शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
4
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
5
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
6
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
7
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
8
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
9
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
10
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
11
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
12
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
13
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
14
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
15
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
16
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
17
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
18
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
19
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
20
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!

परभणी:वृक्ष लागवड योजनेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:55 IST

शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील मानकेश्वर परिसरात चक्क मुरमाड जमिनीवर वृक्ष लागवड करण्यात येत आहे. हे वृक्ष आठ दिवसही टिकू शकणार नाहीत. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा वन विभागाच्या दुर्लक्षामुळे होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील मानकेश्वर परिसरात चक्क मुरमाड जमिनीवर वृक्ष लागवड करण्यात येत आहे. हे वृक्ष आठ दिवसही टिकू शकणार नाहीत. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा वन विभागाच्या दुर्लक्षामुळे होत आहे.जिंतूर तालुक्यातील चारठाणा परिमंडळांतर्गत वडाळी नियतक्षेत्रांतर्गत मानकेश्वर परिसरातील किन्ही रस्त्यावर सर्वे नंबर ७२ मध्ये २५ हेक्टर जमिनीवर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत वृक्ष लागवडीसाठी खड्डे करण्यात आले आहेत. वृक्ष लावण्यासाठी खोदण्यात आलेले हे खड्डे महाराष्ट्रातील निकृष्ठ खड्डे खोदण्याचा हा उत्कृष्ट नमुना आहे. जेसीबीचे खोरे ओरबडून अर्ध्या फुटांपेक्षाही कमी खोल चर सीसीटीसारखे काढून त्यातून निघालेल्या मुरूमामध्ये ही झाडे लावण्यात आली आहेत.दगड-माती, लाल माती यांच्यात लावलेली झाडे किती दिवस टिकतील हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे विभागीय वन अधिकारी यांनी ज्या दिवशी या भागाला भेट दिली, त्याच दिवशी वृक्ष लागवडीचा नमुना पहावयास मिळाला. वृक्ष लागवडीसाठी कुठलेही नियोजन नाही. शासकीय कार्यक्रम आहे याच धर्तीवर वृक्षलागवड करून कोट्यवधी रुपयांचा मलिदा वन विभाग फस्त करीत आहे. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.यंत्रांनी केले लागवडीसाठी खड्डे४वृक्ष लागवडीसाठी मजुराच्या हाताने खड्डे करणे गरजेचे असताना जेसीबीच्या साह्याने कोणतेही निकष न पाळता केवळ जमीन ओरबाडून वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे ही वृक्ष लागवड औटघटकेची ठरणार असून शासनाने केलेल्या खर्च पूर्णपणे वाया जाणार आहे.४या प्रकाराची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे. त्याच बरोबर वृक्ष लागवडीसाठी काळ्या मातीचा वापर होणे गरजेचे असताना लावलेल्या वृक्षावर वरच्या बाजूने काळी माती टाकून देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न वन विभागाचा आहे.४विशेष म्हणजे २० ते २५ ट्रॅक्टर काळी माती असूनही २५ ते ३० ट्रॅक्टर पांढरा मुरूम आणून टाकण्यात आला आहे. त्यामुळे शासन पैसे खर्च करीत असले तरी अधिकारी मात्र स्वत:चे चांगभले करण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे.४वृक्ष लागवड करीत असताना भविष्यात वृक्ष वाढविण्यासाठी पाण्याची गरज असते. मात्र वनविभागाकडून डोंगरावर लावलेल्या वृक्षासाठी कुठलीही सिंचनाची व्यवस्था केलेली नाही. मुरमाड जमीन असल्याने झाडांना आठ दिवसात पाणी मिळाले नाही तर हे वृक्ष राहतील की, नाही? याबाबत साशंकता आहे. शिवाय या भागात मोठ्या प्रमाणात जनावरे असल्याने वृक्ष लागवड ची सुरक्षा कशी होणार हा प्रश्न आहे.या प्रकरणात करण्यात आलेली कामे किती दर्जेदार आहेत, याची पाहणी सुरू असून बोगस कामे करणाºयांवर कार्यवाही करून व संबंधित कामाचीही चौकशी करण्यात येईल.-विजय सातपुते, उपविभागीय वन अधिकारी, परभणी

टॅग्स :parabhaniपरभणीforest departmentवनविभाग