वझर हंडी- लोणी- रिसोड-मेहकर व जिंतूर-येलदरी-सेनगाव या दोन मार्गाचा समावेश आहे. या दोन्ही मार्गाचे प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत तत्काळ निविदा मागविण्यात आल्या आहेत. यामध्ये गणेशपूर- मेहकर १२० कि.मी., जिंतूर- सेनगाव ३५ कि.मी. चा समावेश आहे. हा मार्ग दोन पदरी, चार पदरी होणार असून यासाठी किती जमीन संपादित करावी लागणार आहे, किती पूल बांधावे लागणार आहेत, नेमका मार्ग कोठून जवळ पडेल आदी संदर्भात माहिती या अहवालात देण्यात येणार आहे. या सर्व कामांकरीता ८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर या रस्त्याचे टेंडर पास होणार आहे.साधारणत: चार ते पाच वर्षामध्ये या कामास सुरुवात होऊ शकते. या दोन राष्ट्रीय महामार्गामुळे जवळपास ६ तालुके व १०० पेक्षा जास्त गावांना फायदा होणार आहे. दरम्यान, गणेशपूर-लोणार-मेहकर या १२० कि़मी़ रस्त्यासाठी अंदाजे १५०० कोटी रूपयाचा निधी लागणार असून जिंतूर- सेनगाव या रस्त्यासाठी अंदाजे ५०० कोटी रूपयाचा खर्च अपेक्षित आहे़ या दोन्ही रस्त्यासाठी साधारण २००० कोटी रूपयांचा खर्च लागणार असल्याचे बांधकाम विभागातील सूत्राने सांगितले़समृद्धी महामार्गास जोडणारगणेशपूर ते मेहकर हा मार्ग मालेगावजवळून जाणाºया समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. शिवाय मराठवाडा व विदर्भ यांना जोडणारे हे दोन मार्ग असून यामुळे मराठवाडा व विदर्भ यातील २० ते २५ कि.मी.अंतर कमी होणार आहे. जिंतूर शहर हे आता राष्ट्रीय महामार्गाचा केंद्रबिंदू ठरला आहे. औरंगाबाद- हैदराबाद या महामार्गाबरोबरच नव्याने राज्य मार्गावरुन महामार्ग झालेल्या जिंतूर-फाळेगाव, जिंतूर- परभणी यामुळे सर्वच रस्ते राष्ट्रीय महामार्गाने जोडले गेले आहेत. त्यामुळे भविष्यात जिंतूर शहराचा विकास होण्यास मदत होणार आहे.जिंतूर तालुक्यात तीन राष्ट्रीय महामार्ग जाणार असल्याने तालुक्याच्या विकासाला गती येण्यास मदत होणार आहे. तसेच तालुक्याचा इतर जिल्ह्याशी थेट संपर्कही वाढणार आहे. त्यामुळे जिंतूर शहरासह परिसराच्या विकासाला हातभार लागणार आहे. महामार्गाची कामे लवकर व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.पुलाचे मुख्य प्रश्न मार्गी लागणारमराठवाडा- विदर्भाला जोडणाºया येलदरी धरणावरील पूल कमकुवत व कालबाह्य झाला आहे. या पुलाच्या बांधºयासाठी १५ वर्षापूर्वी सर्व्हेक्षण करण्यात आले होते़ मात्र आजपर्यंत याकडे दुर्लक्ष झाले़ आताही या धोकादायक पुलावरून वाहतुक सुरूच आहे़ तसेच वझर येथील पुर्णा नदीवरील पुलाचे सर्व्हेक्षणही २० वर्षापूर्वी झाले होते़ याही पुलाचे अद्यापर्यंत कोणतेही काम झाले नाही़