शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शासकीय समिती सदस्य निश्चित करा- नवाब मलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:17 IST

विविध शासकीय समित्यांच्या स्थापनेसंदर्भातील फॉर्म्युला ठरला असून, येत्या पंधरा दिवसांत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी समिती सदस्यांची नावे निश्चित करावीत, असे आवाहन अल्पसंख्यांक मंत्री तथा पालकमंत्री नवाब मलिक यांनी येथे आयोजित मेळाव्यात बोलताना केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विविध शासकीय समित्यांच्या स्थापनेसंदर्भातील फॉर्म्युला ठरला असून, येत्या पंधरा दिवसांत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी समिती सदस्यांची नावे निश्चित करावीत, असे आवाहन अल्पसंख्यांक मंत्री तथा पालकमंत्री नवाब मलिक यांनी येथे आयोजित मेळाव्यात बोलताना केले.शहरातील वसमत रोडवरील राष्टÑवादी भवनमध्ये शनिवारी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मलिक बोलत होते. यावेळी राकाँ जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, उपाध्यक्ष अजय चौधरी, जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, माजी खा.सुरेश जाधव, राकाँच्या महिला जिल्हाध्यक्ष भावनाताई नखाते, सोनाली देशमुख, संतोष बोबडे, संतोष देशमुख, रितेश काळे, राष्टÑवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, नंदाताई राठोड आदींची मंचावर उपस्थिती होती. मलिक म्हणाले, अ.भा. राकाँचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पर्यायी सरकार देण्याच्या उद्देशाने शिवसेना- काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस आघाडीचे सरकार राज्यात स्थापन केले. त्यामुळे राज्यातील जनतेची कामे करण्याची जबाबदारी आता आपली आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्यांक, बेरोजार यांच्या हिताचे निर्णय सरकार घेतच आहे. मात्र हे निर्णय घेत असताना पक्ष संघटन मजबूत असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा मंत्रीमंडळ स्थापन होते. मात्र जिल्हा, तालुका स्तरावर समित्यांची स्थापना लवकर होत नाही. पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर असून, मित्र पक्षांशी चर्चा करुन जिल्ह्यातील समित्यांच्या सदस्यांची नावे येत्या पंधरा दिवसांत निश्चित करावीत. समित्यांच्या माध्यमातून राज्याचा आलेला निधी, विकासाची कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. पक्षातील कार्यकर्त्यांना ताकद देण्याची जबाबदारी मी पार पाडेन. मात्र संघटना मजबूत करा. पक्ष वाढवा, अशा सूचना देत असतानाच इतर पक्षातील कार्यकर्ते आपल्या पक्षात घेण्यापेक्षा नवीन कार्यकर्ते निर्माण करण्याच्या सूचना मलिक यांनी यावेळी दिल्या.यावेळी बोलताना आ.बाबाजानी दुर्राणी म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांमध्ये राष्टÑवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. येत्या काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील पक्ष संघटन आणखी मजूबत करण्यासाठी पालकमंत्री नवाब मलिक यांच्यासमवेत चर्चा करुन प्रयत्न केले जाणार आहेत. त्यादृष्टीने लवकरच पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जातील, असे आ.दुर्राणी यांनी सांगितले. यावेळी भावनाताई नखाते, माजी खा.सुरेश जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा.किरण सोनटक्के यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमात नवनिर्वाचित जि.प. अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, जि.प. उपाध्यक्ष अजय चौधरी, जि.प. सभापती मीराताई टेंगसे, जि.प. समाजकल्याण रामराव उबाळे, पं.स. सभापती कल्पना थोरात, मीरा जाधव, अशोक बोखारे आदींचा पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेळाव्यास जिल्हाभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पैसे भरणाºया शेतकºयांसाठीही योजनाराज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले आहे. ही योजना जाहीर झाल्यानंतर नियमित कर्ज फेडणाºया शेतकºयांचे काय? असा प्रश्न नेहमी विचारला जातो. त्यावरही शासन विचार करीत असून, नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांसाठीही लवकरच योजना राबविली जाणार आहे. तसेच ३ लाखांपेक्षा अधिक पीक कर्ज असणाºया शेतकºयांसाठीही शासन योजना राबविणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.प्रत्येक महिन्यात परभणीला येणारपरभणी जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या विकासाची कामे तर करणारच आहे. शिवाय जिल्ह्यात पक्षाचे संघटन आणखी वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देणार आहे. यापुढील दौºयात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांसमवेत तीन ते चार तास बैठक घेणार आहे, असे सांगून मी केवळ ध्वजारोहणापुरता नाही तर प्रत्येक महिन्यात जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे पालकमंत्री मलिक यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीnawab malikनवाब मलिक