शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
2
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
3
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
4
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
5
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
6
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
7
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
8
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
9
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
10
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!
11
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
12
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
13
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
14
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
15
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
16
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
17
कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर
18
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
19
भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका, २४ तासांत पुन्हा एकदा सोशल मीडिया अकाउंट केले ब्लॉक!
20
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज

परभणी:वृक्ष लागवड योजनेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:55 IST

शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील मानकेश्वर परिसरात चक्क मुरमाड जमिनीवर वृक्ष लागवड करण्यात येत आहे. हे वृक्ष आठ दिवसही टिकू शकणार नाहीत. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा वन विभागाच्या दुर्लक्षामुळे होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील मानकेश्वर परिसरात चक्क मुरमाड जमिनीवर वृक्ष लागवड करण्यात येत आहे. हे वृक्ष आठ दिवसही टिकू शकणार नाहीत. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा वन विभागाच्या दुर्लक्षामुळे होत आहे.जिंतूर तालुक्यातील चारठाणा परिमंडळांतर्गत वडाळी नियतक्षेत्रांतर्गत मानकेश्वर परिसरातील किन्ही रस्त्यावर सर्वे नंबर ७२ मध्ये २५ हेक्टर जमिनीवर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत वृक्ष लागवडीसाठी खड्डे करण्यात आले आहेत. वृक्ष लावण्यासाठी खोदण्यात आलेले हे खड्डे महाराष्ट्रातील निकृष्ठ खड्डे खोदण्याचा हा उत्कृष्ट नमुना आहे. जेसीबीचे खोरे ओरबडून अर्ध्या फुटांपेक्षाही कमी खोल चर सीसीटीसारखे काढून त्यातून निघालेल्या मुरूमामध्ये ही झाडे लावण्यात आली आहेत.दगड-माती, लाल माती यांच्यात लावलेली झाडे किती दिवस टिकतील हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे विभागीय वन अधिकारी यांनी ज्या दिवशी या भागाला भेट दिली, त्याच दिवशी वृक्ष लागवडीचा नमुना पहावयास मिळाला. वृक्ष लागवडीसाठी कुठलेही नियोजन नाही. शासकीय कार्यक्रम आहे याच धर्तीवर वृक्षलागवड करून कोट्यवधी रुपयांचा मलिदा वन विभाग फस्त करीत आहे. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.यंत्रांनी केले लागवडीसाठी खड्डे४वृक्ष लागवडीसाठी मजुराच्या हाताने खड्डे करणे गरजेचे असताना जेसीबीच्या साह्याने कोणतेही निकष न पाळता केवळ जमीन ओरबाडून वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे ही वृक्ष लागवड औटघटकेची ठरणार असून शासनाने केलेल्या खर्च पूर्णपणे वाया जाणार आहे.४या प्रकाराची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे. त्याच बरोबर वृक्ष लागवडीसाठी काळ्या मातीचा वापर होणे गरजेचे असताना लावलेल्या वृक्षावर वरच्या बाजूने काळी माती टाकून देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न वन विभागाचा आहे.४विशेष म्हणजे २० ते २५ ट्रॅक्टर काळी माती असूनही २५ ते ३० ट्रॅक्टर पांढरा मुरूम आणून टाकण्यात आला आहे. त्यामुळे शासन पैसे खर्च करीत असले तरी अधिकारी मात्र स्वत:चे चांगभले करण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे.४वृक्ष लागवड करीत असताना भविष्यात वृक्ष वाढविण्यासाठी पाण्याची गरज असते. मात्र वनविभागाकडून डोंगरावर लावलेल्या वृक्षासाठी कुठलीही सिंचनाची व्यवस्था केलेली नाही. मुरमाड जमीन असल्याने झाडांना आठ दिवसात पाणी मिळाले नाही तर हे वृक्ष राहतील की, नाही? याबाबत साशंकता आहे. शिवाय या भागात मोठ्या प्रमाणात जनावरे असल्याने वृक्ष लागवड ची सुरक्षा कशी होणार हा प्रश्न आहे.या प्रकरणात करण्यात आलेली कामे किती दर्जेदार आहेत, याची पाहणी सुरू असून बोगस कामे करणाºयांवर कार्यवाही करून व संबंधित कामाचीही चौकशी करण्यात येईल.-विजय सातपुते, उपविभागीय वन अधिकारी, परभणी

टॅग्स :parabhaniपरभणीforest departmentवनविभाग