शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

परभणी: चढावरून बस मागे सरकत असल्याने प्रवाशांत घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:36 IST

खचाखच प्रवाशांनी भरलेली बस, रस्त्यातील चढ चढत असताना अचानक मागे सरकत असल्याने भयभीत झालेल्या प्रवाशांचा, चालकाने प्रसंगावधान राखून वाहनावर ताबा मिळविल्याने जीव भांड्यात पडल्याची घटना ९ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जिंतूर-कावी रस्त्यावर घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : खचाखच प्रवाशांनी भरलेली बस, रस्त्यातील चढ चढत असताना अचानक मागे सरकत असल्याने भयभीत झालेल्या प्रवाशांचा, चालकाने प्रसंगावधान राखून वाहनावर ताबा मिळविल्याने जीव भांड्यात पडल्याची घटना ९ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जिंतूर-कावी रस्त्यावर घडली़जिंतूर आगाराची एमएच २० बीएल- ०३०१ क्रमांकाची बस जिंतूरहून कावीकडे मंगळवारी ३़३० वाजता निघाली़ जिंतूरचा या दिवशी बाजाराचा दिवस असल्याने बसमध्ये जवळपास ६० प्रवासी होते़ प्रवाशांनी खचाखच भरलेली ही बस दुपारी ४ च्या सुमारास कावी शिवारातील चढाजवळ आली़ त्यानंतर चालकाने ही बस चढावरून गावाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला; परंतु, अचानक ब्रेक लागत नसल्याने पुढे जाणारी बस मागे सरकू लागली़जवळपास २० फूट ही बस मागे गेल्याने काय होत आहे, हे प्रारंभी प्रवाशांना समजेना़ त्यानंतर मात्र चालकाला वाहनावर नियंत्रण मिळविता येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आतील प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली़ काही क्षणातच चालकाने प्रसंगावधान राखून सदरील वाहनावर नियंत्रण मिळविले़ त्यामुळे मोठी दुर्घटना टळली़ परिणामी, आतील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला व थांबलेल्या बसमधून सर्व प्रवासी उतरले़ नंतर चालकाने बसमध्ये बसण्याची प्रवाशांना विनंती केली; परंतु, भयभीत झालेल्या प्रवाशांनी नंतर त्या बसकडे ढुंकूनही पाहिले नाही़ मिळेल त्या वाहनाने त्यांनी गाव गाठले़ परिणामी, चालक व वाहकाला रिकामी बस घेऊन जावी लागली़ या घटनेचीच गाव परिसरात चर्चा होताना दिसून आली़भंगार बसमुळे झाली घटना४जिंतूर आगाराकडे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नाही़ आगारात मोठ्या प्रमाणात भंगार बसेस असून, या बस प्रवासी वाहतुकीसाठी सक्षम आहेत की नाही? याची तांत्रिकदृष्ट्या तपासणी न करताच त्या रस्त्यावर धावतात़ कावीला जाणारी ही अशीच बस होती.४शिवाय आगारातील अनेक बसच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत तर काही बस पाऊस पडल्यावर गळतात़ परिणामी प्रवाशांना जीव मुठीत घेऊन या बसमधून प्रवास करावा लागतो़ विशेष म्हणजे बसचे टायर नसल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याची नामुष्की एसटी महामंडळाला अनेक वेळा आली आहे़ तरीही एसटी महामंडळाचे अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत़ परिणामी एसटी महामंडळाच्या कारभाराबद्दल प्रवाशांतून संताप व्यक्त केला जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीroad transportरस्ते वाहतूक